शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

गट होणार ५० ते ५१ हजार लोकसंख्येचा

By admin | Updated: July 6, 2016 03:15 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांच्या फेररचनेच्या कामाला आला असून, जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला सन २०११ ची तालुकानिहाय व जातीनिहाय लोकसंख्या कळविले आहे.

- सुषमा नेहरकर-शिंदे, पुणे

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट-गणांच्या फेररचनेच्या कामाला आला असून, जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाला सन २०११ ची तालुकानिहाय व जातीनिहाय लोकसंख्या कळविले आहे. यामध्ये तेरा तालुक्याची लोकसंख्या तब्बल ३८ लाख ३४ ऐवढी झाली आहे. त्यामुळे आता एका गटासाठी लोकसंख्या पन्नास हजारांच्या पुढे जाणार आहे.जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आगामी निवडणुका फेबु्रवारी २०१७ मध्ये होणार आहेत. या निवडणुकीची पूर्वतायरी म्हणून गट-गणांची फेररचनेचे काम आॅगस्टपासून सुरु होणार आहे. यासाठी पूर्वीची लोकसंख्या, गट-गणांची लोकसंख्या, सन २०११ ची तालुकानिहाय लोकसंख्या, जातीनिहाय लोकसंख्या आदी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे मागवली होती. त्यानुसार सर्व माहिती जिल्हा प्रशासनाने नुकतीच आयोगाला पाठविली आहे. यामध्ये सन २०११ ची लोकसंख्या विचार घेतली असता तेरा तालुक्याची लोकसंख्या ३८ लाख ३४ हजारांच्या पुढे गेली आहे. जिल्हा परिषदेचे सध्या ७५ गट व पंचायत समित्यांचे १५० गण आहेत. शासनाच्या नियमानुसार गटांची जास्तीत जास्त संख्या ७५ पेक्षा अधिक असू शकत नाही. त्यामुळे सध्याची लोकसंख्या विचारामध्ये घेता एका गटांची लोकसंख्या ५० हजारांच्या पुढे जाणार आहे.जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत नव्याने काही नगरपालिका स्थापन झाल्या आहेत. तर काही नगरपालिकांची हद्द वाढविण्यात आली आहे. यामुळे गटांमध्ये सामाविष्ट असलेली सुमारे १ लाख २३ हजार ४४२ लोकसंख्या कमी झाली आहे. यामध्ये बारातमी नगर परिषदेची हद्द वाढविण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेच्या गटात समाविष्ट असलेली रुई, जळोंची, तांदुळवाडी, बारामती ग्रामीण या गावांची लोकसंख्या कमी झाली. तर खेड तालुक्यामध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या राजगुरुनगर आणि चाकण या नगरपरिषदांमुळे एक-एक गणच कमी झाला आहे. एकूण लोकसंख्या आणि गटांची लोकसंख्या विचार केला असता जिल्ह्यात बारामती तालुक्यातील तब्बल दोन गट कमी होण्याची शक्यता आहे. तर भोर तालुक्यातील देखील एक गट कमी होण्याची शक्यता आहे. तर खेड आणि हवेली तालुक्यातील गटांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.तालुका गट सन २०११अपेक्षितलोकसंख्या गटमुळशी३१७१००६३इंदापूर७३५७६६८७पुरंदर४१८९३२३४खेड७३५१७६६७आंबेगाव५२३५९७२५जुन्नर८३७३९८७८वेल्हा२५४५१६२भोर४१६७६६३३मावळ५२३३४२६५हवेली१०६११६३११२दौंड७३३१०४६६शिरुर६३७४९६२७बारामती७३२१४४८६