शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

मराठी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढतोय कल

By admin | Updated: April 26, 2017 02:48 IST

राज्यात शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा झाला असल्याच्या चर्चेने जोर धरला असतानाच शासनाची ध्येय आणि धोरणे मराठी माध्यमांच्या शाळांना

बेल्हा : राज्यात शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा झाला असल्याच्या चर्चेने जोर धरला असतानाच शासनाची ध्येय आणि धोरणे मराठी माध्यमांच्या शाळांना मारक ठरत असल्याचे समोर आले. मात्र मराठी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. सध्या राज्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले असून राज्य शासनाने इंग्रजी माध्यमांच्या शाळांना परवानगी देताना जराही आखडता हात घेतला नाही. कोणत्याही शाळेला परवानगी देताना दोन शाळांमधील अंतर कमीत कमी चार किलोमीटर असावे, असा निकष आहे. मात्र हा निकष फक्त मराठी माध्यमांच्याच शाळांना लागू करण्यात आला आहे. इंग्रजी शाळांना मात्र यामधून सवलत मिळाल्यामुळे भांडवलदारांनी गावागावातून इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभ्या केल्या. या शाळांना परवानग्या देताना दोन शाळांमधील अंतराचा निकष का लागू नाही? लागू असेल तर या शाळांना परवानगी कशी देण्यात आली? हा संशोधनाचा विषय आहे. पालक आणि त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळांचे आकर्षण असल्यामुळे अनेक पालक भरमसाट फी भरून त्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढला असल्यामुळे त्यांनी मराठी माध्यमांच्या शाळांकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत होते.पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला असल्यामुळे मराठी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थीसंख्या रोडावली आहे. त्यामुळे शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. (वार्ताहर)