शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वेल्हेतील घोल गाव बनले पहिले सांडपाणी मुक्त गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले अतिदुर्गम घोल गाव सांडपाणी मुक्त झाल्याने वैयक्तिक आर्थिक ...

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले अतिदुर्गम घोल गाव

सांडपाणी मुक्त झाल्याने वैयक्तिक आर्थिक लाभही येथील ग्रामस्थांना झाला आहे. यामुळे गाव स्वच्छता, प्रदूषण, आणि डास मुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पाणी पातळी वाढण्यास देखील मोठी मदत होणार आहे. २८ जानेवारी रोजी ग्रामस्थांची बैठक घेऊन माहिती दिली गेली त्यासाठी लागणारी कागद पत्रे जमा होताच कामांना मंजुरी मिळाली व अवघ्या तीस दिवसांत ग्रामस्थांनी ही कामे पूर्ण केली. त्यामुळे लवकरच नाडेफ व गांडूळ खत प्रकल्पाचे काम हाती घेणार असल्याची माहीती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली.

जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी सांगितले की, शोषखड्डा हे जमिनी खालील बांधकाम आहे. त्याव्दारे पाण्याचा निचरा होण्यास पूर्ण मदत होते. पूर्वी निवळण केलेले पाणी, बाथरूम मधील व हातपंपातील पाणी शोषखडयात सोडण्यात येते. नंतर हे पाणी खडयातून आसपासच्या जमिनीत झिरपते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याबरोबरच पाण्याचा पुनः वापर व जलस्त्रोताची शाश्वतता राहण्यास मदत होते.या गावातील कामाची पाहणी करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी भेट देत गावकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

वेल्हे तालुक्यातील घोल गावं सांडपाणी मुक्त झाल्याने तालुक्यातील इतर गावे याचा आदर्श घेत आहेत. यामध्ये वरोती, मंजाई आसनी ही गावे आघाडीवर आहेत तर संपूर्ण तालुक्यात ही योजना प्रभावीपणे राबविणार आहे.

विशाल शिंदे गटविकास अधिकारी

वेल्हे

सांडपाण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार तीनशे 33 कामे हाती घेण्यात आली आहेत.

२०२०-२१ मध्ये फेब्रुवारी अखेर २९९ कामे पूर्ण झाली.त्यामध्ये आंबेगांव-९,बारामती-१४, भोर-७५, हवेली-८,खेड-१,मावळ-१९२ यांचा समावेश आहे.

श्रीरंग चोरघे ,जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी

१५ मार्गासनी १

घोल(ता. वेल्हे) येथील शोषखड्ड्याची पाहणी करताना सभापती दिनकर सरपाले व जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे व इतर