शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

गोनवडी बंधाऱ्याला बसविले कठडे

By admin | Updated: January 23, 2016 02:31 IST

शेकडो विद्यार्थी आणि शेतकरी गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या गावांच्या दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या आणि जीव मुठीत धरून बंधाऱ्यावरून प्रवास करतात

आंबेठाण : शेकडो विद्यार्थी आणि शेतकरी गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या गावांच्या दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या आणि जीव मुठीत धरून बंधाऱ्यावरून प्रवास करतात. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून कठडे बसविण्याची किती गरज आहे, हे जगासमोर आणले होते. या कामासाठी अखेर नागरिकांनी आणि स्वत: विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले आहे. ‘लोकमत’च्या सामाजिक जाणीवेचा आणि जनतेच्या एकीचा या ठिकाणी विजय झाला असून ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय या ठिकाणी आला आहे.काही वर्षांपूर्वी दोन विद्यार्थी सायकलसह नदीपात्रात पडले होते. सुदैवाने त्या वेळी ते किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे कधी काय घटना घडेल? हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी होती. ही समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-गोनवडी ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टेपाटील यांना ग्रामस्थांच्या बैठकीत बोलावले.लोकसहभागातून हे काम करण्याचा निश्चय केला. त्यांच्यासह पोपट मोहिते, सचिन काळे, तानाजी काळे, मोतीराम मोहिते, सुभाष मोहिते यांनी पुढाकार घेतला. शरद बुट्टेपाटील यांच्या पुढाकाराने खाजगी क्षेत्रातून १.५० लाख रुपये किमतीचे स्टील (लोखंड) मिळविण्यात आले. त्यासाठी पिंपरी बुद्रुकचे सरपंच विकास ठाकुर यांनी गावाकडून १० हजार रुपये तर गोनवडी-पिंपरी गावांकडून सरपंच शोभाताई भांगरे व उपसरपंच मीराताई काळे यांनी १० हजार रुपये खर्च केले. सुमंत विद्यालयाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी यांनी देखील या कामासाठी पैसा जमा केला.२५-३० वर्षे शासनाची वाट पाहून पाहून कंटाळून गेलेले लोक व विद्यार्थ्यांनी हे काम सहभागातून पूर्ण केले, ही मोठी कौतुकाची गोष्ट असून संपूर्ण तालुक्यासह अन्य भागांत त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे आणि त्यांचे हे काम समाजाला आदर्शवत ठरत आहे.(वार्ताहर)गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या खेड तालुक्यातीलदोन गावांच्या दरम्यान भामा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला लोखंडी कठडे बसविण्यासाठी जवळपास २.५ ते ३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. हा सर्व खर्च लोकवर्गणीच्या माध्यमातून पैसा आणि वस्तूरूपी उभा केला गेला. एका बाजूला २५ फुट खोल खडकाळ दरी आणि दुसऱ्या बाजूला १५ ते २० फुट खोल पाणी अशा दुहेरी संकटांचा सामना करीत या बंधाऱ्यावरून शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना दररोज प्रवास करावा लागत असे.