शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सृष्टीच्या समतोलासाठी गुरुतत्त्वयोगप्रणित सामुदायिक सहजीवन पद्धतीच उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संपूर्ण जीवसृष्टी अपघाताने निर्माण झालेली नाही. विश्वजीवनात आनंद-चैतन्य-सुखसमाधानाचे प्रगटीकरण व्हावे असा विश्वकर्त्याचा हेतू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संपूर्ण जीवसृष्टी अपघाताने निर्माण झालेली नाही. विश्वजीवनात आनंद-चैतन्य-सुखसमाधानाचे प्रगटीकरण व्हावे असा विश्वकर्त्याचा हेतू आहे. विश्वातील प्रत्येक घटक त्याची भूमिका योग्य पद्धतीने निभावण्याकरिता आलेला आहे; परंतु मानव मात्र विश्वप्रगटीकरणात त्याला दिलेली भूमिका विसरला आहे. त्यामुळे मानवाविरुद्ध सृष्टीतील जीवजंतू, प्राणिमात्रांनी युद्ध पुकारले आहे. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी गुरुतत्त्वयोगप्रणित सामुदायिक सहजीवन पद्धतीच उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी केले.

गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी (दि.२७) सरदार यांनी गुरुतत्त्वयोग साधकांशी ऑनलाईन संवाद साधत सहजीवनाचे महत्त्व विशद केले.

ते म्हणाले, विश्वजीवनाचा तोल ढळण्यामागे केवळ आताचा मानव जबाबदार नाहीये तर मानवाच्या उत्क्रांतीपासूनच मानव चुकीच्या दिशेने जात आहे. तात्पुरत्या आणि फक्त स्वत:च्या सुखसमाधानासाठी मानवाचा प्रयत्न सुरू आहे. धर्मग्रंथ, साधुसंतांनी मानवाला त्याच्या चुका सांगण्याचा, मानवाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मानवाने त्याकडे कायम दुर्लक्ष केले असून प्राणिमात्रांचे, निसर्गाचे मानवाकडून शोषण सुरूच आहे. मानवाच्या चुकीच्या वाटचालीमुळे सृष्टीतील जीवजंतूंनी मानवाविरुद्ध युद्ध पुकारले आहे. जीवजंतूंचे जगणे मानवाने नाहीसे करण्याचा प्रयत्न केला तर तेही तुमचे जगणे नाहीसे करणार हेही नक्की आहे. यावर उपाय म्हणजे गुरुतत्त्वप्रणीत सामुदायिक सहजीवन पद्धती आत्मसात करणे. सृष्टीतील जीवजंतूंशी मानवाने शब्दाविना संवाद साधला, क्षमायाचना केली तर सृष्टीचा ढासळत चाललेला तोल सावरण्यास मदत होईल, या मुद्द्याकडे सरदार यांनी लक्ष वेधले.

गुरुतत्त्वयोग तत्त्वज्ञानातील वेगवेगळ्या विषयांवर तेजा दिवाण, मुक्ता पाध्ये, स्मिता काळे आणि सुचित्रा पेंडसे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. हेमलता मांडे, ज्योती औटी, उमा शिंदे, वैशाली दामोदरे यांनी गुरुतत्त्वयोगाविषयी अनुभवकथन केले. गुरुतत्त्ववेध स्मरणिकेचे प्रकाशन अभयकुमार सरदार यांच्या हस्ते झाले.

तेजा दिवाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.