शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी ५८ टक्के मतदान; १२६ जागांवरील ६९२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद
3
इराण-अमेरिका युद्ध टळले? सैनिक कतारमधील अमेरिकन लष्करी तळावर परतले; इराणनेही हवाई क्षेत्र उघडले
4
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
5
Maharashtra Municipal Election Exit Polls : जयंत पाटलांच्या सांगलीत, शिंदेच्या सोलापुरात कोण मारणार बाजी ? एक्झिट पोलचे अंदाज वाचा
6
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
7
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
8
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
9
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
10
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
11
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
12
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
13
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
14
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
15
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
16
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
17
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
18
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
19
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
20
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
Daily Top 2Weekly Top 5

‘सरल’ला मिळेना ‘आधार’ची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 03:44 IST

‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही विद्यार्थ्यांकडे आधार नसणे तसेच आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख आणि यापूर्वी ‘सरल’मध्ये नोंदविण्यात आलेल्या

पुणे : ‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची नोंद करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही विद्यार्थ्यांकडे आधार नसणे तसेच आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख आणि यापूर्वी ‘सरल’मध्ये नोंदविण्यात आलेल्या नावांत बदल अशा विविध तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. माहिती भरण्यासाठी आता केवळ चार दिवस उरल्याने काही शिक्षक संघटनांनी या वर्षी ‘सरल’साठी आधार बंधनकारक करू नये, अशी मागणी राज्य शासनाकडे केली आहे.राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल’ प्रणालीमध्ये भरण्याची लगबग सध्या सर्वच शाळांमध्ये आहे. दररोज दोन-तीन शिक्षकांना हेच काम करावे लागत आहे. माहिती न भरल्यास संच मान्यतेसाठी शाळांना अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे शिक्षकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. मात्र, ही माहिती भरताना सातत्याने सर्व्हर डाऊन होत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहेत. त्यातच या वर्षी प्रत्येक विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे या अडचणींमध्ये भर पडली आहे. यापूर्वीच शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती या वेळी अद्ययावत केली जात आहे. हीमाहिती अद्ययावत करताना आधार कार्डवरील माहिती व आधीच माहिती याची खातरजमा करूनच भरावीलागत आहे.मात्र, काही विद्यार्थ्यांच्या आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख, वडलांचे नाव आणि यापूर्वी सरल प्रणालीत नोंदविलेल्या माहितीमध्ये काहीसा बदल आढळून येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची माहिती ‘सरल’मध्ये भरली जात नाही. तर काही विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याने त्यांची माहिती भरणे अशक्य आहे. काही विद्यार्थ्यांकडे आधारकार्डसाठी नोंदणी केल्याची पावती आहे. मात्र, त्याआधारे ‘सरल’मध्ये माहिती भरण्यातही शिक्षकांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेने आधार सक्ती रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.आधारकार्ड काढण्यास व बोगस विद्यार्थी शोधण्यास आमचा विरोध नाही. मात्र, याबाबत शासन व पालक यांचे योग्य ते सहकार्य मिळत नसल्याने शाळांमध्ये अराजकता निर्माण झाली आहे, असे या संघटनेने म्हटले आहे. तसेच, राज्यातील विनानुदानिक शिक्षक संघटनेनेही आधार सक्तीला विरोधाचा पवित्रा घेतला असल्याचे पुणे जिल्हा विनानुदानित शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र गवारी यांनी सांगितले.‘सरल’ प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दिवसभर तांत्रिक अडचणींमुळे माहिती अद्ययावत करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे बोटांवर मोजण्याइतपत विद्यार्थ्यांची माहिती भरली जात आहे. त्यामुळे काही शाळांतील शिक्षकांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. एका शाळेतील शिक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम मध्यरात्री दोन-तीन वाजेपर्यंत करावे लागत आहे. शाळेतील शिक्षिकाही दहा वाजेपर्यंत थांबतात. तर काही शिक्षक घरातील संगणकावर हे काम करत आहेत. माहिती भरली जात नसल्याने संच मान्यतेत शाळेतील शिक्षक अतिरिक्त ठरू नये, या भीतीने शिक्षकांची धावपळ सुरू आहे.