शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

सरकार आल्यापासून तुमचे पाय हवेतच, ते जमिनीवर राहण्यातच आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “माझा दौरा हवाई नव्हे जमिनीवरून आहे,” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “माझा दौरा हवाई नव्हे जमिनीवरून आहे,” असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्या गुजरातच्या हवाई दौऱ्यावर भाष्य केले होते. त्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही उद्धव ठाकरे यांचा नामोल्लख न करता प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, “तुमचे पाय हे तुमचे सरकार आल्यापासूनच हवेत गेले आहेत. ते जमिनीवर राहण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि यातच आनंद आहे.”

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी चक्रीवादळाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नुकताच कोकणाचा दौरा केला. याविषयी पाटील म्हणाले की ते दोघेही विधिमंडळातील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर आढावा घेण्यासाठी त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दौरा केला. दोघांनी ठाणे, पालघर जिल्ह्यातल्या कोळी बांधवांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांचे सांत्वन केले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कधी नव्हेत ते बाहेर पडले. दीड वर्षांनी बाहेर पडल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांना उपदेश करण्याचे कारण नाही,” असे पाटील म्हणाले. त्यांनी सांगितले की, फडणवीस आणि दरेकर यांनी हवाई प्रवास केलेला नाही. पंतप्रधानपद हे एक असे पद आहे की ज्याबाबत धोका पत्करला जात नाही. त्यामुळे सुरक्षितता राखून पाहणी करायची तर हवाई मार्ग हीच परंपरा आहे.

चौकट

...म्हणून मोदी गोव्याला गेले

पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा करीत आर्थिक पॅकेज जाहीर करून महाराष्ट्राबाबत दुजाभाव केल्याची टीका केली जाते. याविषयी पाटील म्हणाले, “सर्वार्थाने या वावड्या आहेत. अनावश्यक चर्चा आहे. हवाई प्रवास करताना हवामान खात्याने महाराष्ट्राच्या सागरी पट्ट्यात येणे सोयीचे नसल्याची सूचना केली होती. त्यामुळे ते महाराष्ट्रात आले नाहीत. केंद्राकडून येणारी मदत चक्रीवादळ आलेल्या प्रत्येक राज्यासाठी असेल. ती फक्त गुजरातसाठी नाही. शिवाय महाराष्ट्र आणि गोव्याला त्यांनी पंचनामे करुन. नुकसानीचे प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर या दोन्ही राज्यांना केंद्राकडून आणखी मदत मिळेल.” -चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप