शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सरकारला सामान्यांचा विसर

By admin | Updated: October 15, 2015 01:03 IST

देशात मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. सामान्य माणसालाही जगण्याचा हक्क आहे, याचा सरकारला विसर पडलेला दिसतो

पुणे : देशात मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जात आहे. सामान्य माणसालाही जगण्याचा हक्क आहे, याचा सरकारला विसर पडलेला दिसतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण १२५ कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे सांगतात. त्यात मुस्लिमांचा समावेश नाही का, असा सवाल मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांनी केला. सय्यदभाई यांनी सामाजिक ध्रुवीकरणाचा निषेध करून ‘दगडावरची पेरणी’ या साहित्यकृतीसाठी मिळालेला न. चिं. केळकर पुरस्कार मानधनाच्या रकमेसह परत पाठविला आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, ‘‘भारतीय मुस्लिमांनाही जगण्याचा समान अधिकार आहे. या समाजाची सगळीकडून कुचंबणा होत आहे. सध्या देश जातीय दंगलींनी पोखरून निघाला आहे. मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून गेली ५० वर्षे मी विवेकवादाचे, सुधारणांचे कार्य करीत आहे. मात्र, या कार्यालाच आव्हान देणाऱ्या घटनांमुळे व्यथित होऊन मी पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.’’समाजात धर्मांधता वाढत चालली आहे. या विदारक परिस्थितीबाबत सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्याने पुरस्कार परत करणार असल्याचे लोकशाहीर संभाजी भगत यांनी सांगितले. त्यांना ‘नागरिक’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.