शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

'गिरीवन'वासीयांच्या नशिबी वनवासच

By admin | Updated: May 9, 2014 08:51 IST

माजी खासदार रामभाऊ म्हाळगी यांच्या मुलाने सुरू केलेली कंपनी म्हणून मोठय़ा विश्‍वासाने पैसे गुंतवून जमीन खरेदी केलेल्या गिरीवन या प्रकल्पातील खरेदीदारांच्या नशिबी २४ वर्षांपासून वनवासच आला आहे.

पुणे : माजी खासदार रामभाऊ म्हाळगी यांच्या मुलाने सुरू केलेली कंपनी म्हणून मोठय़ा विश्‍वासाने पैसे गुंतवून जमीन खरेदी केलेल्या गिरीवन या प्रकल्पातील खरेदीदारांच्या नशिबी २४ वर्षांपासून वनवासच आला आहे.निवृत्तीनंतरचे आयुष्य निवांतपणे व्यतीत करण्यासाठी जवळची सर्व पुंजी खर्ची घातलेल्या या ज्येष्ठ नागरिकांवर आता कोर्टकचेर्‍या करण्याची वेळ आली आहे. पोलिसांपासून ते महसूल यंत्रणेपर्यंत कोठूनही न्याय मिळत नसल्याने खरेदीदार अडचणीत सापडले आहेत. नि:स्पृह आणि समाजासाठी आयुष्य वेचणारे रामभाऊ म्हाळगी यांचे पुत्र जयंत आणि स्नुषा सुजाता म्हाळगी यांनी १९८९ मध्ये 'सुजाता फार्म्स' ही कंपनी स्थापन केली. मुळशी तालुक्यातील होतले व डोंगरगाव येथे 'गिरीवन हिल स्टेशन' प्रकल्पाची सुरुवात केली. रामभाऊ म्हाळगी यांच्यावरील विश्‍वासापोटी अनेकांनी येथे जमिनी खरेदी केल्या. अनेकांनी तर नवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम त्यात गुंतविली. त्याप्रमाणे त्यांना जागाही दाखविण्यात आल्या. मात्र, अनेक वर्षांनंतरही जमिनी नावावर होत नसल्याने खरेदीदारांना धक्काच बसला. त्याचे कारण विचारले असता शासकीय नियमाप्रमाणे शेतकरी असलेल्यांनाच जमीन खरेदीचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात या प्रकारची कोणतीही अडचण येणार नसल्याचे 'सुजाता फार्म्स'कडून सांगण्यात आले होते. कागदोपत्री नावावर नसली, तरी जमीन आपलीच असल्याने तेथे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या खरेदीदारांना रस्त्यावरून जाऊही दिले जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. फसवणूक झालेल्या 'गिरीवन प्लॉट ओनर्स असोसिएशन'चे के. डी. वेलणकर यांच्यासह अनेक खरेदीदारांनी 'लोकमत'कडे आपली व्यथा मांडली. ते म्हणाले, ''सुमारे ८५0 जणांनी या ठिकाणी प्लॉट घेतले आहेत. मात्र, त्यांची विक्री करताना कंपनीने सरकारी मोजणी केलेली नाही. या भूखंडावर जाण्यासाठी कंपनीने वहिवाटीचा रस्ता कंपनीच्या खर्चातून बनवून घेतला. हा रस्ता जमीनमालकांच्या हद्दीतून जातो. त्याची मालकी जमीनधारकांची असून, तो सार्वजनिक रस्ता असल्याचा निकालही न्यायालयाने दिला आहे. तरीही एखादा जमीनमालक आपल्या जमिनीवर जाऊ लागला, तर त्याला मज्जाव केला जातो. याविरुद्ध पौंड पोलिसांकडे तक्रार केल्यावर त्यांनी कंपनीला व जयंत म्हाळगी यांना नोटीसही काढली होती.'' तरीही अजूनही स्वत:च्याच जमिनीवर जाण्यास आम्हास आडकाठी केली जात असल्याचे वेलणकर म्हणाले. याबाबत जयंत म्हाळगी यांच्या प्रतिनिधींनी सांगितले, की प्लॉटधारकांच्या जागा त्यांच्या नावावर होण्याची प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांकडे प्रलंबित आहे. त्यासाठी आवश्यक बाबी प्लॉटमालकांनीच पूर्ण करणे आवश्यक आहेत. प्लॉटधारकांच्या मागणीनुसारच सुरक्षा ठेवण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर कोणालाही अडविले जात नाही. येणार्‍या-जाणार्‍यांची नोंद करण्यासाठी थांबविले जाते. (प्रतिनिधी)

संशयास्पद व्यवहारकोणतीही कंपनी ही बिगर शेतकरी असल्याने शेतजमिनीचा व्यवहार करू शकत नाही, या कायद्याला 'सुजाता फार्म्स'ने 'ट्रेड मार्क क्लास ३६'ने बगल दिली. या कायद्याप्रमाणे बँक किंवा सावकारी पद्धतीने व्यवहार केले जातात. त्याप्रमाणे कंपनीने विशिष्ट शेतकर्‍यांना १00 टक्के कर्जे दिली आणि सावकारी पद्धतीने शेतजमिनी शेतकर्‍यांकडून गहाणखत करून घेतल्या. या पद्धतीने वारंवार कर्जे देऊन सुमारे २00 एकर जमीन घेतली गेली आहे.