शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

लाखनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:12 IST

आंबेगाव तालुक्यातील वाढता बिबट्यांचा प्रादुर्भाव पाहता दररोज एक ते दोन ठिकाणी बिबट्यांचे हल्ले होत आहेत. वनखाते बिबट्याला पकडण्यात असमर्थ ...

आंबेगाव तालुक्यातील वाढता बिबट्यांचा प्रादुर्भाव पाहता दररोज एक ते दोन ठिकाणी बिबट्यांचे हल्ले होत आहेत. वनखाते बिबट्याला पकडण्यात असमर्थ असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील चास, नारोडी, महाळुंगे पडवळ, कळंब, लौकी, चांडोली बुद्रुक, चांडोली खुर्द, वळती, भराडी, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, मेंगडेवाडी, जारकरवाडी, मंचरचा काही भाग, पोंदेवाडी, जवळे, धामणी, पहाडदरा व अन्य काही गावांमध्ये बिबट्याने नेहमीच आपले अस्तित्व दाखवले आहे. चास, नारोडी, लौकी या परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना दिवसाही होत असते. मागील दोन वर्षांपासून शेतकरीराजा अतिवृष्टी, कोरोना त्याचबरोबर नेहमीच शेतीमालाचा बाजारभाव पडत चालला आहे. त्याचबरोबर दररोज कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याच्या पशुधनावर बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. प्रशासनाने बिबट्याच्या हल्ल्यापासून पशुधन वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योग्य ती व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.

लाखनगाव येथील शेतकरी आलमगीर अजमुद्दिन मुजावर यांचा पोंदेमळा येथे सुमारे शंभर शेळ्यांचा गोठा आहे. या गोठ्यामध्ये वेगवेगळे विभाग केले आहे. त्यापैकी एका विभागातील सहा शेळ्या आज पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ठार झाल्या आहेत. वनरक्षक सोपान अनासुने व अशोक जाधव यांनी पंचनामा केला असून,वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या सूचनेनुसार तत्काळ या ठिकाणी पिंजरा बसविण्यात येणार आहे.