शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

हक्काचे पाणी प्रकल्पग्रस्तांना द्या

By admin | Updated: April 11, 2016 00:37 IST

उजनी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यातील हक्काचे दहा टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांना मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील शंभर गावांचा शेतीपंपांचा दोन

इंदापूर : उजनी धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यातील हक्काचे दहा टीएमसी पाणी प्रकल्पग्रस्तांना मिळावे, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील शंभर गावांचा शेतीपंपांचा दोन तासांवर आणलेला वीजपुरवठा आठ तास करावा, या प्रमुख मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटी व उजनी धरणग्रस्त संवर्धन समितीच्या वतीने रविवारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगराई येथील बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. उजनी पाणलोट क्षेत्रातील सुमारे शंभर गावांमधील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता अचानक वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गावातील नळ पाणीपुरवठा योजना, पिठाच्या गिरण्या, मिरची कांडप यंत्रे यांच्यासह शेतकऱ्यांचे लघुउद्योग अडचणीत आले आहेत. या संदर्भात ७ एप्रिल रोजी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा पूर्ववत करावा. पुरेशा दाबाने आठ तास वीज मिळावी अशी मागणी करून दखल घेतली गेली नाही तर मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. उजनी धरणग्रस्त संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष अंकुश पाडुळे यांचे भाषण झाले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महावितरण विभागाचे उपविभागीय अभियंता सज्जाद शेख, रघुनाथ गोफणे यांच्या उपस्थितीत तहसीलदार वर्षा लांडगे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव, मयूरसिंह पाटील, मंगेश पाटील, मुकुंद शहा, नगराध्यक्ष अशोक इजगुडे, भरत शहा, विलास वाघमोडे, दीपक जाधव, प्रमोद राऊत, उजेर शेख, ऋतुजा पाटील, माया विंचू, अलका ताटे आदींसह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. उजनी प्रकल्पग्रस्तांचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली जाईल. वीजकपात व इतर प्रश्न त्यांच्यासमोर मांडले जातील, असे हर्षवर्धन पाटील यांनी या वेळी सांगितले.