शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेड्या तरुणाचे भारतभर ‘सोनेरी चतुर्भुज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:22 IST

महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणरक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ ही सायकल मोहीम राबवली.

पुणे : महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणरक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ ही सायकल मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये तब्बल ४० दिवसांत १२ राज्यांतून हा सायकल प्रवास पूर्ण करत सहा हजार किलोमीटरचे अंतर पूर्ण केलेआहे.पुण्यातून सुरू झालेली ही सायकल जनजागृती फेरी चेन्नई-कोलकाता- दिल्ली-मुंबई-पुणे अशी सोनेरी चतुर्भुज झाली. या रॅलीचा समारोप गुरुवारी पुण्यातील सेनापती बापट रोड येथे करण्यात आला. प्रीतेशने ही मोहीम काही मित्रांच्या मदतीने आणि स्वखर्चाने केलीआहे.हा उपक्रम पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने केला आहे. १ आॅक्टोबरपासून पुण्यातील एसबी रोड येथून सायकल फेरीला सुरुवात झाली. देशात महिलांवरील अत्याचार, महिला सक्षमीकरण त्याचबरोबर वाढते प्रदूषण चिंतेचा विषय आहे. या सर्व गोष्टींना आळा कसा घालावा, यासाठी प्रत्येकजण शक्कल लढवत असतो. मात्र, पुण्यात यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाºया या धडपड्या तरुणाने फक्त चर्चांमध्ये भाग न घेता प्रत्यक्ष स्वत: रस्त्यावर उतरून समाजात जनजागृती व्हावी, यासाठी सायकल फेरी सुरू केली आहे.या मोहिमेमध्ये सायकल फेरीचा मार्ग पुणे-कोल्हापूर - हुबळी - बेंगलोर -चित्तोर - चेन्नई - नेल्लोर -भीरमुनिपतिनंम - कोरलम -कृष्णप्रसाद (ओडिसा) - मलिपूर -कोलकता - झारखंड -औरंगाबाद (बिहार) - वाराणसी - कानपूर -आग्रा - नोइडा - दिल्ली - राजस्थान - अहमदाबाद - सुरत - मुंबई -लोणावळा - पुणे अशा जवळपास १२ राज्यांच्या महत्त्वाच्या शहरांमधून तब्बल सहा हजार किलोमीटर एवढ्या अंतराचा एकूण प्रवास केला आहे. या मोहिमेमध्ये त्याने दररोज जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते.या मोहिमेबाबत प्रीतेश क्षीरसागर म्हणाला, ‘या मोहिमेमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, त्याविरोधातील लढा, महिलांचे सक्षमीकरण या विषयांबरोबरच ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरणाचाही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये या मोहिमेचे चांगले स्वागत केले आहे. आगामी काळातही सायकल रॅलीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत अशाच सोशल विषयांवर मोहिमा राबविणार आहे.’