शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

जिरायती पिकं जगविली!

By admin | Updated: November 26, 2015 01:02 IST

पावसाच्या बेभरवशामुळे यंदा खरीप हंगाम भात वगळता वायाच गेला. रब्बीलाही फटका बसून आजपर्यंत फक्त २८ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

पुणे : पावसाच्या बेभरवशामुळे यंदा खरीप हंगाम भात वगळता वायाच गेला. रब्बीलाही फटका बसून आजपर्यंत फक्त २८ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. रविवारी व सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गहू पेरण्यांची लगबग वाढली असून, जिरायती पिकं जगवली अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. मात्र, डाळिंब, द्राक्ष, कांदा उत्पादकांना थोडी काळजी असून, पुढील काळात रोगापासून पीक वाचविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.रविवारी दुपारनंतर जिल्ह्यात अवकाळीचे ढग दाटून आले आणि संध्याकाळनंतर बारामती वगळता सर्वच तालुक्यांत कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. सरासरी २५.१२ मिलिमीटर पाऊस झाला. दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आणि १४.३६ मिलिमीटर तो बरसला. या दोन दिवसांत जिल्ह्यात २९.४८ मिलिमीटर पाऊस झाला.मावळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. यात रविवारी ३३.२८ व सोमवारी ३८.४२ असा ७१.७ मिलिमीटर पाऊस झाला. तर, सर्वांत कमी ३.७२ मिलिमीटर इंदापूर तालुक्यात झाला. यंदा जिल्ह्यात दर वर्षीपेक्षा पावसाची मोठी तूट आहे. धरणांतील पाणीसाठाही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. विहिरींची पातळीही खालावली आहे. यामुळे पाण्याची मागणी सर्वत्र होऊ लागली आहे. काही ठिकाणी आंदोलनेही झाली आहेत. जिल्ह्यात पावसाळ््यातही टँकर सुरूच राहिले असून, त्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. अशातच दोन दिवस झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)धान्य झाले नाही, तरी जनावरांना चारा मिळेलबरामती तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या अवकाळी पावसाने जिरायती पिकांना संजीवनी मिळाली. जनावरांना ज्वारी पिकांचा कडबा शाश्वत होणार असल्याने येथील शेतकऱ्यांना पावसाने तारले आहे. मोरगाव, तरडोली, आंबी, मुर्टी आदी भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या ज्वारी पिकांला संजीवनी मिळाली आहे. या भागातील शाश्वत पीक म्हणूण गणले जाणारी ज्वारी पाण्याअभावी जळू लागली होती. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाचे धान्य नाही झाले तरी जनावरांना कडबा व बाटुक होणार आहे.हा पाऊस तसा जिरायती भागातील पिकांना जीवदान देऊन गेला. ढगाळ हवामान राहिले, तर पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढेल. शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठानेच शिफारस केलेल्या कीटकनाशके व बुरशीनाशकाची फवारणी करावी- रमेश धुमाळ, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद