शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

जुन्नरला नगरपालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:52 IST

कारवाईविरोधात नागरिकांनी दाखल केला होता न्यायालयात दावा

जुन्नर : जुन्नर नगरपालिकेच्या वतीने कल्याणपेठ बोचरेआळी परिसरात शहरविकास आराखड्यानुसार रुंदीकरण करण्यात येत असलेल्या रस्त्यामध्ये येत असलेल्या संरक्षक भिंतीची अतिक्रमणे नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने काढून टाकली.याबाबत अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी नगरपालिकेच्या अतिक्रमण काढून टाकण्याच्या आदेशाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतल्याने या करवाईबाबत नागरिकांत उत्सुकता होती. जुन्नर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणपेठेत, शहराच्या रस्ते विकास प्रक्रियेत अडथळा ठरणारी ही अतिक्रमणे काढून टाकण्याबाबत रवींद्र चौधरी आणि सुषमा वाळिंबे यांना नगरपालिकेने यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या.त्यांनी बंगल्याचे बांधकाम करताना संरक्षक भिंत रस्त्यावर अतिक्रमण करून बांधली होती. रस्त्याचे ९ मीटरचे रुंदीकरण करण्याचे नगरपालिकेचे नियोजन होते. तर विकास आराखड्यात बांधकाम करतेवेळी ६ मीटरचा रस्ता असल्याचे संबंधितांचे म्हणणे होते.मुख्याधिकारी डॉ. काटकर यांच्यासह नगरपालिकेचे बांधकाम विभाग प्रमुख व्ही. एन. देशमुख, नगरसेवक भाऊ कुंभार, जुन्नरचे पोलीस निरीक्षक के. के. खराडे, विनय खत्री, हरी गायकवाड, अरुण मंचरकर तसेच अतिक्रमण विभाग पथक या वेळी उपस्थित होते.याप्रकरणी मात्र संबंधितांनी अतिक्रमण काढून टाकण्याऐवजी नगरपालिकेच्या विरोधात जुन्नर न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना काही दिवसांचा स्थगिती आदेश दिला होता. त्यानंतर नगरपालिकेने कॅव्हेट दाखल केले होते. त्यानंतर त्यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र सत्र न्यायालयाने त्यांना पुन्हा जुन्नर न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. मात्र शहर विकासाच्या प्रक्रियेत कोणाही नागरिकाला अडथळा करता येत नाही. शहर विकासाच्या महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमातील तरतुदींचा आधार घेऊन कायदेशीर प्रक्रियेने पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे जेसीबी लावून काढण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणJunnarजुन्नर