शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

देवाची आळंदीत चक्का जाम

By admin | Updated: May 8, 2017 02:01 IST

आपण तीर्थक्षेत्र आळंदीत विवाहाला येताय? तर किमान दीड तास अगोदर अलंकापुरीत पोहोचा; कारण येथील वाहतूककोंडीतून फार

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : आपण तीर्थक्षेत्र आळंदीत विवाहाला येताय? तर किमान दीड तास अगोदर अलंकापुरीत पोहोचा; कारण येथील वाहतूककोंडीतून फार मोठी कसरत करून तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचावे लागणार आहे. रविवारी (दि. ७) लग्नसभारंभाची तिथी असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर चक्का जाम होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी मिळेल त्या पर्यायी रस्त्याने वाटसरूंना मार्गस्थ व्हावे लागत आहे. आळंदीतील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासन्तास वाहनांना ब्रेक लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. एकदा रस्त्यावर कोंडी झाली, की ती तब्बल दोन-अडीच तासांहून अधिक वेळ सोडविणे मुश्कील बनत आहे. वाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येला समस्त अलंकापुरीसह चालक, वाहक, प्रवासी कंटाळले आहेत. शहरातील रस्त्यांवर सायंकाळच्या वेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत आहे. सध्या विवाहसभारंभाचे अधिक मुहूर्त असल्याने शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी गर्दीने गजबजलेली असतात. त्यामुळे बाहेरील गावावरून वऱ्हाडी लोकांची अनेक वाहने अलंकापुरीत येत असतात. मात्र अशा वाहनांना आवश्यक प्रमाणात पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने ही वाहने रस्त्याशेजारीच पार्किंग केली जात आहेत. तसेच शहरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने इतर वाहनांना वाहतुकीदरम्यान रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी अधिक प्रमाणात होऊ लागली आहे.