शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध - गिरीश बापट

By admin | Updated: May 1, 2017 16:04 IST

आपत्तीग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना माळीणचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यात येणार असल्याची बाब जिल्हा प्रशासनासाठी अभिमानास्पद असल्याचे गिरीश बापट म्हणालेत.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 1 -  आपत्तीग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना माळीण गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यात येणार असल्याने ही बाब जिल्हा प्रशासनासाठी अभिमानास्पद आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.
 
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे उपस्थित होते.
 
पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, पुणे आणि परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली असून हे प्राधिकरण औद्योगिक गुंतवणुक, वाहतूक, नगर नियोजन आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रात प्रभावीपणे काम करीत असून स्मार्ट सिटी योजनेतील कामांना सुरुवात झाली आहे. शहराच्या विकास आराखडयाला मंजुरी मिळाल्यामुळे शहर व उपनगरामध्ये पुनर्विकासाला चालना मिळणार आहे. 
 
गेल्या वर्षी जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी पुरेसा पाणी पुरवठा झाला असून पुणे शहर व ग्रामीण भागाला येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. स्वस्त धान्य दुकानांमध्ये प्रायोगिक तत्वावर पीओएस मशिनद्वारे धान्य वाटप सुरू करण्यात आले असून येणाऱ्या काळात सर्वच स्वस्त धान्य दुकानांमध्ये पीओएस मशीन बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र धोरणांतर्गत टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीमध्ये यावर्षीही जिल्हा अग्रेसर राहील, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.
 
तत्पुर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांना मानवंदना देण्यात आली. पुणे शहर पोलीस, ग्रामीण पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, नागरी संरक्षण दलाच्या पथकांनी शानदार संचलन करून पालकमंत्री बापट यांना मानवंदना दिली. यावेळी माळीण गावाच्या पुनर्वसनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय कवितके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, तलाठी नितीन चौरे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले.
 
यावेळी  खासदार अमर साबळे, महापौर मुक्ता टिळक, राज्य माहिती आयुक्त रवींद्र जाधव,जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, कृषी आयुक्त विकास देशमुख, यशदाचे महासंचालक आनंद लिमये यांच्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिक, विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, समाजाच्या विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
 
दरम्यान, सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते शनिवार वाडा येथे ध्वजारोहण झाले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.