शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सृष्टीच्या समतोलासाठी गुरुतत्त्वयोगप्रणित सामुदायिक सहजीवन पद्धतीच उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संपूर्ण जीवसृष्टी अपघाताने निर्माण झालेली नाही. विश्वजीवनात आनंद-चैतन्य-सुखसमाधानाचे प्रगटीकरण व्हावे असा विश्वकर्त्याचा हेतू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संपूर्ण जीवसृष्टी अपघाताने निर्माण झालेली नाही. विश्वजीवनात आनंद-चैतन्य-सुखसमाधानाचे प्रगटीकरण व्हावे असा विश्वकर्त्याचा हेतू आहे. विश्वातील प्रत्येक घटक त्याची भूमिका योग्य पद्धतीने निभावण्याकरिता आलेला आहे; परंतु मानव मात्र विश्वप्रगटीकरणात त्याला दिलेली भूमिका विसरला आहे. त्यामुळे मानवाविरुद्ध सृष्टीतील जीवजंतू, प्राणिमात्रांनी युद्ध पुकारले आहे. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी गुरुतत्त्वयोगप्रणित सामुदायिक सहजीवन पद्धतीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी केले.

गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि.२७) सरदार यांनी गुरुतत्त्वयोग साधकांशी ऑनलाईन संवाद साधत सहजीवनाचे महत्त्व विशद केले.

ते म्हणाले, विश्वजीवनाचा तोल ढळण्यामागे केवळ आताचा मानव जबाबदार नाहीये तर मानवाच्या उत्क्रांतीपासूनच मानव चुकीच्या दिशेने जात आहे. तात्पुरत्या आणि फक्त स्वत:च्या सुखसमाधानासाठी मानवाचा प्रयत्न सुरू आहे. धर्मग्रंथ, साधुसंतांनी मानवाला त्याच्या चुका सांगण्याचा, मानवाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मानवाने त्याकडे कायम दुर्लक्ष केले असून प्राणिमात्रांचे, निसर्गाचे मानवाकडून शोषण सुरूच आहे. मानवाच्या चुकीच्या वाटचालीमुळे सृष्टीतील जीवजंतूंनी मानवाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. जीवजंतूंचे जगणे मानवाने नाहीसे करण्याचा प्रयत्न केला तर तेही तुमचे जगणे नाहीसे करणार हेही नक्की आहे. यावर उपाय म्हणजे गुरुतत्त्वप्रणीत सामुदायिक सहजीवन पद्धती आत्मसात करणे. सृष्टीतील जीवजंतूंशी मानवाने शब्दाविना संवाद साधला, क्षमायाचना केली तर सृष्टीचा ढासळत चाललेला तोल सावरण्यास मदत होईल, या मुद्द्याकडे सरदार यांनी लक्ष वेधले.

गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञानातील वेगवेगळ्या विषयांवर तेजा दिवाण, मुक्ता पाध्ये, स्मिता काळे आणि सुचित्रा पेंडसे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. हेमलता मांडे, ज्योती औटी, उमा शिंदे, वैशाली दामोदरे यांनी गुरुतत्त्वयोगाविषयी अनुभवकथन केले. गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदार यांच्या हस्ते झाले.

तेजा दिवाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.