शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

लैैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ, मुलांच्या संरक्षणाकडे पालक आणि शाळांचे होतेय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 07:08 IST

कोवळ्या सुकुमार वयामध्ये अल्पवयीन मुलांवर होणा-या लैैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटनांमुळे समाजात फोफावणा-या या विकृतीला आळा

पुणे : कोवळ्या सुकुमार वयामध्ये अल्पवयीन मुलांवर होणा-या लैैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटनांमुळे समाजात फोफावणा-या या विकृतीला आळा घालण्यासाठी सामाजिक स्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.खेळण्या-बागडण्याच्या वयात लैंगिक अत्याचाराचा सामना कराव्या लागल्यामुळे मुलांमध्ये मानसिक अस्वास्थ्य येऊ लागले आहे. आपली मुले शाळा, शिकवण्या, घर आणि घराच्या आसपास तरी सुरक्षित आहेत का? या कल्पनेनेच त्यांच्या अंगावर काटा येऊ लागला आहे. गेल्या चार वर्षांत पुण्यासारख्या पुरोगामी आणि सुधारणावादी शहरामध्येही बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे अडीच वर्षीय चिमुकलीचे घरामधून अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर खून करण्यात आला. अत्यंत अमानवी आणि निर्घृण कृत्यामुळे पुणेकर हादरून गेले आहेत. या घटनेमुळे पोलीसही सुन्न झाले आहेत.गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वांत खळबळजनक घटना असली तरी बाललैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असल्याचे दिसून येत आहे. अनेक घटना कुटुंबाची इभ्रत जाईल, बदनामी होईल या भीतीने पोलिसांत दिल्या जात नाहीत.अनेक जणांवर तर मुलांवर अशा प्रकारचे अत्याचार झाल्यानंतर घर सोडून जाण्याची वेळ येते. अल्पवयीनांपासून ते वृद्धापर्यंतचे विकृत अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी झालेले आहेत. केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियाही अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचे समोर आले आहे.सिंहगड रस्त्यावरील घटनेमुळे शहर ढवळून निघाले आहे. सिंहगड स्कूलमधील दुसरीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाने लैंगिक अत्याचार केल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. तर अशाच प्रकारच्या घटना वानवडी आणि कोंढव्यात उघडकीसआल्या होत्या. लहान मुलांवर अत्याचार करणाºयांमध्ये ओळखीच्यांचे आणि नातेवाइकांचे प्रमाण अधिक आहे. पालकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. यामध्ये वडील, भाऊ, मामा, काका, आजोबा अशा नात्यांचाही समावेश आहे. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये सर्वाधिक आरोपी हे १७ ते ४० वयोगटांतील आहेत.या सर्व घटना पाहता लहान मुलांची सुरक्षा नेमकी कोणावर सोपवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, केवळपोलीस या घटनांना पायबंद घालू शकतील, अशी समाजामधील सध्याची परिस्थिती नाही. कायदा सुव्यवस्थेपेक्षाही हा सामाजिक प्रश्न म्हणून पाहिला जाण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.लहान मुलींवर बलात्कार केला तर पुरुषाला असलेले गुप्तरोग दूर होतात अशी एक अंधश्रद्धा असते. त्यातच बाईकडे आजही वस्तू म्हणूनच पाहिले जात असल्याने ही छोटीशी वस्तू उचलली तरी ती ओरडणार नाही किंवा किंचाळणार नाही अशी एक मानसिकता त्यामागे असू शकते. मुळातच लहान मुलींवर अत्याचार केल्याने काय आनंद पुरुषाला मिळतो? या विकृतीमागची कारणे काय आहेत, याचा अभ्यास व्हायला हवा. तर काहीतरी ठोस उपाययोजना करता येतील. राज्य महिला आयोगाने या गुन्हेगारांच्या मानसिकतेचा केस स्टडी करण्याची मागणी केली पाहिजे.- विद्या बाळ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यालहान मुलांवरील लैैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत हे खरे आहे. शाळेत एखाद्या मुलावर लैैंगिक अत्याचार झाला असेल तर शाळा प्रशासनाला याची वाच्यता व्हायला नको असते. यासाठी शाळा, वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये जाणीव जागृती कार्यक्रम राबविणे हाच त्यावरील प्रतिबंधक उपाय आहे, त्यासाठी आम्ही स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वस्त्या तसेच शाळांमध्ये अनेक वर्षांपासून जाणीव जागृती कार्यक्रम घेत आहोत. शाळांमध्ये आम्ही सेशन घेतो तेव्हा मुले नकळतपणे बोलून जातात. तेव्हा त्यांना धीर देऊन बोलते करण्याचा प्रयत्न करतो. मुलांना प्रेम, आकर्षण आणि मैत्री या भावना त्यांना उमजेल अशा भाषेत समजावून सांगण्याचीही आज गरज आहे. मुलांना खूप गोष्टी जाणून घ्यायच्या असतात, अशा माहितीसाठी किंवा काहीतरी सांगण्यासाठी आमच्या हेल्पलाईनवर महिन्याला १00 कॉल्स येतात- नंदिनी अंबिके,कार्यकारी संचालक, फाउंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन