शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

तेरा गावांना कळमोडीचे पाणी द्या

By admin | Updated: May 3, 2017 01:59 IST

शिरूर तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या १३ गावांतील शेतीसाठी लाभदायक असणारे कळमोडी धरणाचे २ टीएमसी

कान्हुरमेसाई : शिरूर तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या १३ गावांतील शेतीसाठी लाभदायक असणारे कळमोडी धरणाचे २ टीएमसी पाणी मिळण्यासाठी पाबळ, धामारी, थापेवाडी, पिंपळवाडी, खैरेनगर, हिवरे, मांदळेवाडी, खैरेवाडी, कान्हुरमेसाई, चिंचोली मोराची, डफळापूर, मिडगुलवाडी, शास्ताबाद या १३ गावांसाठी मिळावे, याकरिता नुकतीच एक बैठक चिंचोली मोराची (ता. शिरूर) येथील खंडोबा मंदिरात आयोजिण्यात आली होती.या परिसरातील सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त शेतकरी हजर होते. या बैठकीत कळमोडीचे उर्वरित २ टीएमसी पाण्यावर या बारा गावाचा अधिकार आहे आणि ते आम्हाला मिळाले पाहिजे, असे शेतकऱ्यांनी या बैठकीत सांगितले. आमच्या परिसरातील कायम दुष्काळी असणाऱ्या १० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणे गरजेचे असताना या १२ गावांच्या पाण्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. हे धरण अडीच टीएमसी पाणी या १३ गावांकरिता मिळण्यात यावे. या धरणातून पहिल्यांदा नवीन पाणी उपसा योजनेद्वारे वेळ नदीत सोडण्याचा मूळचा आराखडा आहे. त्यातून हे पाणी आंबेगाव व शिरूर तालुक्यातील जिरायती शेतीला मिळणार आहे, तसेच हे पाणी शिरूर तालुक्यातील थिटेवाडी बंधाऱ्यात आल्यानंतर शिरूर तालुक्यातील पाबळ परिसरातील कायम दुष्काळी परिसरातील गावे ओलिताखाली येणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र तसे घडता अद्यापही गावे दुष्काळी छायेतच दिसून येत आहेत.या परिसरातील कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर १ जूनपासून या परिसरातील शेतकरी संपावर जाण्याचा इशारा, तसेच येथून पुढे येणाऱ्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकरी व कार्यकर्त्यांनी केला आहे.या वेळी जि. प. सदस्या स्वातीताई पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य आबासोा कोहकडे, राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष दत्ताशेठ पाचुंदकर, चिंचोली मोराचीचे माजी सरपंच स्मिताताई धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते यापूर्वी कळमोडीच्या पाण्याची मागणी केली असून, अनेक वेळा सर्व्हे करूनही अद्याप या परिसरातील दुष्काळी शेतकऱ्यांना शासनदरबारी न्याय मिळाला नाही. पाण्याच्या मागणीसाठी पाबळ येथील कालावधीमध्ये जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी कळमोडीचे पाणी या बारा गावांसाठी देण्याचे कबूल केले होते.काही किरकोळ भूसंपादन वगळता सध्या निवृत्ती नाणेकर, खैरेनगरचे सरपंच सीमाताई खैरे, रामदास मांदळे, संभाजी नाणेकर, बाजीराव उकिर्डे, राहुल नाणेकर, खैरेनगरचे माजी सरपंच रघुनाथ शिंदे, अप्पासोा खैरे, दौलतराव दळवी, दीपक तळोले, शहाजी दळावी, गोविंद नाणेकर, संजय खैरे, दत्ता पाटील नाणेकर, दादासाहेब खैरे, दत्तोबा गोडसे, पंढरीनाथ तांबे, सर्जेराव नाणेकर, बापूसोा ननवरे, उद्योगपती गुलाबराव धुमाळ आदी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती