शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गंजी लावलेल्या कडब्याला चढा दर

By admin | Updated: May 9, 2017 03:30 IST

सध्या दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यातील असलेल्या सर्वच विहिरींनी तळ गाठले आहेत. पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवडापुरी : सध्या दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे तालुक्यातील असलेल्या सर्वच विहिरींनी तळ गाठले आहेत. पाणी नसल्याने पिके जळू लागली आहेत. त्यामुळे सध्या जनावरांना हिरवा चारा मिळत नसल्याने गंजी लावलेल्या कडब्यालाच चढ्या भावाने खरेदी करताना तालुक्यातील शेतकरी दिसत आहेत.गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीचे पीक घेतले होते. कडबा चांगल्या प्रमाणात निघाल्यामुळे चारा उपलब्ध झाला होता. तसेच मकापिकसुद्धा चांगल्या प्रमाणात लावल्यामुळे मकवनसुद्धा जनावरांच्या चाऱ्यासाठी उपलब्ध झाले होते. शेतकऱ्यांनी चारा उपलब्ध असावा, म्हणून मोठ्या प्रमाणात कडबा मकवन खरेदी केले होते. परंतु ते संपत आल्याने उन्हाळ्यात आणखी खरेदी करण्यासाठी शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांकडे फिरत आहेत. परंतु उन्हाळ्यात विहिरींनी तळ गाठल्यामुळे हिरवा चारा उपलब्ध नसल्याने गंजी लावलेल्या कडब्याला व रानात असलेल्या मकवनाला चढा दर मिळत आहे. सध्या कडक दुष्काळात जनावरांना जगविणे मोठ्या जिकीरीचे झाले आहे. चाऱ्याला उन्हाळ्यात सोन्याचे दिवस आल्याचे ग्रामीण भागामध्ये पाहावयास मिळत आहे.