शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

शेतीपंपांना २४ तास वीज द्या

By admin | Updated: May 6, 2017 01:40 IST

नारायणगाव परिसरात अचानक भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या आठवड्यात

नारायणगाव परिसरात अचानक भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या आठवड्यात शेतीपंपांना वीजपुरवठा १२ तासांहून ६ तासांवर आणल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी आहे़शेतीपंपासाठी १२ तास वीजपुरवठा देण्यात येत होता़ परंतु काही दिवसांपासून ६ ते ७ तासच वीजपुरवठा होत आहे. शेतीपंपासाठी सलग वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नारायणगाव येथील शेतकरी शिवदास तांबे यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात वादळ झाल्याने अनेक भागांत विजेचे पोल पडलेत तर काही ठिकाणी वाकले आहेत. त्यामुळे येडगाव, धनगरवाडी, पिंपळगाव या तीन गावांमध्ये सलग तीन ते चार दिवस वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्या गावांमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते़ वीजपुरवठा त्वरित सुरू होण्यासाठी जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तातडीने वीजपुरवठा सुरू केला़ वीजवितरण कंपनी वेळी-अवेळी पुरवठा खंडित करीत असल्याने नारायणगाव शहरातील अनेक व्यवसाय ठप्प होत असल्याने व्यापारी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे़ याबाबत नारायणगाव वीजवितरण कंपनीचे नारायणगाव शहराचे सहायक अभियंता शेंडकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की पावसाची परिस्थिती दिसल्यास भारनियमन करण्यात येते किंवा वरिष्ठ कार्यालयातून इमर्जन्सी आल्यास भारनियमन करावे लागते़ पुढील ४८ तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल़ आंबेगाव तालुक्यात विजेचे अघोषित भारनियमन सुरू आहे. कडक उन्हामुळे विजेची मागणी जास्त; मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने अचानक वीजपुरवठा खंडित केला जातो. भारनियमनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पिकांना पाणी देणे अवघड झाले असून, भारनियमनामुळे सर्वच जण त्रस्त झाले आहेत.उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते; मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नाही. यामुळे वारंवार भारनियमन करावे लागते. वीज वितरण कंपनीला अचानक २ तासांचे भारनियमन करा, अशी सूचना येते व लगेच भारनियमन सुरू होते.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त प्रमाणात भारनियमन होत आहे. त्याचा फटका सर्वच वर्गांना बसत आहे. तीव्र उन्हामुळे शेतीपिकांना वारंवार पाणी द्यावे लागते. अनेक सार्वजनिक विहिरींमध्ये शेतकऱ्यांनी पाण्याचे दिवस ठरवून घेतले आहेत. मात्र, अचानक होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. पिकांना पाणी देणे अवघड झाले असून, पाणी असूनही पिके जळू लागली आहेत.