नाणेकर यांनी सूत्रसंचालन केले. रामदास मांदळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)जनरेटा उभारण्याची गरज : प्रकल्पाची घोषणाया प्रकल्पातून सुमारे १० हजार हेक्टर शेती ओलिताखाली येणार आहे. मात्र नवीन पाणी योजना कोण करणार, या वादात या धरणातील पाणी अजूनही १३ गावांना मिळत नाही, याकडे लोकप्रतिनिधींनीही मौन रूप धारण केले आहे. या प्रकल्पासाठी जनरेटा उभारण्याची गरज आहे. कळमोडी धरण कार्यक्षेत्रातील शिरूर, आंबेगाव या तालुक्यातील हजारो एकर शेती पिढ्यान्पिढ्या जिरायती आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. त्यामुळे आघाडी सरकारच्या राजवटीत १७ वर्षांपूर्वी कळमोडी धरण प्रकल्पाची घोषणा झाली होती व निधी साखर महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार दिलीपराव वळसे-पाटील यांनी रेटा लावला होता. त्यांच्या कार्यकाळात हे धरण पूर्ण झाले. पाण्यासाठी पिंपळे जगताप, वाजेवाडी, जातेगावकरांची ओरडकेंदूर : चासकमान धरणातून सोडण्यात आलेले उन्हाळी आवर्तन शिरूरच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना गेले २८ दिवस होऊनही अद्याप मिळालेले नसून चासकमानसाठी पुनर्वसित केलेल्या जमिनी परत करा व पाणी देऊच नका, असा प्रश्न येथील शेतकरी नीलेश जगताप, उत्तम बेंडभर, मोहन टाकळकर, धर्मराज वाजे, शिवाजी जगताप, समाधान डोके, सागर शितोळे, अशोक नाईनवरे, अण्णा दौंडकर, शेखर तांबे यांनी केलेला आहे. चासकमान धरणातून सोडण्यात येणारे पाणी ‘टेल टू हेड’ अशा स्वरूपाचे सोडण्यात येत असल्यामुळे प्रामुख्याने शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील गावांवर अन्याय होत आहे. पाणीवाटप करण्यासाठी या भागातील प्रत्येक गावात पाणीवाटप संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. मात्र या संस्था फक्त नावापुरत्याच अवलंबून असून चासकमान पाणीवाटपाच्या बैठका पालकमंत्री व आमदारांच्या उपस्थितीत मुंबई या ठिकाणी घेतल्या जातात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विचारात घेतले जात नाही. कालव्याचा टेलच अद्याप निश्चित करण्यात आलेला नसून केवळ राजकीय स्वार्थासाठी पुढारी पाणी पळवत असून या भागातील पिंपळे जगताप, वाजेवाडी, जातेगाव खुर्द या गावांवर अन्याय होत आहे. या परिसरात चासकमानच्या धरणासाठी भूसंपादन मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले होते. मात्र, पाण्यासाठी आज याच भागाला शिरूरच्या पूर्व भागात प्रथम पाणी दिल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांना वाट पाहण्याची वेळ येत आहे. या भागातील करंदी, वाजेवाडी, जातेगाव खुर्द, वाजेवाडी, पिंपळे जगताप या गावांना कालव्यास पाणी असूनही पोलीस बंदोबस्तात ते खाली नेण्यासाठी पुढारी प्रयत्न करीत आहे.नागरिकांचा प्रतिसाद नाहीसंबंधित विभागातील कार्यकारी अधिकारी लोंढे यांना नागरिकांनी फोन केला असता त्यांना प्रतिसाद मिळत नाही. जमीन महसूल कायद्यानुसार प्रथम कालव्यालगतच्या शेतकऱ्यांना पाणी देणे अपेक्षित असतानाही लाभक्षेत्रात नसतानाही काही भागात पाणी देण्यात येत असल्याने पदाचा गैरवापर होत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केलेला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात  येणार असल्याचे शेतकरी  मोहन टाकळकर यांनी सांगितले.