शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

नाझरेतून दोन दिवसांत पाणी द्या

By admin | Updated: November 9, 2015 01:41 IST

नाझरे जलाशयातून लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेचे दोन दिवसांत आवर्तन सोडावे; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल

जेजुरी : नाझरे जलाशयातून लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेचे दोन दिवसांत आवर्तन सोडावे; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नाझरे क.प., जवळार्जुन, मावडी क.प., आंबी व मोरगाव येथील शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला दिला आहे. या वेळी शेतकरी प्रचंड आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांनी रविवारी जलसंपदा विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची भेट घेतली. गेल्या आठवड्यात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत जलाशयात केवळ ५१० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असल्याने १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडावे. तेही २० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर याच कालावधीत. या निर्णयामुळे लाभार्थी शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी यावेळी वरील मागणी केली.यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, पुरंदर उपसा योजनेचे कार्यकारी अभियंता मारुती नणवरे, पुरंदर उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे के.एस.पाटील, शाखाधिकारी शहाजी सस्ते, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक महेश राणे, माजी उपाध्यक्ष सुधाकर टेकवडे, मोरगावचे सरपंच दत्ता ढोले, जवळार्जुनचे माजी सरपंच माऊली राणे, सोमनाथ टेकवडे, नागेश टेकवडे, रामभाऊ राणे, मावडी क.प. चे सरपंच चंद्रकांत भामे, माजी सरपंच हनुमंत चाचर, अमोल चाचर, दत्ता भामे, यशवंत देशमुख, बाळसाहेब देशमुख, नाझरे क.प.चे सरपंच नानासाहेब नाझिरकर, माजी सरपंच संतोष नाझिरकर, आंबीचे वसंत तावरे, नारायण तावरे आदी दोनशे शेतकरी उपस्थित होते. त्यांनी तीव्र भघवना व्यक्त केल्या.शेतकऱ्यांंच्या भावना आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून योग्य तो निर्णय करू, असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता ननवरे यांनी शेतकऱ्यांना दिले. औद्योगिक क्षेत्रासाठी वीर जलाशयावरून पाणीपुरवठा करणे शक्य आहे. योजना त्वरित कार्यान्वित करून त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटवता येईल. - अशोक टेकवडे, माजी आमदार१९ नोव्हेंबरनंतर पाणी सोडण्याला काहीच अर्थ राहत नाही. त्या वेळी पिके पाण्याअभावी जळून गेलेली असतील.- हनुमंत चाचर, मावडी क. प. चे माजी सरपंचऔद्योगिक वसाहतीसाठी पाणी न देण्याचा निर्णय व तसा ठराव करूनही, लगेच तीन दिवसांत निर्णय जलसंपदा विभागाकडून का बदलण्यात आला.- सुधाकर टेकवडे, माजी उपाध्यक्ष, सोमेश्वर आय.एस.एम.टी कंपनी आणि औद्योगिक वसाहतीचे पाणी आजपासूनच बंद करा.- संतोष नाझिरकर, नाझरे क.प.चे माजी सरपंच