शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

सहकार मोडीत काढण्याचा सरकारचा डाव : पवार

By admin | Updated: January 10, 2017 02:23 IST

‘‘देशात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री व सरकारमधील मंत्री खासदार यांना विचारात न घेता निर्णय घेतला. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे

कारेगाव : ‘‘देशात नोटाबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थतज्ज्ञ, अर्थमंत्री व सरकारमधील मंत्री खासदार यांना विचारात न घेता निर्णय घेतला. नोटाबंदीचा निर्णय म्हणजे महंमद तुघलकी अवतार आहे. सहकार मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे,’’ असे मत शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले. न्हावरा फाटा (ता. शिरूर) येथे केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाच्या निषेधार्थ शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याकरिता पुणे-नगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ व पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना निवेदन देण्यात आले.या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा युवक कॉँग्रेस अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, बाजार समिती अध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, तालुकाध्यक्ष रवी काळे, युवक अध्यक्ष कुंडलिक शितोळे, महिला अध्यक्ष विद्या भुजबळ, सदाशिव पवार, बाळासाहेब नागवडे अध्यक्ष, नगरसेवक जाकीरखान पठाण, युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे, नीलेश पवार, अमोल चव्हाण, दत्तात्रय हरगुडे, अनिल भुजबळ, लतिकाताई वराले, शंकर फराटे, बाळासाहेब भोर, शैलेश घाडगे, योगेश थोरात अजित इटनर, युवती राष्ट्रवादी काँग्रेस संगीता शेवाळे, अजय हिंगे, गिरीजा पाटील, बाळासाहेब ढमढेरे, दिलीप मोकाशी, रंगनाथ थोरात, श्रीनिवास घाडगे, पांडुरंग थोरात, जयसिंग कर्डिले, अँड. रवींद्र खाडरे, शिरीष लोळगे, पोपट दसगुडे, हाफीज बागवान, कलिम सय्यद, शिवाजीराव दरेकर, दिनकर पाडळे, हरिदास कर्डिले, सुरेश पाचर्णे उपस्थित होते.पवार म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात भाजपाने जीएसटी विधेयकाला विरोध केला आणि आता तेच विधेयक मंजुरीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. आधार कार्डसाठी विरोध केला, परंतु आता त्याच आधारचा सरकार आधार घेत आहे. नोटाबंदीमुळे विविध पिकांचा बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. शेतकऱ्यांनी शेतात कामे करायची की बँकेत रांगा लावायच्या, अशा अडचणीत शेतकरी सापडला आहे. पेटीएमसारख्या परदेशी कंपनीला दररोज शेकडो कोटी रुपयांचा नफा होत आहे. (वार्ताहर)