शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

गुरोळीचा पाणीप्रश्न मार्गी

By admin | Updated: February 6, 2016 01:39 IST

गावाचे नाव अंजिराचा गाव म्हणून एकेकाळी दिल्लीपर्यंत पोहोचले होते. पण सातत्याने दुष्काळी परिस्थितीमुळे येथील बऱ्याच बागा शेतकऱ्यांनी तोडल्या

गराडे : गुरोळी (ता.पुरंदर) गावाचे नाव अंजिराचा गाव म्हणून एकेकाळी दिल्लीपर्यंत पोहोचले होते. पण सातत्याने दुष्काळी परिस्थितीमुळे येथील बऱ्याच बागा शेतकऱ्यांनी तोडल्या. पण आता शेतीसाठी पाणी हवे म्हणून गाव एक झाला. सरपंच रामचंद्र खेडेकर यांचे ५ लाख रुपये तसेच गावाचे ३७ लाख असे एकूण ४२ लाख रुपयांची वर्गणी गावाने जमविल्यानंतर गावाच्या लोकसहभागातून येथील पुरंदर उपसा जलसिंन याजनेच्या दिवे वितरेकेमधून ८००० फूट पाईप उपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे गुरोळी गावाचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. गुरोळी (ता. पुरंदर) येथे ग्रामस्थांच्या खर्चातून पुरंदर उपसाच्या पाईपलाईनची चाचणी करण्यात आली. पुरंदर उपसाच्या पाईपमधून पाणी बाहेर येताच ‘नाथ साहेबाचं चांगभलं’चा एकच जयघोष करीत फटाक्यांची आतषबाजी करीत ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. या वेळी गावातील २०० ते ३०० लोक तसेच शाळेतील विद्यार्थी व शिक्षकही उपस्थित होते. पाण्याचे पूजन सरपंच रामचंद्र खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी, साहेबराव भोसले, लक्ष्मण शिंगाडे, अमोल बंड, गोरख खेडेकर, बापूसाहेब खेडेकर, राजाराम खेडेकर, सुभाष खेडेकर, विलास जगताप, मधुकर खेडेकर, आनंद खेडेकर, विठ्ठलराव खेडेकर, काळुराम लवांडे, नानासाहेब कुंजीर, सुरेश खेडेकर, संपत खेडेकर, संतोष खेडेकर, रविंद्र खेडेकर, कैलास जाधव, तानाजी खेडेकर, हनुमंत खेडेकर आदी उपस्थित होते.(वार्ताहर)