शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

देवाची आळंदीत चक्का जाम

By admin | Updated: May 8, 2017 02:01 IST

आपण तीर्थक्षेत्र आळंदीत विवाहाला येताय? तर किमान दीड तास अगोदर अलंकापुरीत पोहोचा; कारण येथील वाहतूककोंडीतून फार

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : आपण तीर्थक्षेत्र आळंदीत विवाहाला येताय? तर किमान दीड तास अगोदर अलंकापुरीत पोहोचा; कारण येथील वाहतूककोंडीतून फार मोठी कसरत करून तुम्हाला इच्छित स्थळी पोहोचावे लागणार आहे. रविवारी (दि. ७) लग्नसभारंभाची तिथी असल्याने शहरातील सर्वच रस्त्यांवर चक्का जाम होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी मिळेल त्या पर्यायी रस्त्याने वाटसरूंना मार्गस्थ व्हावे लागत आहे. आळंदीतील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये तासन्तास वाहनांना ब्रेक लावून ताटकळत उभे राहावे लागत आहे. एकदा रस्त्यावर कोंडी झाली, की ती तब्बल दोन-अडीच तासांहून अधिक वेळ सोडविणे मुश्कील बनत आहे. वाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येला समस्त अलंकापुरीसह चालक, वाहक, प्रवासी कंटाळले आहेत. शहरातील रस्त्यांवर सायंकाळच्या वेळी छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे होणारे अतिक्रमण या समस्येत अधिक भर घालत आहे. सध्या विवाहसभारंभाचे अधिक मुहूर्त असल्याने शहरातील विविध ठिकाणची विवाह कार्यालये, धर्मशाळा, मंदिरे आदी ठिकाणी गर्दीने गजबजलेली असतात. त्यामुळे बाहेरील गावावरून वऱ्हाडी लोकांची अनेक वाहने अलंकापुरीत येत असतात. मात्र अशा वाहनांना आवश्यक प्रमाणात पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने ही वाहने रस्त्याशेजारीच पार्किंग केली जात आहेत. तसेच शहरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत रस्त्यांची कामे सुरू असल्याने इतर वाहनांना वाहतुकीदरम्यान रस्ता अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतूककोंडी अधिक प्रमाणात होऊ लागली आहे.