शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चारशे फुटांचे घर मिळावे

By admin | Updated: November 20, 2014 04:32 IST

माळीण दुर्घटनाग्रस्तांसाठी ४०० स्क्वेअर फुटांची घरे बांधण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी गरज भासल्यास चाकण एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांची

घोडेगाव : माळीण दुर्घटनाग्रस्तांसाठी ४०० स्क्वेअर फुटांची घरे बांधण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी गरज भासल्यास चाकण एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांची बैठक घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करावे, अशी भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मांडली. माळीण गावच्या पुनर्वसनाबाबत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांची भेट घेतली. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यातील माळीण गावातील दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने बाधित ग्रामस्थांना २६९ स्क्वेअर फुटांची घरे देण्याचे नियोजन केले आहे. परंतु, दुर्घटनाग्रस्त नागरिकांची घरे बऱ्यापैकी मोठी होती. त्यामुळे त्यांना किमान ४०० स्क्वेअर फुटांची घरे बांधून द्यावीत, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. यासाठी अंदाजे पाच लाख रुपयांचा निधी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगून इंदिरा आवास योजनेतून केवळ दीड लाख रुपयेच निधी उपलब्ध होतो, असे ते म्हणाले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की, आपण ४०० स्क्वेअर फुटांची घरे बांधावीत, त्यासाठी प्रत्येक घरामागे ५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. केंद्र शासनाने माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देशातील खासदारांना आपला निधी देण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे विविध खासदार, काही कंपनी व्यवस्थानांच्या माध्यमातून व माझ्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीतून मी साधारणत: १४ ते १५ घरे बांधून देण्याची जबाबदारी घेण्यास तयार आहे. उर्वरित घरांसाठी चाकण परिसरातील कंपन्यांशी चर्चा करून त्यांच्या सीएसआर फंडातूनही निधीची मागणी करता येऊ शकेल. याकामी प्रशासनास सर्वोतपरी सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या वेळी विविध विषयांवर चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आवाहन केले. या वेळी बैठकीस शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख रवींद्र करंजखेले, नगरसेवक धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख अमोल हरपळे, शिवेसना पुणे उपशहरप्रमुख संदीप मोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)