शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

कमी आणेवारीच्या गावात शेतकऱ्यांसाठी अनुदान

By admin | Updated: December 31, 2014 23:25 IST

पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर व पुरंदर या ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानवाटप सुरू करण्यात आले आहे.

महेंद्र कांबळे ल्ल बारामतीसतत ४ वर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर व पुरंदर या ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानवाटप सुरू करण्यात आले आहे. या ५ तालुक्यांसाठी ५३ कोटी रुपयांची मागणी होती. त्यांपैकी २५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अनुदानात वाढ करण्यात आली आहे. ही बाब दुष्काळी गावातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरणार आहे. सन २०१२-१३ मधील खरीप व रब्बी हंगामांतील बाधित शेतकऱ्यांना कृषीपिकांसाठी व फळबागांसाठी अनुदान शासनाकडून उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात एकूण १८४ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामध्ये बारामती ६७, शिरूर २८, इंदापूर ३६, दौंड १९, पुरंदर ३४ अशी तालुकानिहाय गावांची आकडेवारी आहे. याच हंगामासाठी पूर्वी ११ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. महसूल विभागाने एकूण ५३ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यांपैकी २५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. २८ कोटी रुपये येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध झालेल्या अनुदानाचे वाटप तालुकानिहाय मंडल कार्यालयांच्या अंतर्गत केले जात आहेत. या संदर्भात माहिती देताना उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले, की उपलब्ध झालेल्या अनुदानाचे तत्काळ वाटप केले जात आहे. आता २५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावांच्या संख्येनुसार या अनुदानाचे वितरण तहसील कार्यालयांना करण्यात आले आहे. सर्वाधिक ६७ गावे बारामती तालुक्यातील आहेत. त्यांपैकी ३० गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी या संदर्भात सांगितले, की ९ कोटी ६८ लाख ४६ हजार १० रुपये इतके अनुदान मिळाले आहे. वडगाव निंबाळकर सर्कल अंतर्गत करंजे, देऊळवाडी, कानाडवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, लोणी भापकर मंडलांतर्गत माळवाडी, लोणी भापकर, सायंबाचीवाडी, पळशी, मासाळवाडी, मुढाळे, जळकेवाडी, ढाकाळे, अंजनगाव, खामगळवाडी, कऱ्हावागज, जळगाव कडेपठार, भिलारवाडी, काऱ्हाटी, मोरगाव मंडलांतर्गत मोढवे, मोरगाव, उंबरवाडी, मुर्टी, मोराळवाडी, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी, तरडोली, बाबुर्डी, शेरेवाडी या गावांतील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप थेट खात्यावर करण्यात येणार आहे. ४आणेवारी कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना यापूर्वी हेक्टरी ३ हजार रुपये अनुदान मिळत होते. आता त्यामध्ये दीड हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हेक्टरी साडेचार हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर बागायती भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १६ हजार रुपये, फळबागांसाठदेखील वेगळ्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. ४शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अनुदान प्राप्त झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. उर्वरित २८ कोटी रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसांतच मिळेल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.