शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सहकार मोडीत काढण्याचा सरकारचा डाव : पवार

By admin | Updated: January 10, 2017 02:23 IST

‘‘देशात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री व सरकारमधील मंत्री खासदार यांना विचारात न घेता निर्णय घेतला. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे

कारेगाव : ‘‘देशात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री व सरकारमधील मंत्री खासदार यांना विचारात न घेता निर्णय घेतला. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे महंमद तुघलकी अवतार आहे. सहकार मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे,’’ असे मत शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले. न्हावरा फाटा (ता. शिरूर) येथे केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता पुणे-नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना निवेदन देण्यात आले.या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा युवक कॉँग्रेस अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बाजार समिती अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, तालुकाध्यक्ष रवी काळे, युवक अध्यक्ष कुंडलिक शितोळे, महिला अध्यक्ष विद्या भुजबळ, सदाशिव पवार, बाळासाहेब नागवडे अध्यक्ष, नगरसेवक जाकीरखान पठाण, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, नीलेश पवार, अमोल चव्हाण, दत्तात्रय हरगुडे, अनिल भुजबळ, लतिकाताई वराले, शंकर फराटे, बाळासाहेब भोर, शैलेश घाडगे, योगेश थोरात अजित इटनर, युवती राष्ट्रवादी काँग्रेस संगीता शेवाळे, अजय हिंगे, गिरीजा पाटील, बाळासाहेब ढमढेरे, दिलीप मोकाशी, रंगनाथ थोरात, श्रीनिवास घाडगे, पांडुरंग थोरात, जयसिंग कर्डिले, अँड. रवींद्र खाडरे, शिरीष लोळगे, पोपट दसगुडे, हाफीज बागवान, कलिम सय्यद, शिवाजीराव दरेकर, दिनकर पाडळे, हरिदास कर्डिले, सुरेश पाचर्णे उपस्थित होते.पवार म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात भाजपाने जीएसटी विधेयकाला विरोध केला आणि आता तेच विधेयक मंजुरीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. आधार कार्डसाठी विरोध केला, परंतु आता त्याच आधारचा सरकार आधार घेत आहे. नोटाबंदीमुळे विविध पिकांचा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतात कामे करायची की बँकेत रांगा लावायच्या, अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे. पेटीएमसारख्या परदेशी कंपनीला दररोज शेकडो कोटी रुपयांचा नफा होत आहे. (वार्ताहर)