शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दूरसंचारमधील कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:10 IST

--- मंचर : कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दूरसंचार कंपन्यामधील नेटवर्क ऑपरेशन्स व मेंटेनन्स विभागातील कर्मचाऱ्यांना 'फ्रन्टलाइन कोविड-१९ कर्मचारी' म्हणून ...

---

मंचर : कोरोनाकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दूरसंचार कंपन्यामधील नेटवर्क ऑपरेशन्स व मेंटेनन्स विभागातील कर्मचाऱ्यांना 'फ्रन्टलाइन कोविड-१९ कर्मचारी' म्हणून राज्य व केंद्र शासनाने मंजुरी देऊन सन्मानित करावे, अशी मागणी शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय दूरसंचार मंत्री डॉ. रविशंकर प्रसाद यांच्याकडे केली.

यासंदर्भात, माजी खासदार आढळराव पाटील यांनी म्हटले आहे की, राज्यातील आरोग्य व पोलीस यंत्रणांनी कोरोना वॉरियर्स म्हणून आजपर्यंत उत्कृष्ट सेवा बजावली आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून इंटरनेट व दूरसंचार यंत्रणेचा वापर कमालीचा वाढल्याने अखंडित मोबाईल नेटवर्क सुविधा व जास्तीत जास्त पारदर्शक सेवा पुरविण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात वाढून या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरीक्त ताण निर्माण होऊनही त्यांनी हे आव्हान लीलया पेलले व नागरिकांना उत्तम व सुरळीत सेवा पुरविण्याची जबाबदारी कसोशीने पार पाडली आहे. नागरिक व विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे शक्य नसल्याने एकमेकांना कनेक्ट राहता यावे यासाठी ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन परीक्षा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या शासकीय आढावा बैठका, आरोग्य तपासणी व त्यांचे रिपोर्ट, टेलीमेडिसीन सुविधा, ऑनलाईन पेमेंट तसेच वर्क फ्रॉम होम आदी इंटरनेटवर आधारित सुविधा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम उल्लेखनीय असून, या कामाची शासनाकडून दखल घेणे आवश्यक आहे. या कर्मचाऱ्यांनी कठीण प्रसंगात, ग्रामीण व शहरी भागात वैयक्तिक जोखीम पत्करून दिवसरात्र न पाहता तांत्रिक बिघाड तत्काळ दूर करून लोकांना अविरत इंटरनेट व दूरसंचार सेवा पुरविली आहे.गोवा राज्याने देखील नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत टेलीकॉम नेटवर्क सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना फ्रन्टलाईन कोविड कर्मचारी म्हणून दर्जा दिला आहे.

--

कोट

जीव धोक्यात घालून करताहेत काम

-

केंद्र सरकारच्या पार्लिमेंटरी समितीने बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनादेखील कोरोना योध्यांमध्ये समाविष्ट केले आहे.

कोरोना काळ सुरू झाल्यापासून देशातील व राज्यातील विविध खासगी दूरसंचार कंपन्यांमधील या कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून दूरसंचार यंत्रणा सक्षम ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून राज्य व केंद्र शासनाने सन्मानित करावे.

- शिवाजीराव आढळराव पाटील