शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘हवेचे प्रदूषण’ प्रकल्पाचा सुवर्णवेध

By admin | Updated: February 28, 2016 03:43 IST

नावीन्यपूर्ण; तसेच ज्वलंत विषयांवरील सादरीकरणामुळे येथील विद्याधाम प्रशालेच्या विज्ञान प्रकल्पांना सलग आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू शकले आहे. २०१४ मध्ये

शिरूर : नावीन्यपूर्ण; तसेच ज्वलंत विषयांवरील सादरीकरणामुळे येथील विद्याधाम प्रशालेच्या विज्ञान प्रकल्पांना सलग आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू शकले आहे. २०१४ मध्ये सादर केलेल्या ‘रांजणगाव एमआयडीसीतील हवेचे प्रदूषण, हवेच्या प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम’ या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळाले. विद्यार्थ्यांना वैयक्तिरीत्या गौरविण्यातही आले. या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारी वैज्ञानिक प्रगल्भता भविष्यात देशाच्या कामी आल्यास आश्चर्य वाटायला नको. विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी २००६ पासून ‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषदे’च्या वतीने आयोजित प्रकल्प स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आपले नाव उमटविण्यास प्रारंभ केला. ‘दुर्लक्षित खाद्य वनस्पती’ या विषयावर त्यांनी सिक्कीम येथे प्रकल्प सादर केला. यानंतर गहू या पिकाच्या जैवविविधता (२००७), शिरूर परिसरातील सेंद्रिय व रासायनिक शेती (२००८), शिरूर परिसरातील माती (२०१०), विविध धातूंच्या भांड्यात अन्न शिजवण्यासाठी लागणारी ऊर्जा (२०१२) या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे या प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळाले. २०१४ मध्ये विद्यार्थ्यांनी केलेला ‘रांजणगाव एमआयडीसीतील हवेच्या प्रदूषणामुळे वातावरणावर होणारा परिणाम’ हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर गेला. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांनी चार महिने कष्ट घेतले. एमआयडीसीतील कारखान्यांचा सर्व्हे केला. अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वायूचे प्रमाण शोधले. प्रत्यक्ष प्रयोग करून हवेतील घटकांचे मोजमाप केले. याबाबत अभ्यास करून निरीक्षणे नोंदवली. एमआयडीसीतील उपलब्ध करून दिलेल्या उपकरणाच्या साह्याने कार्बन मोनाक्साइड, डायआॅक्साइड, पार्टिकल्स आदींची मोजणी केली. त्याचा अभ्यास केला. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे सभोवताली पिकांवर होणारा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. यात पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. उत्पादनावर परिणाम झाल्याचेही दिसून झाले. नागरिकांना श्वसनाचे व हृदयविषयक विकार असल्याचेही विद्यार्थ्यांना जाणवले. (वार्ताहर)विविध निष्कर्ष नोंदवलेहवेच्या प्रदूषणामुळे शेती प्रभावीत झाल्याचे व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचा ़िनष्कर्ष विद्यार्थ्यांनी निरीक्षणाद्वारे नोंदविले. अर्थात, यात तथ्यही आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही याची निरीक्षणे आहेतच. या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळाले, हे गौरवास्पद आहे. मात्र, प्रकल्पाद्वारे जे निष्कर्ष समोर आले, त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, एवढे मात्र नक्की; अन्यथा प्रकल्प व निष्कर्ष हे सादरीकरणापुरतेच मर्यादित राहतील.