शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
4
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
5
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
6
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
7
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
8
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
9
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
10
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
11
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
12
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
13
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
14
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
15
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
16
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
17
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
18
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
19
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला

सहा महिन्यांचा अवधी द्या

By admin | Updated: February 10, 2015 01:32 IST

शहरातील कचराप्रश्नावर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी मार्ग काढला जात आहे. ८ आॅक्टोबरनंतर उरुळी कांचन येथे कचरा टाकला जाणार नाही

पुणे : शहरातील कचराप्रश्नावर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी मार्ग काढला जात आहे. ८ आॅक्टोबरनंतर उरुळी कांचन येथे कचरा टाकला जाणार नाही, असे आश्वासन खासदार अनिल शिरोळे यांनी आज येथे दिले.भाजपच्या सदस्यत्व नोंदणी अभियानाची माहिती सांगण्यासाठी आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. मोबाईलवरील एसएमएसद्वारे आजवर १ लाख ४३ हजार सदस्य नोंदणी झाली असून, ५ लाख सदस्यांची नोंदणी करण्याचे शहर भाजपचे उद्दिष्ट आहे. ११ फेब्रुवारीस दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त २५५४ बूथवर सदस्य नोंदणीचे अभियान राबविले जाईल, असे शिरोळे यांनी नमूद केले.शहरात कचरा जाळला जात असल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर शिरोळे म्हणाले, की कचऱ्याबाबत गेल्या २५ वर्षांत नियोजन झाले नाही. कोथरूडचा कचरा डेपो तेथील नागरिकांच्या विरोधामुळे बंद केला गेला आणि उरुळी कांचनला नेऊन टाकला जाऊ लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पुणेकरच आहेत. पुण्याच्या सर्व प्रश्नांबाबत त्यांना पुणेकरांइतकीच आस्था आहे. म्हणूनच त्यांनी ८ जानेवारी रोजी या प्रश्नावर बैठक घेतली. उरुळी कांचनचे ग्रामस्थही हजर होते. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंत त्यांनी मुदत मागितली आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी हा प्रश्न सोडविला जाईल. ८ आॅक्टोबरनंतर तेथे कचरा टाकला जाणार नाही, असा मी शब्द देतो. (प्रतिनिधी)