शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

‘हवेचे प्रदूषण’ प्रकल्पाचा सुवर्णवेध

By admin | Updated: February 28, 2016 03:43 IST

नावीन्यपूर्ण; तसेच ज्वलंत विषयांवरील सादरीकरणामुळे येथील विद्याधाम प्रशालेच्या विज्ञान प्रकल्पांना सलग आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू शकले आहे. २०१४ मध्ये

शिरूर : नावीन्यपूर्ण; तसेच ज्वलंत विषयांवरील सादरीकरणामुळे येथील विद्याधाम प्रशालेच्या विज्ञान प्रकल्पांना सलग आठ वर्षे राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळू शकले आहे. २०१४ मध्ये सादर केलेल्या ‘रांजणगाव एमआयडीसीतील हवेचे प्रदूषण, हवेच्या प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम’ या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळाले. विद्यार्थ्यांना वैयक्तिरीत्या गौरविण्यातही आले. या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारी वैज्ञानिक प्रगल्भता भविष्यात देशाच्या कामी आल्यास आश्चर्य वाटायला नको. विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी २००६ पासून ‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषदे’च्या वतीने आयोजित प्रकल्प स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर आपले नाव उमटविण्यास प्रारंभ केला. ‘दुर्लक्षित खाद्य वनस्पती’ या विषयावर त्यांनी सिक्कीम येथे प्रकल्प सादर केला. यानंतर गहू या पिकाच्या जैवविविधता (२००७), शिरूर परिसरातील सेंद्रिय व रासायनिक शेती (२००८), शिरूर परिसरातील माती (२०१०), विविध धातूंच्या भांड्यात अन्न शिजवण्यासाठी लागणारी ऊर्जा (२०१२) या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे या प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळाले. २०१४ मध्ये विद्यार्थ्यांनी केलेला ‘रांजणगाव एमआयडीसीतील हवेच्या प्रदूषणामुळे वातावरणावर होणारा परिणाम’ हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर गेला. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांनी चार महिने कष्ट घेतले. एमआयडीसीतील कारखान्यांचा सर्व्हे केला. अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वायूचे प्रमाण शोधले. प्रत्यक्ष प्रयोग करून हवेतील घटकांचे मोजमाप केले. याबाबत अभ्यास करून निरीक्षणे नोंदवली. एमआयडीसीतील उपलब्ध करून दिलेल्या उपकरणाच्या साह्याने कार्बन मोनाक्साइड, डायआॅक्साइड, पार्टिकल्स आदींची मोजणी केली. त्याचा अभ्यास केला. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे सभोवताली पिकांवर होणारा परिणाम, नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम याचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. यात पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. उत्पादनावर परिणाम झाल्याचेही दिसून झाले. नागरिकांना श्वसनाचे व हृदयविषयक विकार असल्याचेही विद्यार्थ्यांना जाणवले. (वार्ताहर)विविध निष्कर्ष नोंदवलेहवेच्या प्रदूषणामुळे शेती प्रभावीत झाल्याचे व नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचा ़िनष्कर्ष विद्यार्थ्यांनी निरीक्षणाद्वारे नोंदविले. अर्थात, यात तथ्यही आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही याची निरीक्षणे आहेतच. या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळाले, हे गौरवास्पद आहे. मात्र, प्रकल्पाद्वारे जे निष्कर्ष समोर आले, त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने तसेच शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, एवढे मात्र नक्की; अन्यथा प्रकल्प व निष्कर्ष हे सादरीकरणापुरतेच मर्यादित राहतील.