शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - गिरीश बापट

By admin | Updated: May 1, 2017 16:04 IST

आपत्तीग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना माळीणचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यात येणार असल्याची बाब जिल्हा प्रशासनासाठी अभिमानास्पद असल्याचे गिरीश बापट म्हणालेत.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 1 -  आपत्तीग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना माळीण गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यात येणार असल्याने ही बाब जिल्हा प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.
 
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे उपस्थित होते.
 
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पुणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून हे प्राधिकरण औद्योगिक गुंतवणुक, वाहतूक, नगर नियोजन आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रात प्रभावीपणे काम करीत असून स्मार्ट सिटी योजनेतील कामांना सुरुवात झाली आहे. शहराच्या विकास आराखडयाला मंजुरी मिळाल्यामुळे शहर व उपनगरामध्ये पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. 
 
गेल्या वर्षी जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसा पाणी पुरवठा झाला असून पुणे शहर व ग्रामीण भागाला येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर पीओएस मशिनद्वारे धान्य वाटप सुरू करण्यात आले असून येणाऱ्या काळात सर्वच स्वस्त धान्य दुकानांमध्ये पीओएस मशीन बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र धोरणांतर्गत टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये यावर्षीही जिल्हा अग्रेसर राहील, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
 
तत्पुर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांना मानवंदना देण्यात आली. पुणे शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, नागरी संरक्षण दलाच्या पथकांनी शानदार संचलन करून पालकमंत्री बापट यांना मानवंदना दिली. यावेळी माळीण गावाच्या पुनर्वसनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, तलाठी नितीन चौरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले.
 
यावेळी  खासदार अमर साबळे, महापौर मुक्ता टिळक, राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव,जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, कृषी आयुक्त विकास देशमुख, यशदाचे महासंचालक आनंद लिमये यांच्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
 
दरम्यान, सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शनिवार वाडा येथे ध्वजारोहण झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.