शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

गॅसवाहिनीचे काम बंद पाडले

By admin | Updated: November 7, 2014 00:01 IST

शासकीय नियमांना तिलांजली देत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांना दमदाटी करून सुरू असणारे गॅसवाहिनीचे काम अखेर बिरदवडी (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.

आंबेठाण : शासकीय नियमांना तिलांजली देत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांना दमदाटी करून सुरू असणारे गॅसवाहिनीचे काम अखेर बिरदवडी (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.एच.पी.सी.एल. कंपनीचे गॅसवाहिनी टाकण्याचे काम बिरदवडी येथे सुरूआहे. या ठिकाणी पाईप भूमिगत करण्यासाठी रस्ता खोदाई करताना ती अगदी रस्त्यालगत आणि साईडपट्टी खोदून केली जात आहे. तसेच हे काम करीत असताना आजूबाजूच्या शेतीचे आणि त्यात असणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. नुकसानीबाबत विचारल्यास शेतकरी आणि ग्रामस्थांना येथील कर्मचाऱ्यांकडून पिस्तुलाचा धाक दाखविला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच केवळ आश्वासने देऊन आणि नुकसान भरपाई देण्याचे गाजर दाखवून वेळ मारून नेली जात आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.नियम धाब्यावर बसविला जात असताना शासकीय अधिकारी गप्प कसे? असा सवालही केला जात आहे. अगोदरच अरुंद असणारा रस्ता खोदला जात असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे.या ठिकाणावरून धोकादायक गॅस वाहिनी जात असल्याने नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत असून, आपले आरोग्य धोक्यात येते आहे तसेच भविष्यात जीव मुठीत धरून जगावे लागेल, अशी नागरिकांना भीती आहे.बाबा काझी, दत्तात्रय चौधरी, रमेश गोतारणे, बाळासाहेब मुळे यांच्यासह शेतकरी या वेळी उपस्थित होते.