शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

ध्येयवेड्या तरुणाचे भारतभर ‘सोनेरी चतुर्भुज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:22 IST

महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणरक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ ही सायकल मोहीम राबवली.

पुणे : महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणरक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ ही सायकल मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये तब्बल ४० दिवसांत १२ राज्यांतून हा सायकल प्रवास पूर्ण करत सहा हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण केलेआहे.पुण्यातून सुरू झालेली ही सायकल जनजागृती फेरी चेन्नई-कोलकाता- दिल्ली-मुंबई-पुणे अशी सोनेरी चतुर्भुज झाली. या रॅलीचा समारोप गुरुवारी पुण्यातील सेनापती बापट रोड येथे करण्यात आला. प्रीतेशने ही मोहीम काही मित्रांच्या मदतीने आणि स्वखर्चाने केलीआहे.हा उपक्रम पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने केला आहे. १ आॅक्टोबरपासून पुण्यातील एसबी रोड येथून सायकल फेरीला सुरुवात झाली. देशात महिलांवरील अत्याचार, महिला सक्षमीकरण त्याचबरोबर वाढते प्रदूषण चिंतेचा विषय आहे. या सर्व गोष्टींना आळा कसा घालावा, यासाठी प्रत्येकजण शक्कल लढवत असतो. मात्र, पुण्यात यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाºया या धडपड्या तरुणाने फक्त चर्चांमध्ये भाग न घेता प्रत्यक्ष स्वत: रस्त्यावर उतरून समाजात जनजागृती व्हावी, यासाठी सायकल फेरी सुरू केली आहे.या मोहिमेमध्ये सायकल फेरीचा मार्ग पुणे-कोल्हापूर - हुबळी - बेंगलोर -चित्तोर - चेन्नई - नेल्लोर -भीरमुनिपतिनंम - कोरलम -कृष्णप्रसाद (ओडिसा) - मलिपूर -कोलकता - झारखंड -औरंगाबाद (बिहार) - वाराणसी - कानपूर -आग्रा - नोइडा - दिल्ली - राजस्थान - अहमदाबाद - सुरत - मुंबई -लोणावळा - पुणे अशा जवळपास १२ राज्यांच्या महत्त्वाच्या शहरांमधून तब्बल सहा हजार किलोमीटर एवढ्या अंतराचा एकूण प्रवास केला आहे. या मोहिमेमध्ये त्याने दररोज जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते.या मोहिमेबाबत प्रीतेश क्षीरसागर म्हणाला, ‘या मोहिमेमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, त्याविरोधातील लढा, महिलांचे सक्षमीकरण या विषयांबरोबरच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरणाचाही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये या मोहिमेचे चांगले स्वागत केले आहे. आगामी काळातही सायकल रॅलीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अशाच सोशल विषयांवर मोहिमा राबविणार आहे.’