शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

गारपिटीमुळे फळबागांसह पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST

पाईट: परिसरात बुधवारी रात्री झालेल्या गारपिटीमुळे फळबागांसह बाजारी, भुईमूग, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी ...

पाईट: परिसरात बुधवारी रात्री झालेल्या गारपिटीमुळे फळबागांसह बाजारी, भुईमूग, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या आंबा पिकाचे नुकसान झाले असून वीटभट्ट्यांनाही फटका बसला आहे. दरम्यान, कृषी, महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पाईट परिसरातील कोये, धामणे, कुरकुंडी, तळवडे, रौंधळवाडी, किवळे या परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारपिटीचा पाऊस झाला. यामध्ये आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला कांदा पीकही वाया गेले आहे. यामध्ये उन्हाळी बाजरीचे नुकसान झाल्याचे प्रमाण सर्वाधिक असून आणि काढणी योग्य झालेली बाजरी पीक भुईसपाट झाली अचानक रात्री सात वाजल्यानंतर वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतातच साठवून पडलेला कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये शेतकऱ्यांना तातडीने कोणती उपाययोजना न करता आल्याने नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक आहे. गारपिटीची प्रमाण एवढे होते की तळवडे येथे रात्री पडलेल्या गारांचा थर सकाळी अकरा वाजेपर्यंत जशाच्या तसा होता.

पाईट परिसरामध्ये आंबा पीक घेणारे व शेतकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून वर्षातून एकदा येणारे नगदी पीक काही दिवसातच काढणीसाठी आलेले असताना अवकाळी झालेल्या गारपिटीमुळे आंबा पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले असून बहुतांश झाडांचे आंबे खाली पडले यामध्ये पडलेल्या आंबचा कोणताही उपयोग होणार नसल्याने या वर्षीचे फळबाग धारक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्यासाठी महसूल विभागास तातडीने सूचना देण्याची मागणी केली आहे. काळामध्ये शेतकरी संकटात असताना अवकाळी झालेल्या गारपिटीने फळबाग धारक फळबाग धारक शेतकरी व उन्हाळी पीक घेणारे शेतकरी अडचणीत सापडले असून त्यांना तातडीने मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

१५ पाईट

१५ पाईट १