शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

ग्रामपंचायतींना सोन्याचे दिवस

By admin | Updated: December 31, 2014 23:20 IST

भोगोलिकदृष्ट्या पुणे शहराला सर्वांत जवळचा व नैसर्गिक साधनांची विपुलता असलेला भाग म्हणून ओळख असलेल्या मुळशी तालुक्याकडे गुंतवणूकदारांच्या नजरा वळल्या आहेत.

प्रदीप पाटील ल्ल पौडभोगोलिकदृष्ट्या पुणे शहराला सर्वांत जवळचा व नैसर्गिक साधनांची विपुलता असलेला भाग म्हणून ओळख असलेल्या मुळशी तालुक्याकडे गुंतवणूकदारांच्या नजरा वळल्या आहेत. त्यामुळे अलीकडील काळात या भागाचा विकास झपाट्याने होताना दिसत आहे. विविध प्रकारचे उद्योजक या ठिकाणी आपले लहान-मोठे उद्योग-व्यवसाय सुरू करीत आहेत. त्यामुळे कामगारवर्गाच्या हाती पैसा येऊ लागल्याने व घरांना मागणी वाढत असल्याचे लक्षात घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे गृहप्रकल्प उभारण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल वाढताना दिसत आहे. याचा परिणाम म्हणून एकेकाळी छोटीशी खेडी असलेली तालुक्यातील जांभे, नेरे, हिंजवडी, माण, सूस, बावधन, पिरंगुट, भूगाव, भूकुम, घोटावडे, पिरंगुट, पौड व उरावडे ही गावे आता नव्याने शहर म्हणून उदयास येत आहेत. या ठिकाणी होत असलेल्या भौतिक बदलाच्या व वाढत्या नागरिकरणाच्या बदल्यात येथील ग्रामपंचायतीची साहजिकच आर्थिक आवक वाढण्यास मदत झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून पूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी लागणारे गावकारभारी म्हणजे सरपंच-उपसरपंच या पदासाठी फारशी स्पर्धा नसल्याने बिनविरोध निवडून दिले जायचे. परंतु, अलीकडील काळात ग्रामपंचायतीला व त्यातील पदाला सर्वार्थाने आलेले महत्त्व यामुळे यातील निवडणुका विधानसभेच्या निवडणुकापेक्षा अधिक खर्चिक व चर्चेच्या होत आहेत. पिरंगुट, हिंजवडी, माण, सूस, भूगाव, महाळुंगे येथील ग्रामपंचायतींचे सदस्यत्व मिळविण्यासाठी कोटींची उलाढाल होताना दिसते.पुणे शहराला जोडून नव्याने होणारा संकल्पित रिंगरोड याच गावांच्या पट्ट्यातून जाणारा असल्याने येथील जमिनीलाही सोन्याची झळाळी आली आहे. नवीन बांधकाम परवान्याचे ग्रामपंचायतीकडचे अधिकार सरकारने काढून घेतलेले असले, तरी झालेल्या बांधकामाच्या नोंदीतून, तसेच उद्योग-व्यवसायांना द्यावयाच्या ना-हरकत दाखल्याच्या शुल्कातूनही ग्रामपंचायतीना चांगली कमाई होताना दिसते. ४राज्य सरकारने नवीन बांधकाम परवाने ग्रामपंचायतीला देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने अधिकच महत्त्व ग्रामपंचायतींना मिळणार, हे नक्की आहे. मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग गावाच्या विकासाकरिता कसा करता येईल, याचे भान व नियोजन सर्वच ग्रामपंचायतीकडे नसले, तरी काही ग्रामपंचायतींनी मात्र त्या दिशेने पावले उचलल्याचे लक्षात येत आहे. आय. एस. ओ. मानांकन मिळवण्याचा तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा माण, माणगाव ग्रामपंचायतीने मिळवला. त्यापाठोपाठ नागरिकांना लागणाऱ्या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माण व पिरंगुट यांसारख्या ग्रामपंचायती करताना दिसत आहेत. ४अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायत व ग्रामसचिवालयाच्या सुसज्ज इमारती उभारण्याचेही काम पूर्ण केलेले आहे. गावाच्या सेवेसाठी लागणारा पुरेसा कामगारवर्गही बहुतांशी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध आहे. कासारआंबोली, माण, पौड या ग्रामपंचायतींच्या सुसज्ज इमारती पाहिल्या, की येथील ग्रामपंचायतीची संपन्नता सहजपणे आपल्या ध्यानात येते. रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, वाहतूककोंडी या शहरातील समस्या याही ग्रामपंचायतीची डोकेदुखी बनताना दिसत असल्या व नागरीसुविधांचा अभाव या सामान्य नागरिकांच्या दृष्टीने नकारात्मक बाबी असल्या, तरी या समस्या सोडविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या पाठीशी ग्रामस्थांनीही खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.