शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

गवा घुटमळला गर्दीत : बावधनमध्ये दिवसभर वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:07 IST

पाषाण : पाषाण तलावाजवळ असलेल्या हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च सेंटर (एचईएमआरएल) या संरक्षण संस्थेलगतच्या झाडाझुडपांमध्ये मंगळवारी (दि. २२) पुन्हा ...

पाषाण : पाषाण तलावाजवळ असलेल्या हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च सेंटर (एचईएमआरएल) या संरक्षण संस्थेलगतच्या झाडाझुडपांमध्ये मंगळवारी (दि. २२) पुन्हा एकदा रानगवा आढळला. सकाळी आठच्या सुमारास या गव्याचे पहिले दर्शन झाले. त्यानंतर संध्याकाळपर्यंत हा गवा त्याच परिसरात घुटमळत राहिला. जंगलात परतण्याचा मार्ग त्याला सापडत नसल्याचे स्पष्ट झाले. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत वनविभाग आणि राज्य राखीव पोलिस बलाचे कर्मचारी हा गवा मानवी वस्तीकडे फिरकणार नाही याची खबरदारी घेत होते.

‘एचईएमआरएल’चा परिसर सुमारे नऊशे-हजार एकरांचा आहे. यातल्या बहुतांश भागात दाट झाडी आहे. मात्र गव्याला त्याच्या अधिवासात परतण्यासाठीचा मार्ग चिंचोळा असून तो मुंबई-बंगळुरू महामार्गालगत आहे. हा मार्ग गव्याला रात्री उशीरापर्यंत सापडलेला नव्हता. काही दिवसांपुर्वीच कोथरुड परिसरात आढळलेल्या रानगव्याला गर्दी आणि चुकीच्या औषध प्रयोगांमुळे जीव गमवावा लागल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आढळलेल्या रानगव्याला सुखरुप त्याच्या अधिवासात पोहचविण्याचे आव्हान वनविभागापुढे होते. त्यामुळे मंगळवारी वनविभागाने गव्याला पकडण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.

मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास एचईएमआरएलची संरक्षक भिंत आणि महामार्ग यांच्या दरम्यानच्या मोकळ्या जागेत स्थानिकांना रानगव्याचे दर्शन झाले. नागरिकांनी वनविभाग आणि पोलीसांना याची माहिती तातडीने दिली. त्यानंतर महामार्गालगत भाग संरक्षित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल मागवण्यात आले. तसेच ‘रेस्क्यू टीम’लाही बोलावण्यात आले.

रानगवा पाषाण तलावाकडे जाऊ नये यासाठी तलावाच्या पुलाखाली जाळी व पत्रे लावून हा परिसर बंद करण्यात आला. यानंतर रानगवा त्याच्या नैसर्गिक वाटेने जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु बघ्यांच्या गर्दीमुळे आणि ‘रेस्क्यू’ करण्यासाठी आलेल्या अनअनुभ‌वी प्राणीमित्रांमुळे तो पुन्हा महामार्गालगतच्या संरक्षक भिंतीकडे वळला.

यानंतर स्थानिक प्राणीमित्र आणि गोपालकांच्या मदतीने गव्याला त्याच्या वाटेवर धाडण्याचे प्रयत्न सुरु झाले. एचईएमआरएलच्या डोंगराजवळील संरक्षक भिंतीचे काम चालू असलेल्या ठिकाणावरून रानगवा पहिल्यांदा बाहेर आल्याचे असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. रानगवा ज्या ठिकाणावरून बाहेर आला होता त्या ठिकाणी त्याचे पायाचे निशाण देखील स्पष्ट आढळून आले.

चौकट

‘दिल्ली’तून हवी परवानगी?

रानगव्याला एचईएमआरएलच्या मुख्य प्रवेशद्वारातून जाऊ द्यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यासाठी संरक्षण खात्याच्या परवानगीची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून गव्याला नैसर्गिक अधिवासात जाणे सोपे ठरेल, असा कयास आहे.