शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोनवडी बंधाऱ्याला बसविले कठडे

By admin | Updated: January 23, 2016 02:31 IST

शेकडो विद्यार्थी आणि शेतकरी गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या गावांच्या दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या आणि जीव मुठीत धरून बंधाऱ्यावरून प्रवास करतात

आंबेठाण : शेकडो विद्यार्थी आणि शेतकरी गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या गावांच्या दरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावरून धोकादायकरित्या आणि जीव मुठीत धरून बंधाऱ्यावरून प्रवास करतात. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून कठडे बसविण्याची किती गरज आहे, हे जगासमोर आणले होते. या कामासाठी अखेर नागरिकांनी आणि स्वत: विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन हे काम हाती घेतले आणि पूर्णत्वास नेले आहे. ‘लोकमत’च्या सामाजिक जाणीवेचा आणि जनतेच्या एकीचा या ठिकाणी विजय झाला असून ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय या ठिकाणी आला आहे.काही वर्षांपूर्वी दोन विद्यार्थी सायकलसह नदीपात्रात पडले होते. सुदैवाने त्या वेळी ते किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे कधी काय घटना घडेल? हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी होती. ही समस्या सोडविण्यासाठी पिंपरी-गोनवडी ग्रामस्थांनी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टेपाटील यांना ग्रामस्थांच्या बैठकीत बोलावले.लोकसहभागातून हे काम करण्याचा निश्चय केला. त्यांच्यासह पोपट मोहिते, सचिन काळे, तानाजी काळे, मोतीराम मोहिते, सुभाष मोहिते यांनी पुढाकार घेतला. शरद बुट्टेपाटील यांच्या पुढाकाराने खाजगी क्षेत्रातून १.५० लाख रुपये किमतीचे स्टील (लोखंड) मिळविण्यात आले. त्यासाठी पिंपरी बुद्रुकचे सरपंच विकास ठाकुर यांनी गावाकडून १० हजार रुपये तर गोनवडी-पिंपरी गावांकडून सरपंच शोभाताई भांगरे व उपसरपंच मीराताई काळे यांनी १० हजार रुपये खर्च केले. सुमंत विद्यालयाचे पदाधिकारी आणि विद्यार्थी यांनी देखील या कामासाठी पैसा जमा केला.२५-३० वर्षे शासनाची वाट पाहून पाहून कंटाळून गेलेले लोक व विद्यार्थ्यांनी हे काम सहभागातून पूर्ण केले, ही मोठी कौतुकाची गोष्ट असून संपूर्ण तालुक्यासह अन्य भागांत त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे आणि त्यांचे हे काम समाजाला आदर्शवत ठरत आहे.(वार्ताहर)गोनवडी आणि ठाकूर पिंपरी या खेड तालुक्यातीलदोन गावांच्या दरम्यान भामा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्याला लोखंडी कठडे बसविण्यासाठी जवळपास २.५ ते ३ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. हा सर्व खर्च लोकवर्गणीच्या माध्यमातून पैसा आणि वस्तूरूपी उभा केला गेला. एका बाजूला २५ फुट खोल खडकाळ दरी आणि दुसऱ्या बाजूला १५ ते २० फुट खोल पाणी अशा दुहेरी संकटांचा सामना करीत या बंधाऱ्यावरून शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना दररोज प्रवास करावा लागत असे.