शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती पिकं जगविली!

By admin | Updated: November 26, 2015 01:02 IST

पावसाच्या बेभरवशामुळे यंदा खरीप हंगाम भात वगळता वायाच गेला. रब्बीलाही फटका बसून आजपर्यंत फक्त २८ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

पुणे : पावसाच्या बेभरवशामुळे यंदा खरीप हंगाम भात वगळता वायाच गेला. रब्बीलाही फटका बसून आजपर्यंत फक्त २८ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. रविवारी व सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गहू पेरण्यांची लगबग वाढली असून, जिरायती पिकं जगवली अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. मात्र, डाळिंब, द्राक्ष, कांदा उत्पादकांना थोडी काळजी असून, पुढील काळात रोगापासून पीक वाचविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात अवकाळीचे ढग दाटून आले आणि संध्याकाळनंतर बारामती वगळता सर्वच तालुक्यांत कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. सरासरी २५.१२ मिलिमीटर पाऊस झाला. दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आणि १४.३६ मिलिमीटर तो बरसला. या दोन दिवसांत जिल्ह्यात २९.४८ मिलिमीटर पाऊस झाला.मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. यात रविवारी ३३.२८ व सोमवारी ३८.४२ असा ७१.७ मिलिमीटर पाऊस झाला. तर, सर्वांत कमी ३.७२ मिलिमीटर इंदापूर तालुक्यात झाला. यंदा जिल्ह्यात दर वर्षीपेक्षा पावसाची मोठी तूट आहे. धरणांतील पाणीसाठाही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. विहिरींची पातळीही खालावली आहे. यामुळे पाण्याची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. काही ठिकाणी आंदोलनेही झाली आहेत. जिल्ह्यात पावसाळ््यातही टँकर सुरूच राहिले असून, त्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. अशातच दोन दिवस झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)धान्य झाले नाही, तरी जनावरांना चारा मिळेलबरामती तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या अवकाळी पावसाने जिरायती पिकांना संजीवनी मिळाली. जनावरांना ज्वारी पिकांचा कडबा शाश्वत होणार असल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाने तारले आहे. मोरगाव, तरडोली, आंबी, मुर्टी आदी भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या ज्वारी पिकांला संजीवनी मिळाली आहे. या भागातील शाश्वत पीक म्हणूण गणले जाणारी ज्वारी पाण्याअभावी जळू लागली होती. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे धान्य नाही झाले तरी जनावरांना कडबा व बाटुक होणार आहे.हा पाऊस तसा जिरायती भागातील पिकांना जीवदान देऊन गेला. ढगाळ हवामान राहिले, तर पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठानेच शिफारस केलेल्या कीटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी करावी- रमेश धुमाळ, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद