शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

गॅसवाहिनीचे काम बंद पाडले

By admin | Updated: November 7, 2014 00:01 IST

शासकीय नियमांना तिलांजली देत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांना दमदाटी करून सुरू असणारे गॅसवाहिनीचे काम अखेर बिरदवडी (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.

आंबेठाण : शासकीय नियमांना तिलांजली देत शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले जात आहे. तसेच स्थानिक नागरिकांना दमदाटी करून सुरू असणारे गॅसवाहिनीचे काम अखेर बिरदवडी (ता. खेड) येथील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे.एच.पी.सी.एल. कंपनीचे गॅसवाहिनी टाकण्याचे काम बिरदवडी येथे सुरूआहे. या ठिकाणी पाईप भूमिगत करण्यासाठी रस्ता खोदाई करताना ती अगदी रस्त्यालगत आणि साईडपट्टी खोदून केली जात आहे. तसेच हे काम करीत असताना आजूबाजूच्या शेतीचे आणि त्यात असणाऱ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. नुकसानीबाबत विचारल्यास शेतकरी आणि ग्रामस्थांना येथील कर्मचाऱ्यांकडून पिस्तुलाचा धाक दाखविला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच केवळ आश्वासने देऊन आणि नुकसान भरपाई देण्याचे गाजर दाखवून वेळ मारून नेली जात आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.नियम धाब्यावर बसविला जात असताना शासकीय अधिकारी गप्प कसे? असा सवालही केला जात आहे. अगोदरच अरुंद असणारा रस्ता खोदला जात असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे.या ठिकाणावरून धोकादायक गॅस वाहिनी जात असल्याने नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत असून, आपले आरोग्य धोक्यात येते आहे तसेच भविष्यात जीव मुठीत धरून जगावे लागेल, अशी नागरिकांना भीती आहे.बाबा काझी, दत्तात्रय चौधरी, रमेश गोतारणे, बाळासाहेब मुळे यांच्यासह शेतकरी या वेळी उपस्थित होते.