शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

शेतकऱ्यांचा माल निर्यात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मार्गदर्शन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून शेतकऱ्यांसाठी शेतमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र सुरू होत आहे. राज्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून शेतकऱ्यांसाठी शेतमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र सुरू होत आहे. राज्याचे शेतमाल निर्यातीचे उद्दिष्ट वाढवण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे.

स्वातंत्र्यदिनी ही सर्व केंद्र सुरू होतील. जिल्हा कृषी कार्यालयात केंद्र असेल. तिथे निर्यातीमधील माहितगार अधिकारी नियुक्त असेल. निर्यातक्षम माल तयार करण्यापासून परदेशी बाजारपेठेत माल कसा पाठवायचा, सौदा कसा करायचा याची सर्व माहिती या केंद्रांमधून शेतकऱ्यांना दिली जाईल.

केंद्र सरकारने सन २०१८ मध्ये निर्यात धोरण तयार केले. त्यापाठोपाठ महाराष्ट्रानेही स्वतंत्र निर्यातकक्ष सुरू केला.

एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कोरोना काळात भारतामधून परदेशात ५८ हजार ७६ कोटी रुपयांच्या फळफळावळ व भाजीपाल्याची निर्यात झाली. त्यात महाराष्ट्राचा वाटा १३ हजार ८७७ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये द्राक्ष आणि आंबा निर्यातीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. आता सर्वच शेतीमालाला परदेशी बाजारपेठ मिळावी यासाठी राज्याने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. ग्रामीण भागात याची परिपूर्ण माहिती व्हावी या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात अशी मार्गदर्शक केंद्र सुरू करण्यात येत आहेत.

केंद्र सरकारने देशातील शेतीमाल परदेशात पाठवण्यासाठी स्वतंत्र संगणकीय यंत्रणा तयार केली आहे. त्याचा वापर आतापर्यंत महाराष्ट्रानेच सर्वाधिक केला आहे. आजमितीस राज्यातील ८० हजार शेतकरी राज्याच्या कृषी विभागाने या यंत्रणेला जोडले आहेत. आता ही यंत्रणा थेट जिल्हास्तरावर आणून शेतमाल निर्यातीमध्ये देशात राज्याला आघाडीवर आणण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.