शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

संभ्रम निर्माण करण्यासाठी सरकारने एजंट नेमले : विनायक मेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:12 IST

पुणे : ईडब्ल्यूएस आरक्षण घेतल्यानंतर, मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, सरकारच यासंबंधी संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत ...

पुणे : ईडब्ल्यूएस आरक्षण घेतल्यानंतर, मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, सरकारच यासंबंधी संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे. यासाठी सरकारने एजंट नेमले आहेत, असा आरोप शिव संग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांनी केला.

बुधवारी (दि. ३०) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणावर २५ जानेवारीला अंतिम सुनावणी होणार आहे. या सुनावणीबद्दल सरकारची नेमकी काय भूमिका, कोणती रणनीती सरकार आखत आहे, मराठा समाजाला याबद्दल विश्वासात घेणार का, अशी मागणी मेटे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मेटे म्हणाले की, ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या आदेशात अनेक चुका आहेत. त्यात अपूर्णता आहे. त्यात सुधारणा कराव्यात. तसेच न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे अशी मागणी आम्ही केली आहे. मराठा समाजाच्या संघटना, विविध नेत्यांची एकत्रित बैठक घ्यावी. जनतेला सामोरे जाऊन विश्वास द्यावा. सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत.

चौकट

सरकारला वाद हवाय का?

“सरकारला मराठा-ओबीसी वाद पेटवायचा आहे? का? मंत्रिमंडळातील लोकांना काय करायचे आहे? अशोक चव्हाणांना हटवा, भुजबळ आणि वडेट्टीवारांना आवरा,” अशी मागणी विधान परिषदेत केल्याचे मेटे म्हणाले. “सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी हरीश साळवे, विनीत नाईक आदी वकिलांचा समावेश करावा. तसेच अंतिम सुनावणीचा निकाल लागेपर्यंत सरकारने ‘मेगा’भरती थांबवावी. वयोमर्यादा वाढलेल्या उमेदवारांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी २०१४, २०१८-१९ मध्ये झालेल्या परीक्षांमधून निवडलेल्या अंतिम उमेदवारांना नियुक्ती द्यावी,” असेही ते म्हणाले.