शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
3
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
5
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
6
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
7
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
8
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
9
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
10
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
11
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
12
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
13
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
14
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
15
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
16
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
17
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
18
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
19
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
20
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड

ग्रामपंचायत निवडणूक, ५८.९८ टक्के मतदान

By admin | Updated: May 28, 2017 03:50 IST

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १३७ जागांसाठी शनिवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सायकाळी साडेसहा वाजेपर्यत ५८.९६ टक्के तर ३२ ग्रामपंचायतीच्या ९० जागांसाठी

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या १३७ जागांसाठी शनिवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सायकाळी साडेसहा वाजेपर्यत ५८.९६ टक्के तर ३२ ग्रामपंचायतीच्या ९० जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीसाठी ७०.०९ टक्के मतदान झाले आहे. येत्या ३० मे रोजी मतमोजणी होणार असल्याने उमेदवारांना निकालासाठी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. जिल्ह्यातील आंबेगाव , शिरूर आणि पुरंदर तालुक्यातील प्रत्येकी एक आणि हवेली तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी मतदान झाले. या चारही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सुमारे २८ हजार ९७६ मतदारांनी मतदान केले. त्यात १३ हजार २३९ महिला तर १५ हजार ७३७ पुरूष मतदारांचा समावेश आहे. हवेली तालुक्यातील उंड्री , पिसोळी, आंबेगाव बुद्रुक आणि नांदेड या चारही ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत ११.२३, साडेअकरा वाजेपर्यत २०.०२, दीड वाजेपर्यत ३३.५२, चारवाजेपर्यत ४३.७९ टक्के तर साडेसहा वाजेपर्यत ५३.९९ टक्के मतदान झाले आहे. तर आंबेगाव तालुक्यातील गलांडेवाडी (ओगलेवाडी) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सकाळी साडेनऊ वाजेपर्यत २०, साडेअकरा वाजेपर्यत ४४.३८, दीड वाजेपर्यत ६० चार वाजेपर्यत ६५.७५ टक्के तर साडे सहावाजेपर्यत ७०.४१ टक्केमतदान झाले. जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत एकूण ७०.०९ टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीत सायकांळी चार वाजेपर्यत सरासरी ६० टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील इंदापूर तालुका दोन, खेड चार, मुळशी सहा, आंबेगाव तीन, हवेली तीन,मावळ एक, पुरंदर तीन , जुन्नर सात, आणि शिरूर तालुक्यातील तीन अशा मिळून एकूण ३२ ग्रामपंचातीच्या निवडणुका होत्या. यामध्ये इंदापूर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत साडेसहा वाजेपर्यत ६४.०४ टक्के, खेड तालुक्यात चार ग्रामंपचायतीसाठी ५९.०४ टक्के, मुळशी तालुक्यातील सहा ग्रामपंचातीसाठी ८०.८० टक्के, आंबेगाव तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ७२.१७ टक्के, हवेली तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ७६.८६ टक्के, मावळ तालुक्यातील एक ग्रामपंचायतीसाठी ७३.१५ टक्के, पुरंदर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाअठी ८१.३२ टक्के, जुन्नर तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी ६२.३० टक्के, आणि शिरूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ८१.२७ टक्के मतदान झाले आहे.