शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

लस तर विनामूल्य द्याच, पण धान्यपुरवठाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: स्वाभिमानाने करत असलेला रोजगार बंद झाला. नैसर्गिक आपत्ती म्हणून वर्षभर शिलकीत दिवस काढले, आता ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: स्वाभिमानाने करत असलेला रोजगार बंद झाला. नैसर्गिक आपत्ती म्हणून वर्षभर शिलकीत दिवस काढले, आता ती शिलकी पण संपली, आता सरकार हाच आसरा आहे, त्यामुळे लसीबरोबरच जगण्यासाठी अन्नधान्याचाही पुरवठा सरकारने करावा, अशी मागणी अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव व निमंत्रक नितीन पवार यांनी केली आहे.

सन १९७२ च्या दुष्काळात तत्कालीन सरकारने ही जबाबदारी ओळखून जनता जगवली होती. त्याही आधी ब्रिटिशांनीसुद्धा अशा संकटात जनतेला कधी वाऱ्यावर सोडलेले नाही, त्यामुळे आताही सरकारवर तीच जबाबदारी आहे, ती सोडून सरकार खासगी रुग्णालयांंना लशींचा पुरवठा करत असेल तर ते कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेच्या विरोधात आहे, असे मत डॉ. आढाव यांनी व्यक्त केले.

गेल्या संपूर्ण वर्षभरात कष्टकरी जनतेचा रोजगारच बंद आहे. त्यात बुटपॉलिश करून पोट भरणारे ते रोज वडापावची विक्री करून घर चालवणारे अशा अनेकांचा समावेश आहे. हे सगळे लोक कष्ट करून स्वाभिमानाने पोट भरत होते. व्यवसाय बंद झाला तरी त्यांनी हिमतीने शिलकीवर घर चालवले. आता मात्र त्यांच्याजवळ काहीच शिल्लक नसून सरकारनेच त्यांना जगवण्याची जबाबदारी घ्यायला हवी.

त्यानुसार सरकारने आता या सर्वांच्या विनामूल्य लसीकरणाची व्यवस्था करावी, त्यांना रेशनिंगवर धान्याबरोबरच तेल, तूप, डाळी, मसाले या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू करावा, कष्टकऱ्यांची ही मागणी सरकारने विनाविलंब मान्य करावी, अन्यथा कष्टकरी जनतेला बरोबर घेऊन लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सरकारी अधिकारी यांच्या दारात धरणे धरण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल, असा इशारा डॉ. आढाव व निमंत्रक पवार यांनी दिला आहे.