शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

डिंभे उजव्या कालव्याला पाणी सोडणार

By admin | Updated: April 9, 2016 01:51 IST

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, या नागरिकांच्या मागणीला यश आले असून, १५ एप्रिलपासून डिंभे धरणातून कालव्याला पाणी सोडण्याच्या सूचना पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत

घोडेगाव : डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडावे, या नागरिकांच्या मागणीला यश आले असून, १५ एप्रिलपासून डिंभे धरणातून कालव्याला पाणी सोडण्याच्या सूचना पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. यामुळे या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. डिंभे धरण उजव्या कालव्याला पाणी सोडावे, यासाठी शिवसेनेने दि.१० एप्रिल रोजी धरणावर जाऊन डाव्या कालव्याचे पाणी बंद करणार असल्याचा इशारा दिला होता. दरम्यान, कालव्याला पाणी यावे, यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्याशी चर्चा केली होती. तसेच, त्यांनी कार्यकारी अभियंता यांना दि.१५ एप्रिलपर्यंत पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखिले यांनी सांगितले. सध्या डाव्या कालव्याद्वारे दि.१५ मार्चपासून येडगाव धरणातून नगर जिल्ह्याला पाणीपुरवठा सुरू आहे. आंबेगाव तालुक्यात धरण आहे, येथे पडणाऱ्या पावसावर धरण भरते व तालुक्यातील लोकांनी धरणासाठी जमिनी दिल्या; मात्र स्थानिक लोकच तहानलेले आहेत.आंबेगावच्या पूर्व भागातील व शिरूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. नदी व कालव्यावर अवलंबून असलेल्या पाणी योजना अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे उजव्या कालव्याला तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी करत कुकडी पाटबंधारे विभागाने दि.१० एप्रिलपर्यंत उजव्या कालव्याला पाणी न सोडल्यास आंबेगाव व शिरूर तालुक्यातील शेतकरी धरणावर जाऊन डाव्या कालव्याला सुरू असलेले पाणी बंद करतील, असा इशारा शिवसेना नेते अरुण गिरे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र करंजखिले व तालुकाप्रमुख सुनील बाणखेले यांनी दिला होता. या संदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विजय शिवतरे यांच्याशी चर्चा करून पाणी सोडण्याची मागणी केली. तशा सूचनाही शिवतरे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिल्या असून, शिवसेनेच्या दणक्यामुळे दि.१५ एप्रिलपर्यंत पाणी येणार असल्याचे रवींद्र करंजखिले यांनी सांगितले आहे.