शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
4
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
5
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
6
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
7
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
8
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
9
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
10
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
11
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
12
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
13
कष्टाचं फळ! २६ व्या वर्षी रोज १८ तासांची ड्युटी करून तरुणीने घेतलं तब्बल ७ कोटींचं घर
14
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
15
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
16
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
17
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
18
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
19
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
20
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय चळवळीबाबत शासन उदासीन

By admin | Updated: October 12, 2016 02:25 IST

वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठी एकीकडे ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना राबविणारे राज्य शासन ग्रंथालय चळवळीबाबत उदासीन

पुणे : वाचन संस्कृतीला बळकटी देण्यासाठी एकीकडे ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना राबविणारे राज्य शासन गं्रंथालय चळवळीबाबत उदासीन आहे. मागील ४ वर्षांत शासनाने एकाही ग्रंथालयाला मान्यता दिलेली नाही. तर, सध्या अस्तित्वात असलेली अनेक ग्रंथालये अपुऱ्या निधीमुळे शेवटची घटका मोजत आहेत. जागेचा प्रश्न, अनुदान वेळेत न मिळणे, लोकप्रतिनिधींकडून होणारी उपेक्षा, अकारण लादण्यात आलेली बंधने, सेवकांचे अल्प मानधन अशा अनेक समस्यांना ग्रंथालयांना तोंड द्यावे लागत असल्याची तीव्र नाराजी पुणे जिल्ह्यातील ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर व्यक्त केली.पुणे शहर व जिल्ह्यातील ग्रंथालयांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी ‘लोकमत’शी उत्स्फूर्तपणे संवाद साधला. संघाचे अध्यक्ष विकास टिंगरे-पाटील, कार्यवाह सोपानराव पवार, कोशाध्यक्ष राजू घाटोळे, उपाध्यक्ष अरुण दांगट, मार्कंडेय मिठापल्ली, सहकार्यवाह विलास चोंधे, राजेंद्र ढमाले, कार्याध्यक्ष चंद्रशेखर कपोते, ज्योती बोलभट, संचालक अशोक जरे, श्याम मोरे, रमेश सुतार, भालचंद्र वाघ, संतोष गोफणे, दत्तात्रय खुटवड, धोंडीभाऊ जाधव, मोहन शिंदे, अंबादास कवळे, रामचंद्र जामदार, शिरूर शाखेचे अध्यक्ष हमीद तांबोळी, मुळशी शाखेचे अध्यक्ष अंकुश बोडके, वेल्हे शाखेचे अध्यक्ष संतोष रेणुसे या वेळी उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले.राज्यात वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यात ग्रंथालयांचा मोठा वाटा राहिला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही ग्रंथालय चळवळ पसरली आहे. मात्र, मागील काही वर्षांपासून राज्य शासनाकडून या चळवळीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे ग्रंथालयांना अवकळा येऊ लागली असल्याची खंत टिंगरे-पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘ग्रंथालय सुरू करण्यापासूनच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शहरी भागात जागेचा प्रश्न खूप मोठा आहे. ग्रंथालयांना दर्जानुसार मिळणारे अनुदान कमी आहे. त्यासाठीही दोन-दोन वर्षे वाट पाहावी लागते. अत्यल्प वेतनामुळे गं्रथपाल व सेवक मिळणे कठीण होते. त्यातच ग्रंंथालयांवर अनेक बंधने आणली जात आहेत. त्यामुळे ग्रंथालय चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. शासनाकडून दुर्लक्ष होत असले, तरी ग्रंथालय संघाकडून लोकवर्गणी तसेच काही लोकप्रतिनिधींच्या मदतीने ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वाचन संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी अनेक कार्यकर्ते धडपडत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम संघाकडून केले जात आहे.’’पवार म्हणाले, ‘‘मागील १० वर्षांपासून ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ झालेली नाही. सेवकांना मिळणारे मानधन तुटपुंजे आहे. वर्गवाढ, मान्यतेचा प्रश्न प्रलंबित आहे. ग्रंथालयांबाबत वेंकय्या पत्की समितीने दिलेला अहवाल राज्य शासनाने अद्याप स्वीकारलेला नाही. यामध्ये गं्रथपाल, सेवकांच्या वेतनश्रेणी, सेवाशर्ती, आर्थिक निकष या बाबींवर चांगल्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. आर्थिक कारण पुढे करून शिफारशींकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक ग्रंथालये अनेक वर्षांपासून एकाच वर्गात आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक भार सोसवत नाही. त्यामुळे वाचकांना चांगली सेवा देणे शक्य होत नाही. ही चळवळ जिवंत ठेवण्यासाठी जिल्हा संघामार्फत वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात शिबिरे, कार्याशाळा घेतल्या जातात. ग्रंथालयांच्या विविध समस्यांचा पाठपुरावा केला जातो.’’गं्रथालयांचा निधी इतरत्र वळविला जात असल्याचे घाटोळे यांनी सांगितले. वाचकांपर्यंत अधिकाधिक पोहोचण्यासाठी ‘गाव तिथे गं्रथालय’ ही चळवळ संघातर्फे राबविली जात आहे. प्रत्यक्षात शासनाकडून हे काम होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यांना पुस्तक खरेदी, ग्रंथालयासाठी निधी मिळतो; मात्र, पाठपुरावा केल्यानंतरही शहरातील मोजक्याच आमदार व नगरसेवकांनी ग्रंथालयांना मदत केली आहे. इतर लोकप्रतिनिधी उदासीन आहेत, अशी नाराजी घाटोळे यांनी व्यक्त केली.सोशल मीडिया, ई-ग्रंथालय या संकल्पनेमुळे प्रत्यक्ष ग्रंथालयात येऊन पुस्तक वाचण्याचे किंवा नेण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. १० वर्षांपूर्वीची स्थिती आता राहिलेली नाही. शहरापेक्षा ग्रामीण भागात ग्रंथालयांना चांगला प्रतिसाद मिळतो, असे दांगट म्हणाले.राष्ट्रपुरुषांची चरित्रेही शासनाकडे उपलब्ध होत नाहीत. ग्रंथालयांमध्ये या चरित्रांना वाचकांकडून प्रतिसाद मिळतो. याबाबतही शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे कपोते यांनी सांगितले. शासकीय व इतर ग्रंथालयांमध्ये शासनाकडून दुजाभाव केला जातो. शासकीय ग्रंथालयांना मोठा निधी मिळतो. त्यांची तपासणी होत नाही. कोणतेही निकष लावले जात नाहीत, असे सुतार यांनी नमूद केले.ग्रामीण भागातील कार्यकर्ते स्वत: धावपळ करून आर्थिक भार उचलून ग्रंथालय चळवळ टिकविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे रेणुसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)