शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीविषयी अधिका-यांचे गोलमाल

By admin | Updated: July 28, 2014 05:27 IST

जलवाहिनीचे काम वेळेवर पूर्ण न झाल्याने महापालिकेचे किती नुकसान झाले आहे, झाले असल्यास किती, भविष्यातही नुकसान हाऊ शकते का, नुकसानीची जबाबदारी निश्चित केली

विश्वास मोरे, पिंपरीजलवाहिनीचे काम वेळेवर पूर्ण न झाल्याने महापालिकेचे किती नुकसान झाले आहे, झाले असल्यास किती, भविष्यातही नुकसान हाऊ शकते का, नुकसानीची जबाबदारी निश्चित केली का, अशा प्रकारचे लेखी प्रश्न विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महापालिका सभेत विचारले. त्याची उत्तरे शासकीय पद्धतीने दिली आहेत. सोईस्करपणे मूळ मुद्दा टाळून अनावश्यक माहिती महापालिकेने दिली आहे. प्रकल्प राबविताना झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण, आपणास कोणती विचारणा झाली का, अशा प्रश्नांची उत्तरे देणेही टाळले आहे. त्यावरून पवना बंदिस्त जलवाहिनीविषयी पालिका अधिकाऱ्यांचे ‘गोलमाल’ असल्याचे दिसून येते. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकरण गोळीबारापर्यंत पोहोचले, त्या वेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महापालिका सभेत तीन मुख्य व पाच उपप्रश्न विचारले होते. या प्रकल्पात सत्ताधारी नेत्यांचे हितसंबंध असल्याने अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात सरळसरळ ‘गोलमाल’ असल्याचे दिसून येत आहे. प्रश्नांना दिलेल्या उत्तराची प्रत मिळाली आहे. त्यात मूळ प्रश्नांना साईस्कररीत्या बगल देऊन, शासकीय भाषेत काही गोष्टींची उत्तरे देणे टाळल्याचे दिसते. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत किती खर्च येईल, या प्रश्नाचे उत्तर देणेही टाळले आहे. प्रकल्पाचे काम सुरू करण्याविषयी शासकीय पाठपुरावा सुरू आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. एवढेच उत्तर दिले आहे. प्रकल्पाबाबत आजपर्यंत किती खर्च, आस्थापना खर्च किती, या प्रश्नांवर प्रकल्पासाठी १४२.१८ कोटी आणि ५४ लाख आस्थापनेवर खर्च झाल्याचे म्हटले आहे. आंदोलन केल्यामुळे कामाचा प्रदीर्घ अनुभव असणारे अधिकारी व सल्लागार यांचे नियंत्रण व मार्गदर्शन असताना प्रकल्पाला उशीर होणे, त्रुटी राहणे या बाबी का घडल्या, या प्रश्नाचे उत्तर काम बंद पडल्याने कामास विलंब झाला, असे म्हटले आहे. गोळीबारामुळे ‘जलवाहिनीचे काम जैसे थे’ ठेवण्याचा आदेश मिळाल्याने काम बंद आहे, असे पालुपद संबंधित प्रश्नाच्या उत्तरात लावल्याचे दिसून येते. अधिकारी व सल्लागार यांच्यावरील आक्षेप आणि त्रुटीचे कारण देणे टाळले आहे. प्रकल्पास केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळालेला असल्याने लेखापरीक्षण झाले आहे. आक्षेप किती, या प्रश्नावर ‘कामाचे लेखापरीक्षण झाले असून, तीन आक्षेप आहेत. त्यांची पूर्तता केली आहे’ असे म्हटले आहे. मात्र, आक्षेप कोणते याचा उल्लेख नाही. प्रकल्पामधील त्रुटी, तांत्रिक अडचणी, परवानगी न घेतल्याने केंद्र व राज्य शासनाच्या विभागाकडून नोटिसा आल्या आहेत का, या प्रश्नावर कोणत्याही नोटिसा नाहीत, असे एका वाक्यात उत्तर आहे. गुन्हे मागे घेतले नाहीतगोळीबारानंतर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली. रात्री-अपरात्री अक्षरश: घरात घुसून मारहाण केली गेली. गुन्हेगारांसारखे शेतकऱ्यांना सडकून काढले. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना घेराव घालून त्यांच्यावर दगडफेक केली. त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३३/२०११ यानुसार गुन्हा नोंदविला गेला. भादंवि ३०७, ३५३, ३३२, ३३३, ४२६, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, १२० (ब) व सहक्रिमिनल अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद केली. एखाद्या सराईत आरोपीएवढी कलमे पोलिसांनी शेतकऱ्यांवर लावली होती. हा गुन्हा नियोजनबद्ध असून, त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे शोधणे, आरोपींनी रॉकेलचे कॅन, बाटल्या, वाहनांचे टायर कोठून आणले होते. या गुन्ह्यास राजकीय लोकांनी प्रलोभने दाखविली होती का, याचा तपास करण्यासाठी अटक केलेल्या कार्यकर्त्यांना कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानंतर १५ हजारांच्या वैयक्तिक जामिनावर सोडले. या प्रकरणात २५० वाहनांची मोडतोड व जाळपोळ केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आठ जणांना अटक करून ३४ जणांची नावे गुन्ह्यात घेऊन १२०० अज्ञातांवर गुन्हा दाखल केला होता. यात ७० लाखांचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या चकरा शेतकऱ्यांना माराव्या लागत आहेत. आंदोलनातील शेतकऱ्यांना ‘तारिख पे तारिख’ मिळत आहे.