शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

गोनवडी बंधाऱ्याला बसविले कठडे

By admin | Updated: January 23, 2016 02:31 IST

शेकडो विद्यार्थी आणि शेतकरी गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या गावांच्या दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या आणि जीव मुठीत धरून बंधाऱ्यावरून प्रवास करतात

आंबेठाण : शेकडो विद्यार्थी आणि शेतकरी गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या गावांच्या दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या आणि जीव मुठीत धरून बंधाऱ्यावरून प्रवास करतात. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून कठडे बसविण्याची किती गरज आहे, हे जगासमोर आणले होते. या कामासाठी अखेर नागरिकांनी आणि स्वत: विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले आहे. ‘लोकमत’च्या सामाजिक जाणीवेचा आणि जनतेच्या एकीचा या ठिकाणी विजय झाला असून ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय या ठिकाणी आला आहे.काही वर्षांपूर्वी दोन विद्यार्थी सायकलसह नदीपात्रात पडले होते. सुदैवाने त्या वेळी ते किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे कधी काय घटना घडेल? हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी होती. ही समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-गोनवडी ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टेपाटील यांना ग्रामस्थांच्या बैठकीत बोलावले.लोकसहभागातून हे काम करण्याचा निश्चय केला. त्यांच्यासह पोपट मोहिते, सचिन काळे, तानाजी काळे, मोतीराम मोहिते, सुभाष मोहिते यांनी पुढाकार घेतला. शरद बुट्टेपाटील यांच्या पुढाकाराने खाजगी क्षेत्रातून १.५० लाख रुपये किमतीचे स्टील (लोखंड) मिळविण्यात आले. त्यासाठी पिंपरी बुद्रुकचे सरपंच विकास ठाकुर यांनी गावाकडून १० हजार रुपये तर गोनवडी-पिंपरी गावांकडून सरपंच शोभाताई भांगरे व उपसरपंच मीराताई काळे यांनी १० हजार रुपये खर्च केले. सुमंत विद्यालयाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी यांनी देखील या कामासाठी पैसा जमा केला.२५-३० वर्षे शासनाची वाट पाहून पाहून कंटाळून गेलेले लोक व विद्यार्थ्यांनी हे काम सहभागातून पूर्ण केले, ही मोठी कौतुकाची गोष्ट असून संपूर्ण तालुक्यासह अन्य भागांत त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे आणि त्यांचे हे काम समाजाला आदर्शवत ठरत आहे.(वार्ताहर)गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या खेड तालुक्यातीलदोन गावांच्या दरम्यान भामा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला लोखंडी कठडे बसविण्यासाठी जवळपास २.५ ते ३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. हा सर्व खर्च लोकवर्गणीच्या माध्यमातून पैसा आणि वस्तूरूपी उभा केला गेला. एका बाजूला २५ फुट खोल खडकाळ दरी आणि दुसऱ्या बाजूला १५ ते २० फुट खोल पाणी अशा दुहेरी संकटांचा सामना करीत या बंधाऱ्यावरून शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना दररोज प्रवास करावा लागत असे.