शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

पिकवणारा उपाशी, दलाल तुपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST

सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ बारामती : कोरोना संकट आणि त्यानंतर आलेली टाळेबंदी यामुळे शेती व्यवसाय पूर्णतः अस्थिर झाला आहे. ...

सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

बारामती : कोरोना संकट आणि त्यानंतर आलेली टाळेबंदी यामुळे शेती व्यवसाय पूर्णतः अस्थिर झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात उठाव मिळत नाही. व्यापारी आणि विक्रेते मात्र मनमर्जीप्रमाणे तरकारीचे दर लावून ग्राहकांना विकतात. त्यामुळे पिकवणारा उपाशी, तर दलाल तुपाशी असे चित्र सध्या आहे.

कोरोना संक्रमण कमी झाल्यानंतर डिसेंबर-जानेवारी मध्ये कोबी आणि फ्लॉवरची एक एकर क्षेत्रावर लागवड केली. मात्र माल बाजारात जाण्याची वेळ येताच पुन्हा कोरोना रुग्णवाढ होऊ लागल्याने हॉटेल व्यवसायावर बंधने येऊ लागली. परिणामी १६० किलो माल पाठवला तरी हातात केवळ १०० रुपये आले. त्यामुळे पीक सोडून द्यावे लागले. आज उभ्या पिकामध्ये जनावरे बांधली आहेत, अशी व्यथा काशिनाथ भोसले या तरुण शेतकऱ्याने मांडली.

--

खर्च पंचवीस हजार, उत्पन्न १०० रूपडे

काशिनाथ भोसले या शेतकऱ्याला २५ हजारांच्या भांडवली खर्चानंतर केवळ शंभर रुपये हातात मिळाले, हा वाईट अनुभव सांगताना भोसले म्हणाले की, कोबी आणि फ्लॉवरचे पीक लावणीपासून ते काढणीपर्यंत एकरी २५ हजाराचा खर्च झाला. पीक देखील चांगले आले. उन्हाळ्यात पर्यटन वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, चायनीज सेंटर अशाठिकाणी कोबी आणि फ्लॉवरला चांगली मागणी असते. मात्र मार्च महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्य वाढू लागल्याने सर्वत्र बंधने आली. शासनाने देखील निर्बंध आणले. परिणामी पुणे येथील बाजार समितीमध्ये अवघ्या १ रुपया किलोने कोबी गेला. फ्लॉवरची देखील तीच परिस्थिती. लासुर्णे येथून पुण्याला मी ४० किलोच्या चार गोण्या माल पाठवला. एका गोणीचे ८० रुपये झाले. त्यामध्ये प्रत्येक गोणीचे भाडे ५० रुपये आणि इतर खर्च ५ रुपये. त्यामुळे एका गोणीमागे केवळ २५ रुपये राहिले. १६० किलो मालाचे मला केवळ १०० रुपये मिळाले. त्यामुळे पुन्हा बाजारात माल पाठवला नाही. पीक सोडून दिले. २५ हजार खर्च करून केवळ १०० रुपये हाती लागले.

--------------------------------

फोटो क्रमांक- १५बारामती पिकविणारा उपाशी

फोटो ओळी : भोसले यांनी सोडून दिलेले कोबीचे पीक. व शेतात चरत असलेली जनावरे

----------------------------