शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
2
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
3
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
4
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
5
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
6
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
7
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
8
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
9
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
10
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
12
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
13
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
14
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
15
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
16
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
17
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
18
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
19
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
20
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

जिल्ह्यात वेल्हेतील घोल गाव बनले पहिले सांडपाणी मुक्त गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:12 IST

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले अतिदुर्गम घोल गाव सांडपाणी मुक्त झाल्याने वैयक्तिक आर्थिक ...

वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेले अतिदुर्गम घोल गाव

सांडपाणी मुक्त झाल्याने वैयक्तिक आर्थिक लाभही येथील ग्रामस्थांना झाला आहे. यामुळे गाव स्वच्छता, प्रदूषण, आणि डास मुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पाणी पातळी वाढण्यास देखील मोठी मदत होणार आहे. २८ जानेवारी रोजी ग्रामस्थांची बैठक घेऊन माहिती दिली गेली त्यासाठी लागणारी कागद पत्रे जमा होताच कामांना मंजुरी मिळाली व अवघ्या तीस दिवसांत ग्रामस्थांनी ही कामे पूर्ण केली. त्यामुळे लवकरच नाडेफ व गांडूळ खत प्रकल्पाचे काम हाती घेणार असल्याची माहीती गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली.

जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी सांगितले की, शोषखड्डा हे जमिनी खालील बांधकाम आहे. त्याव्दारे पाण्याचा निचरा होण्यास पूर्ण मदत होते. पूर्वी निवळण केलेले पाणी, बाथरूम मधील व हातपंपातील पाणी शोषखडयात सोडण्यात येते. नंतर हे पाणी खडयातून आसपासच्या जमिनीत झिरपते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्याबरोबरच पाण्याचा पुनः वापर व जलस्त्रोताची शाश्वतता राहण्यास मदत होते.या गावातील कामाची पाहणी करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी भेट देत गावकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

वेल्हे तालुक्यातील घोल गावं सांडपाणी मुक्त झाल्याने तालुक्यातील इतर गावे याचा आदर्श घेत आहेत. यामध्ये वरोती, मंजाई आसनी ही गावे आघाडीवर आहेत तर संपूर्ण तालुक्यात ही योजना प्रभावीपणे राबविणार आहे.

विशाल शिंदे गटविकास अधिकारी

वेल्हे

सांडपाण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार तीनशे 33 कामे हाती घेण्यात आली आहेत.

२०२०-२१ मध्ये फेब्रुवारी अखेर २९९ कामे पूर्ण झाली.त्यामध्ये आंबेगांव-९,बारामती-१४, भोर-७५, हवेली-८,खेड-१,मावळ-१९२ यांचा समावेश आहे.

श्रीरंग चोरघे ,जिल्हा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी

१५ मार्गासनी १

घोल(ता. वेल्हे) येथील शोषखड्ड्याची पाहणी करताना सभापती दिनकर सरपाले व जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे व इतर