शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

देवाची आळंदीत चक्का जाम

By admin | Updated: May 8, 2017 02:01 IST

आपण तीर्थक्षेत्र आळंदीत विवाहाला येताय? तर किमान दीड तास अगोदर अलंकापुरीत पोहोचा; कारण येथील वाहतूककोंडीतून फार

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : आपण तीर्थक्षेत्र आळंदीत विवाहाला येताय? तर किमान दीड तास अगोदर अलंकापुरीत पोहोचा; कारण येथील वाहतूककोंडीतून फार मोठी कसरत करून तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचावे लागणार आहे. रविवारी (दि. ७) लग्नसभारंभाची तिथी असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर चक्का जाम होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी मिळेल त्या पर्यायी रस्त्याने वाटसरूंना मार्गस्थ व्हावे लागत आहे. आळंदीतील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासन्तास वाहनांना ब्रेक लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. एकदा रस्त्यावर कोंडी झाली, की ती तब्बल दोन-अडीच तासांहून अधिक वेळ सोडविणे मुश्कील बनत आहे. वाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येला समस्त अलंकापुरीसह चालक, वाहक, प्रवासी कंटाळले आहेत. शहरातील रस्त्यांवर सायंकाळच्या वेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत आहे. सध्या विवाहसभारंभाचे अधिक मुहूर्त असल्याने शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी गर्दीने गजबजलेली असतात. त्यामुळे बाहेरील गावावरून वऱ्हाडी लोकांची अनेक वाहने अलंकापुरीत येत असतात. मात्र अशा वाहनांना आवश्यक प्रमाणात पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने ही वाहने रस्त्याशेजारीच पार्किंग केली जात आहेत. तसेच शहरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने इतर वाहनांना वाहतुकीदरम्यान रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी अधिक प्रमाणात होऊ लागली आहे.