शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

व्यसनांची सोडा साथ कॅन्सरवर करा मात

By admin | Updated: February 2, 2015 23:24 IST

कॅन्सर! असे नुसते म्हटले तरी धडकी भरते. पण, प्रत्यक्ष परिस्थिती उद्भवल्यावर त्याचा सामना करण्याशिवाय पर्याय नसतो.

कॅन्सर! असे नुसते म्हटले तरी धडकी भरते. पण, प्रत्यक्ष परिस्थिती उद्भवल्यावर त्याचा सामना करण्याशिवाय पर्याय नसतो. या आजाराची पूर्ण माहिती आणि उपचार घेत असतानाच मानसिक अवस्था जपणेही तितकेच महत्त्वाचे असते. उद्या ४ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त...न्सर हा एकच आजार नसून, त्याचे शेकडो प्रकार आहेत. पण सर्वच कॅन्सरच्या गाठींची सुरुवात एका पेशीपासूनच होते. शरीराचा प्रत्येक अवयव पेशींपासून बनलेला असतो आणि त्यांची वाढ नियंत्रितरीतीने होत असते. कधीकधी काही कारणांनी हे नियंत्रण सुटते आणि या पेशी अनिर्बंधपणे, बेशिस्तपणे वाढू लागतात. आणि इथेच कॅन्सरची सुरुवात होते. या अनिर्बंध वाढलेल्या पेशी इतरत्र पसरू लागतात आणि तेथील अवयवांच्या कार्यात बाधा आणतात. कॅन्सर होण्याचे निश्चित असे कारण सांगता येणे अवघड आहे. व्यसनाधीनता हे कॅन्सरचे सगळ्यात महत्त्वाचे आणि टाळता येण्यासारखे कारण आहे. वाढते वयदेखील कॅन्सरचे महत्त्वाचे कारण आहे. अनुवंशिकता, बदलती जीवनशैली, स्थूलपणा, हॉर्मोन्सचे वाढते असंतुलन, काही विषारी रसायने, प्रदूषण ही कॅन्सरची आणखी काही महत्त्वाची कारणे आहेत. कॅन्सरच्या निदानासाठी त्या गाठीचा तुकडा किंवा सुईद्वारे गाठीतील रक्त काढून तपासले जाते, यावरून कॅन्सरचा नेमका प्रकार कोणता, हे तपासले जाते. याशिवाय एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, पेटस्कॅन यांसारख्या तपासण्यांद्वारे कॅन्सरची व्याप्ती समजू शकते. कॅन्सरवरील उपचार ठरविण्यासाठी आजाराची व्याप्ती माहीत असणे गरजेचे असते. एकाच जागी असलेल्या आजाराला शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकता येते किंवा तिच्यावर रेडीओथेरपीद्वारे क्ष-किरणांचा मारा करता येतो. सर्वत्र पसरलेल्या आजाराला किमोथेरपीचे उपचार करावे लागतात. कॅन्सरच्या निदानाने घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो. आज सर्व प्रकारच्या कॅन्सरवर प्रभावी असे उपचार उपलब्ध आहेत. अशा वेळी कुटुंबातील इतर लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरतो. रुग्णाला धीर देऊन त्याचे मनोधैर्य वाढविल्यास रुग्ण उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देतो. औषधांबरोबरच उत्तम आहार आणि जमेल तसा व्यायाम गरजेचा आहे. कॅन्सरचे उपचार दीर्घकाळ चालणारे असतात. त्यामुळे रुग्ण कधी कंटाळतात तर कधी खचून जातात. अशा वेळी कुटुंबीय किंवा मित्र-मंडळींनी आधार दिल्यास रुग्ण उपचार पूर्ण करूशकतो आणि कॅन्सरवर मात करण्यात यशस्वी होतो. उपचार अर्धवट सोडून देणे, उपचारात दिरंगाई करणे किंवा अयोग्य पद्धतीने उपचार करून घेणे प्रकृतीला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे या रोगाशी सामना करावा लागू नये यासाठी प्रत्येकाने स्वत:ची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये व्यसनांपासून दूर राहणे, भाज्या व फळेयुक्त समतोल आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि वेळोवेळी शरीराच्या तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. सर्व सुरळीतपणे सुरू असतानाही कॅन्सरच्या स्क्रीनिंग टेस्ट केल्या जातात. ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयमुखाचा कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर आणि प्रोटेस्ट ग्रंथींचा कॅन्सर यामध्ये चाचण्या वेळीच होणे गरजेचे आहे. लवकर निदान झाल्याने प्राथमिक अवस्थेतच उपचार होतात आणि रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कॅन्सरच्या तपासण्यांबाबत दक्ष राहावे. लेखक कर्करोगतज्ज्ञ (डी.एम.) आहेत.डॉ. चेतन देशमुख