शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपंपांना २४ तास वीज द्या

By admin | Updated: May 6, 2017 01:40 IST

नारायणगाव परिसरात अचानक भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या आठवड्यात

नारायणगाव परिसरात अचानक भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या आठवड्यात शेतीपंपांना वीजपुरवठा १२ तासांहून ६ तासांवर आणल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी आहे़शेतीपंपासाठी १२ तास वीजपुरवठा देण्यात येत होता़ परंतु काही दिवसांपासून ६ ते ७ तासच वीजपुरवठा होत आहे. शेतीपंपासाठी सलग वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नारायणगाव येथील शेतकरी शिवदास तांबे यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात वादळ झाल्याने अनेक भागांत विजेचे पोल पडलेत तर काही ठिकाणी वाकले आहेत. त्यामुळे येडगाव, धनगरवाडी, पिंपळगाव या तीन गावांमध्ये सलग तीन ते चार दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्या गावांमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते़ वीजपुरवठा त्वरित सुरू होण्यासाठी जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरू केला़ वीजवितरण कंपनी वेळी-अवेळी पुरवठा खंडित करीत असल्याने नारायणगाव शहरातील अनेक व्यवसाय ठप्प होत असल्याने व्यापारी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे़ याबाबत नारायणगाव वीजवितरण कंपनीचे नारायणगाव शहराचे सहायक अभियंता शेंडकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की पावसाची परिस्थिती दिसल्यास भारनियमन करण्यात येते किंवा वरिष्ठ कार्यालयातून इमर्जन्सी आल्यास भारनियमन करावे लागते़ पुढील ४८ तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल़ आंबेगाव तालुक्यात विजेचे अघोषित भारनियमन सुरू आहे. कडक उन्हामुळे विजेची मागणी जास्त; मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने अचानक वीजपुरवठा खंडित केला जातो. भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पिकांना पाणी देणे अवघड झाले असून, भारनियमनामुळे सर्वच जण त्रस्त झाले आहेत.उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते; मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नाही. यामुळे वारंवार भारनियमन करावे लागते. वीज वितरण कंपनीला अचानक २ तासांचे भारनियमन करा, अशी सूचना येते व लगेच भारनियमन सुरू होते.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात भारनियमन होत आहे. त्याचा फटका सर्वच वर्गांना बसत आहे. तीव्र उन्हामुळे शेतीपिकांना वारंवार पाणी द्यावे लागते. अनेक सार्वजनिक विहिरींमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचे दिवस ठरवून घेतले आहेत. मात्र, अचानक होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. पिकांना पाणी देणे अवघड झाले असून, पाणी असूनही पिके जळू लागली आहेत.