शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

कमी आणेवारीच्या गावात शेतकऱ्यांसाठी अनुदान

By admin | Updated: December 31, 2014 23:25 IST

पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर व पुरंदर या ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानवाटप सुरू करण्यात आले आहे.

महेंद्र कांबळे ल्ल बारामतीसतत ४ वर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या, ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर व पुरंदर या ५ तालुक्यांतील शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदानवाटप सुरू करण्यात आले आहे. या ५ तालुक्यांसाठी ५३ कोटी रुपयांची मागणी होती. त्यांपैकी २५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. जिरायती भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अनुदानात वाढ करण्यात आली आहे. ही बाब दुष्काळी गावातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरणार आहे. सन २०१२-१३ मधील खरीप व रब्बी हंगामांतील बाधित शेतकऱ्यांना कृषीपिकांसाठी व फळबागांसाठी अनुदान शासनाकडून उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात एकूण १८४ गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामध्ये बारामती ६७, शिरूर २८, इंदापूर ३६, दौंड १९, पुरंदर ३४ अशी तालुकानिहाय गावांची आकडेवारी आहे. याच हंगामासाठी पूर्वी ११ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले होते. महसूल विभागाने एकूण ५३ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यांपैकी २५ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. २८ कोटी रुपये येत्या काही दिवसांत मिळण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध झालेल्या अनुदानाचे वाटप तालुकानिहाय मंडल कार्यालयांच्या अंतर्गत केले जात आहेत. या संदर्भात माहिती देताना उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले, की उपलब्ध झालेल्या अनुदानाचे तत्काळ वाटप केले जात आहे. आता २५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावांच्या संख्येनुसार या अनुदानाचे वितरण तहसील कार्यालयांना करण्यात आले आहे. सर्वाधिक ६७ गावे बारामती तालुक्यातील आहेत. त्यांपैकी ३० गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. बारामतीचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी या संदर्भात सांगितले, की ९ कोटी ६८ लाख ४६ हजार १० रुपये इतके अनुदान मिळाले आहे. वडगाव निंबाळकर सर्कल अंतर्गत करंजे, देऊळवाडी, कानाडवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, लोणी भापकर मंडलांतर्गत माळवाडी, लोणी भापकर, सायंबाचीवाडी, पळशी, मासाळवाडी, मुढाळे, जळकेवाडी, ढाकाळे, अंजनगाव, खामगळवाडी, कऱ्हावागज, जळगाव कडेपठार, भिलारवाडी, काऱ्हाटी, मोरगाव मंडलांतर्गत मोढवे, मोरगाव, उंबरवाडी, मुर्टी, मोराळवाडी, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, जोगवडी, तरडोली, बाबुर्डी, शेरेवाडी या गावांतील शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप थेट खात्यावर करण्यात येणार आहे. ४आणेवारी कमी असलेल्या गावातील शेतकऱ्यांना यापूर्वी हेक्टरी ३ हजार रुपये अनुदान मिळत होते. आता त्यामध्ये दीड हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हेक्टरी साडेचार हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर बागायती भागातील शेतकऱ्यांसाठी हेक्टरी १६ हजार रुपये, फळबागांसाठदेखील वेगळ्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. ४शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला असताना नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अनुदान प्राप्त झाल्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. उर्वरित २८ कोटी रुपयांचे अनुदान येत्या काही दिवसांतच मिळेल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.