शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पुरंदरच्या पूर्व भागात गारपीट

By admin | Updated: March 1, 2016 01:26 IST

पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस कमी प्रमाणात झाला; पण माळशिरस परिसरात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान फक्त गाराच पडू लागल्या

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस कमी प्रमाणात झाला; पण माळशिरस परिसरात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान फक्त गाराच पडू लागल्या. हलकासा पाऊस व गाराच जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. सध्या पुरंदर तालुक्यात कांदापिकाची काढणी सुरू आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाचा जोर वाढल्यास कांदापिकाची खराबी होणार आहे. या पावसाने कांद्याच्या बियाणांचे (गोट) नुकसान होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी डाळींब पिकाचे बहर धरलेले आहेत. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. पुरंदर तालुक्यात नांगरणीची कामे सुरू आहेत. जमिनी कडक जात असल्याने नांगरणीची कामे थांबली होती. या पावसामुळे नांगरणीच्या कामाला गती येणार आहे. खळद : परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारच्या तुलनेत सोमवारी पावसाचे प्रमाण जास्त होते. पावसाबरोवर वादळी वाऱ्यामुळे या परिसरातील पिकांचे नुकसान झाले आहे. चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. या वेळी पावसापेक्षा वादळी वाराच जास्त होता. यामुळे शेतक ऱ्यांची पिके झाकण्यासाठी धांदल उडाली. अनेक प्रवाशांचेही या पावसात हाल झाले. सध्या शेतात ज्वारी, हरभरा, गहू, कांदा या पिकांची काढणी, मळणीची कामे सुरू आहेत, तर अनेक ठिकाणी वैरणीच्या गंजी लावण्याची कामे सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सासवड : पिसर्वे गावाच्या परिसरात गारपीट केली. यामध्ये पावसापेक्षा गारांचे प्रमाण अधिक होते. सुमारे अर्धा तास झालेल्या या गारपिटीमुळे जमिनीवर गारांचा खच पडला होता. यामुळे परिसरातील डाळिंब, गहू, कांदा, हरभरा, गोटकांदा, आदि पिकांसह जनावरांच्या चार पिकांसह वैरणीचे नुकसान झाल्याचे पिसर्वे येथील शेतकरी संतोष सुरेश कोलते यांनी सांगितले. सध्या कांदा पिकाची काढणी सुरू आहे, अचानक गारपीट सुरु झाल्याने शेतकरी वगार्ची चांगलीच तारांबळ उडाली. उरुळी कांचन : गेल्या दोन-तीन दिवसांपासून वाढलेल्या उष्ण तापमानापासून अखेर सोमवारी नागरिकांना दिलासा मिळाला.आंब्याला मोहोर आला आहे, तर द्राक्ष पिकाच्या बागा सध्या घडांनी लगडलेल्या आहेत. त्या सर्व पिकांचे या पावसामुळे नुकसान होणार आहे. मुळातच शेतकरी दुष्काळाने पछाडलेला असताना पोटाला चिमटा घेत भविष्याची तजवीज करण्यासाठी शेतातील उभी पिके हालअपेष्टा सहन करीत जगविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना हे दुसरे अस्मानी संकट त्याच्यापुढे उभे राहिल्याने तो पुरता हवालदिल झाला आहे. (वार्ताहर)1भोर तालुक्याच्या पूर्व भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोंगवली परिसरातील गावांतील ज्वारी, हरभरा, गहू व कडबा भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर उसाच्या गाड्या शेतात अडकून पडल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सारोळे, पांडे सावरदरे, न्हावी १५, न्हावी ३२२, पेंजळवाडी, टापरेवाडी, गुणंद, वाठार, हिंगे, भोंगवली व परिसरातील गावांत मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे वावरात कापून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा व कडबा भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पावसाने हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.1भोर तालुक्याच्या पूर्व भागात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोंगवली परिसरातील गावांतील ज्वारी, हरभरा, गहू व कडबा भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर उसाच्या गाड्या शेतात अडकून पडल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सारोळे, पांडे सावरदरे, न्हावी १५, न्हावी ३२२, पेंजळवाडी, टापरेवाडी, गुणंद, वाठार, हिंगे, भोंगवली व परिसरातील गावांत मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे वावरात कापून ठेवलेली ज्वारी, गहू, हरभरा व कडबा भिजला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पावसाने हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार असल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.