शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

कचराप्रश्न अद्याप पेटलेलाच

By admin | Updated: April 23, 2017 04:27 IST

महापौर, प्रभारी आयुक्त तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतरही उरुळी तसेच फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुण्यातील कचरा त्यांच्या गावामध्ये टाकण्यात असलेला विरोध

पुणे : महापौर, प्रभारी आयुक्त तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतरही उरुळी तसेच फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुण्यातील कचरा त्यांच्या गावामध्ये टाकण्यात असलेला विरोध कायम ठेवला. तुमचा कचरा तुमच्या शहरातच जिरवा, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कर्ते आहोत, असे त्यांनी या पदाधिकाऱ्यांना सांगितले.उरुळी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर हा विषय आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. कचरा टाकू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी तिथे आंदोलन सुरू केले आहे. कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या ते परत पाठवीत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांबरोबर शनिवारी बैठक घेण्यात आली. आमदार योगेश टिळेकर, उपमहापौर नवनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप आदी बैठकीला उपस्थित होते. कचरा डेपो हटाव समितीचे पदाधिकारी तात्या भाडळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, विजय भाडळे, संजय हरफळे, अमोल हरफळे, मच्छिंद्र कामठे, तसेच आबनावे व परिसरातील अनेक महिलांनी बैठकीत भाग घेतला व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना तुमच्या पक्षानेच स्वच्छ भारत अभियानाची हाक दिली आहे, ती लक्षात ठेवून आमच्या आंदोलनात सहभागी व्हा, अशी विनंती केली. महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांना तुमच्या गावातील अनेक विकासकामे महापालिका करीत आहे, ६६ कोटी रुपये त्यासाठी खर्च केला आहे, असे सांगितले व कचरा डेपो सुरू करू द्यावा, अशी मागणी केली. ग्रामस्थांनी त्याला ठाम नकार दिला.(प्रतिनिधी)आरोग्य बिघडले : ग्रामस्थांचा आरोपन्यायालायाने आदेश दिला आहे, म्हणून तुम्ही खर्च केला. कचरा डेपोमुळे गावाचे आरोग्य बिघडले आहे. या भागातील विहिरींचे पाणी खराब झाले आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. लहान मुलांना श्वसनाचे विकार झाले आहेत. वृद्ध व्यक्ती दम्याच्या शिकार झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या, ९ महिन्यांत डेपो बंद करतो असे सांगितले, त्यावर विश्वास ठेवून डेपो सुरू करू दिला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर आता २५ महिने झाले तरीही कोणी फिरकलेदेखील नाही. त्यामुळे आता कचरा टाकू देणार नाही, असे ग्रामस्थांनी निक्षून सांगितले.मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या, ९ महिन्यांत डेपो बंद करतो, असे सांगितले, त्यावर विश्वास ठेवून डेपो सुरू करू दिला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर आता २५ महिने झाले तरीही कोणी फिरकलेदेखील नाही. अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.जबाबदारी महापालिकेचीचउरुळी व फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांना त्रास होत असेल तर त्यावर महापालिकेने उपाययोजना केली पाहिजे. ग्रामस्थांच्या भावना तीव्र दिसत आहेत. मात्र कचऱ्याचे करायचे काय, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. महापालिकेनेच यावर चर्चा करून तज्ज्ञांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा.- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते, महापालिकानक्की मार्ग निघेलडेपोमध्ये फक्त ७०० टन कचरा टाकला जातो. त्यातील ५०० टन सुका कचरा शहरातच जिरवला जावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवत आहोत. बैठकीत तोडगा निघाला नाही, मात्र चर्चेची सुरुवात सकारात्मक झाली आहे.सोमवारी पुन्हा बैठक घेत आहोत.- श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते प्रकल्प सुरू करणारडेपोमध्ये कमीत कमी कचरा जावा असाच प्रयत्न आहे. नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये, याचीही काळजी घेतली जाते. फक्त सुका कचरा व जो प्रकल्पांमध्ये घेतला जात नाही असाच कचरा डेपोत टाकला जातो. तोही शहरातच जिरावा यासाठी उपाययोजना करू - सुरेश जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुखगावाचे आरोग्य बिघडलेशहराचा कचरा आमच्या इथे का, असा आमचा प्रश्न आहे. गावाचे सगळे आरोग्य या डेपोमुळे बिघडले आहे. सुधारणांसाठी पैसे खर्च केले असे सांगणेच चुकीचे आहे. हा खर्च केला नाही तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल. आमचे पाणी, शेती खराब होत आहे. आता हे थांबलेच पाहिजे. - भगवान पाडळे -कचरा डेपो हटाव समिती