शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
2
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
3
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
4
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
5
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
6
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
7
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
8
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
9
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
10
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
11
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
12
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
14
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
15
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
16
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
17
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
18
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
19
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
20
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी

तावरे कॉलनीतील भूखंड बळकावण्याचा डाव

By admin | Updated: July 8, 2017 03:05 IST

मित्रमंडळ चौकातील ९ एकर भूखंड बळकावण्याच्या प्रकारानंतर आता तावरे कॉलनी येथील शाळेच्या आरक्षित भूखंडांवर झोपडपट्टी

पुणे : मित्रमंडळ चौकातील ९ एकर भूखंड बळकावण्याच्या प्रकारानंतर आता तावरे कॉलनी येथील शाळेच्या आरक्षित भूखंडांवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा (एसआरए) घाट घातला जात आहे. महापालिकेने या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडे १० कोटी ४१ लाख रुपये जमा केल्यानंतरही हा प्रकार होत आहे, हे विशेष! नगरसेवक आबा बागुल यांच्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांनी या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.पर्वती येथील स. नं. ४७ वर तावरे कॉलनी येथे हा भूखंड आहे. गेल्या २० वर्षांपासून त्यावर विकास आराखड्यात प्राथमिक व माध्यमिक शाळेचे आरक्षण आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने तसा निर्णय घेतला आहे. भूसंपादनासाठी म्हणून राज्य सरकारकडे महापालिकेने १० कोटी ४१ लाख रुपये जमा केले आहेत. असे असताना याच जागेवर झोपडपट्टी पुनर्वसनाचा घाट घातला गेला. तसा आराखडाही महापालिकेकडेच सादर करण्यात आला.विकसक, झोपडपट्टी पुनर्वसन तसेच महापालिकेतील अधिकाऱ्यांचा हात यामागे असल्याचा आरोप बागुल यांनी केला. तेथील नागरिकांना धमकावणे, त्यांच्या घरावर चिठ्या लावणे असे प्रकार सुरू करण्यात आले आहेत. झोपडपट्टी पुवर्नसन करायचे असेल, तर तेथील नागरिकांची तशी मागणी असणे आवश्यक असते. मात्र, अशी कोणतीही मागणी नसताना तसेच महापालिका अधिकाऱ्यांची कसलीही परवानगी न घेता या जागेचा वापर करण्याचा प्रकार संगनमताने होत आहे.आयुक्तांनी घेतली दखल1त्यांनी थेट आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडेच तक्रार केली आहे. मित्र मंडळ चौकातील एक भूखंड बळकावण्याचा प्रकार होत आहे. यासाठी महापालिकेला न्यायालयीन लढाया कराव्या लागत आहेत. आता पुन्हा हा दुसरा प्रकार उघड होत आहे. महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाला महापालिकेच्या मालमत्तांची निगराणी करण्यात अपयश येत असल्याचेच यातून दिसते, अशी टीका बागुल यांनी केली. महापालिकेच्या किती जागा आहेत, याची त्यांच्याकडे व्यवस्थित नोंद नाही. अनेक जागा ताब्यातच नाहीत. ज्या आहेत, त्यांच्यावर कायदेशीर नावे लागलेली नाहीत, ती लागावीत यासाठी प्रयत्न होत नाहीत, अशा अनेक गोष्टी बागुल यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणल्या.2 आयुक्तांनी याची दखल घेऊन या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. याशिवाय महापालिकेच्या मालकीच्या जागांची, रिकाम्या भूखंडांची माहितीही त्यांनी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून मागवली आहे. ज्या भूखंडांबाबत कायदेशीर खटले सुरू आहेत, त्यात महापालिकेने काय भूमिका घेतली, याबाबतही त्यांनी विधी विभागाकडून अहवाल मागविला असल्याची माहिती बागुल यांनी दिली.