शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

नाझरेतून दोन दिवसांत पाणी द्या

By admin | Updated: November 9, 2015 01:41 IST

नाझरे जलाशयातून लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेचे दोन दिवसांत आवर्तन सोडावे; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल

जेजुरी : नाझरे जलाशयातून लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेचे दोन दिवसांत आवर्तन सोडावे; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नाझरे क.प., जवळार्जुन, मावडी क.प., आंबी व मोरगाव येथील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे. या वेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी रविवारी जलसंपदा विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत जलाशयात केवळ ५१० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असल्याने १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडावे. तेही २० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर याच कालावधीत. या निर्णयामुळे लाभार्थी शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी यावेळी वरील मागणी केली.यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, पुरंदर उपसा योजनेचे कार्यकारी अभियंता मारुती नणवरे, पुरंदर उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे के.एस.पाटील, शाखाधिकारी शहाजी सस्ते, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक महेश राणे, माजी उपाध्यक्ष सुधाकर टेकवडे, मोरगावचे सरपंच दत्ता ढोले, जवळार्जुनचे माजी सरपंच माऊली राणे, सोमनाथ टेकवडे, नागेश टेकवडे, रामभाऊ राणे, मावडी क.प. चे सरपंच चंद्रकांत भामे, माजी सरपंच हनुमंत चाचर, अमोल चाचर, दत्ता भामे, यशवंत देशमुख, बाळसाहेब देशमुख, नाझरे क.प.चे सरपंच नानासाहेब नाझिरकर, माजी सरपंच संतोष नाझिरकर, आंबीचे वसंत तावरे, नारायण तावरे आदी दोनशे शेतकरी उपस्थित होते. त्यांनी तीव्र भघवना व्यक्त केल्या.शेतकऱ्यांंच्या भावना आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय करू, असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता ननवरे यांनी शेतकऱ्यांना दिले. औद्योगिक क्षेत्रासाठी वीर जलाशयावरून पाणीपुरवठा करणे शक्य आहे. योजना त्वरित कार्यान्वित करून त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटवता येईल. - अशोक टेकवडे, माजी आमदार१९ नोव्हेंबरनंतर पाणी सोडण्याला काहीच अर्थ राहत नाही. त्या वेळी पिके पाण्याअभावी जळून गेलेली असतील.- हनुमंत चाचर, मावडी क. प. चे माजी सरपंचऔद्योगिक वसाहतीसाठी पाणी न देण्याचा निर्णय व तसा ठराव करूनही, लगेच तीन दिवसांत निर्णय जलसंपदा विभागाकडून का बदलण्यात आला.- सुधाकर टेकवडे, माजी उपाध्यक्ष, सोमेश्वर आय.एस.एम.टी कंपनी आणि औद्योगिक वसाहतीचे पाणी आजपासूनच बंद करा.- संतोष नाझिरकर, नाझरे क.प.चे माजी सरपंच