शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभांचे अस्तित्वच धोक्यात !

By admin | Updated: January 25, 2017 23:51 IST

गावाच्या नियोजनात्मक विकासाच्या दृष्टीने उपयुक्त व पंचायत राजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या ग्रामसभेचे महत्त्व हळूहळू लोप पावत आहे.

कुरकुंभ : गावाच्या नियोजनात्मक विकासाच्या दृष्टीने उपयुक्त व पंचायत राजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असणाऱ्या ग्रामसभेचे महत्त्व हळूहळू लोप पावत आहे. त्यामुळे गावाच्या भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आवश्यक असणारे नियोजन होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊनदेखील विकासकामे होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.ग्रामीण भागाचा नियोजनात्मक विकास साधण्याच्या व शासनाच्या विविध योजना लागू करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे. शासनाच्या निती आयोगाने प्रत्येक गावाच्या गरजेनुसार नियोजनात्मक निधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामसभेचा उपयोग केला जातो. यामध्ये ग्रामीण भागातील जनतेला केंद्रस्थानी ठेवून याची निर्मिती केली गेली आहे. प्रत्येक गावातील ग्रामस्थांची विविध विषयाबाबत मते, सल्ले तसेच गरजांचा प्राधान्यक्रम जाणून घेण्यासाठी तसेच गावाच्या विकासासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, स्वच्छता व पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामसभेचा उपयोग केला जातो. यामध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयाला शासनदरबारी महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या माध्यमाचा उपयोग सुनियोजित असणे आवश्यक आहे.ग्रामीण भागात ग्रामसभेच्या कामकाजाची माहितीच ग्रामस्थांना नसते. त्यामुळे ज्याला वाटेल त्याप्रमाणे यामध्ये प्रश्न विचारून ग्रामसभेत जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येणारा गोंधळ तसेच शासकीय अधिकारीवर्गाला धारेवर धरणे, एखाद्या विषयाचे काहीच ज्ञान नसताना उगाचच त्यामध्ये खोडा घालण्याचे प्रकार सध्या जास्त प्रमाणात होताना दिसतात. त्यामुळे गावातील समस्या व नियोजनाच्या मुख्य विषयाला बगल देऊन ग्रामसभा तहकूब करण्यावर जास्त भर दिला जातो. काही वेळेस तर प्रस्थापित आपल्या राजकीय स्वाथार्साठी त्यांच्या मर्जीतील काही कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक गोंधळ करण्यासाठी जमा करीत असल्याचेदेखील आढळून येत आहे.प्रत्येक वर्षात साधारणत: चार ग्रामसभा व अन्य गरजेनुसार विशेष ग्रामसभा घेण्यात येतात; मात्र सध्याच्या परिस्थितीत ग्रामसभांचा कोरमच पूर्ण होत नाही. त्यामुळे विकास योजना या फक्त कागदावरच राहतात.गावाच्या विकासाच्या द्रुष्टीने उपयुक्त असणारे शासनाचे विविध योजनांच्या बाबतीत मत नोंदवण्यासाठी किंवा त्यावर चर्चासत्र राबविण्यासाठी तसेच विविध विशेष ग्रामसभांमधून एखाद्या विषयावर निर्णय घेण्यासाठी, दारूबंदीपासून अगदी ग्रामस्वच्छतासारखे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसभांची गरज असते. मात्र, याबाबत उदासीनता असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात असे प्रकार सर्रास पाहावयास मिळतात. (वार्ताहर)