शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अपयशी मानसिकतेतून बाहेर पडून यशस्वी व्हा!

By admin | Updated: June 29, 2017 03:45 IST

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी परिश्रमाबरोबरच काटेकोर नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी परिश्रमाबरोबरच काटेकोर नियोजन, सकारात्मक दृष्टिकोन आणि अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करीत असताना अपयश ही केवळ एक मानसिकता असून त्यातून बाहेर पडत यशस्वी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतील (बार्टी) विविध योजनांद्वारे प्रायोजित केल्या गेलेल्या आणि यूपीएससी-२०१६ च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा बुधवारी यशदा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बडोले बोलत होते. सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, सचिव दिनेश वाघमारे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, यशदाचे महासंचालक आनंद लिमये, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, प्रादेशिक पारपत्र अधिकारी अतुल गोतसुर्वे, आयकर उपायुक्त अजय ढोके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या वेळी स्नेहल लोखंडे, संतोष सुखदेवे, दशदिक्पाल नंदेश्वर, नितीन बगाटे, निखिल बोरकर, रूपेश शेवाळे, जयपाल देठे, अविनाश शिंदे, प्रज्ञा खंदारे, वैभव वाघमारे, अनिल भगुरे, राहुल जावीर, वैभव दहीवाले, धम्मपाल खंडागळे यांचा समावेश होता. राज्यात पहिली आलेली विश्वांजली गायकवाड, आदित्य रत्नपारखी, सारंग पोफळे, माधव वणवे या यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. राजेश ढाबरे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या प्रकल्प संचालिका रूपाली आवळे यांनी आभार मानले.