शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

जिरायती पिकं जगविली!

By admin | Updated: November 26, 2015 01:02 IST

पावसाच्या बेभरवशामुळे यंदा खरीप हंगाम भात वगळता वायाच गेला. रब्बीलाही फटका बसून आजपर्यंत फक्त २८ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

पुणे : पावसाच्या बेभरवशामुळे यंदा खरीप हंगाम भात वगळता वायाच गेला. रब्बीलाही फटका बसून आजपर्यंत फक्त २८ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. रविवारी व सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गहू पेरण्यांची लगबग वाढली असून, जिरायती पिकं जगवली अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. मात्र, डाळिंब, द्राक्ष, कांदा उत्पादकांना थोडी काळजी असून, पुढील काळात रोगापासून पीक वाचविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात अवकाळीचे ढग दाटून आले आणि संध्याकाळनंतर बारामती वगळता सर्वच तालुक्यांत कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. सरासरी २५.१२ मिलिमीटर पाऊस झाला. दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आणि १४.३६ मिलिमीटर तो बरसला. या दोन दिवसांत जिल्ह्यात २९.४८ मिलिमीटर पाऊस झाला.मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. यात रविवारी ३३.२८ व सोमवारी ३८.४२ असा ७१.७ मिलिमीटर पाऊस झाला. तर, सर्वांत कमी ३.७२ मिलिमीटर इंदापूर तालुक्यात झाला. यंदा जिल्ह्यात दर वर्षीपेक्षा पावसाची मोठी तूट आहे. धरणांतील पाणीसाठाही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. विहिरींची पातळीही खालावली आहे. यामुळे पाण्याची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. काही ठिकाणी आंदोलनेही झाली आहेत. जिल्ह्यात पावसाळ््यातही टँकर सुरूच राहिले असून, त्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. अशातच दोन दिवस झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)धान्य झाले नाही, तरी जनावरांना चारा मिळेलबरामती तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या अवकाळी पावसाने जिरायती पिकांना संजीवनी मिळाली. जनावरांना ज्वारी पिकांचा कडबा शाश्वत होणार असल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाने तारले आहे. मोरगाव, तरडोली, आंबी, मुर्टी आदी भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या ज्वारी पिकांला संजीवनी मिळाली आहे. या भागातील शाश्वत पीक म्हणूण गणले जाणारी ज्वारी पाण्याअभावी जळू लागली होती. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे धान्य नाही झाले तरी जनावरांना कडबा व बाटुक होणार आहे.हा पाऊस तसा जिरायती भागातील पिकांना जीवदान देऊन गेला. ढगाळ हवामान राहिले, तर पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठानेच शिफारस केलेल्या कीटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी करावी- रमेश धुमाळ, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद