शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

धान्य शिल्लक साठ्यातून सामाजिक संस्थांना द्या!

By admin | Updated: January 26, 2016 01:47 IST

जिल्ह्यातील २३ सामाजिक संस्थांना शासनाकडून कल्याणकारी योजनेत देण्यात येणारे धान्य आॅक्टोबर महिन्यापासून बंद करण्यात आल्याने अनेक बालाश्रम,

पुणे : जिल्ह्यातील २३ सामाजिक संस्थांना शासनाकडून कल्याणकारी योजनेत देण्यात येणारे धान्य आॅक्टोबर महिन्यापासून बंद करण्यात आल्याने अनेक बालाश्रम, वृद्धाश्रम व वसतिगृहातील मुलांवर उपासमारीची वेळ आली होती. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेऊन शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन तातडीने सर्व संस्थांना शिल्लक धान्यसाठ्यातून पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी सांगितले की, कल्याणकारी योजनेत धान्यपुरवठा करण्यात येणाऱ्या संस्थांना बुधवारपासून धान्यवाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या वतीने कल्याणकारी योजनेंतंर्गत शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्था, वसतिगृहे, वृद्धाश्रम, कारागृह, बालाश्रम, आश्रमशाळांना दर महिन्याला रेशनिंगवर मिळणारे धान्य उपलब्ध करून दिले जाते. पुरवठा विभागाच्या वतीने धान्याची मागणी असणाऱ्या संस्थांना रेशनकार्डप्रमाणे स्वतंत्र ‘आस्थापना कार्ड’ उपलब्ध करून दिले जाते. हे धान्य रेशनिंगवर मिळणाऱ्या दरामध्येच म्हणजे २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ या दराने उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याकडे कल्याणकारी योजनेंतर्गत किती धान्याची मागणी आहे याचा प्रस्ताव मागविला जातो. त्यानंतर राज्य शासन हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवते आणि केंद्राकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यापासून असा प्रस्तावच केंद्राकडे पाठविलेला नसल्याने धान्य उपलब्ध करून दिलेले नाही. यामुळे शहरातील २३ संस्थांना आॅक्टोबर महिन्यापासून हे स्वस्त धान्यच मिळालेले नाही. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शासनाने केंद्र शासनाकडून धान्य येण्याची वाट न पाहता शिल्लक असलेल्या धान्यसाठ्यातून या संस्थांना धान्यपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.