शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
2
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
4
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
5
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
6
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!
7
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
8
ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...
9
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
10
‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   
11
AUS vs SA: एकेकाळी 'मुंबई इंडियन्स'कडून खेळणाऱ्या फलंदाजांने मोडला सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम
12
“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस
13
आई दुसऱ्यांकडे काम करायची, वडील विटा उचलायचे; २२ व्या वर्षी लेक देशातील सर्वात तरुण IPS
14
VIDEO: महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
15
Viral Video: मध्यरात्री शौचालयासाठी बाहेर पडला, अचानक समोर दिसला बिबट्या, पहारेकरीसोबत असं घडलं की...
16
‘माझी पत्नी बाहेरच्या लोकांना घरी बोलावते’, व्हिडीओमध्ये सांगून पतीनं उचललं भयानक पाऊल...  
17
बर्फाळ टेकडीवर वसलाय 'हा' छोटासा देश! स्वतःचा झेंडा, ध्वज आणि पासपोर्टची सुविधा देखील उपलब्ध; तुम्हाला माहितीये का?
18
१२ लाखांपर्यंतची करसवलत रद्द होणार का? नव्या आयकर विधेयकावरुन सरकारने केला खुलासा
19
Gold Silver Price 11 August: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅम GOLD साठी किती खर्च करावा लागणार?
20
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  

कचराप्रश्न अद्याप पेटलेलाच

By admin | Updated: April 23, 2017 04:27 IST

महापौर, प्रभारी आयुक्त तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतरही उरुळी तसेच फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुण्यातील कचरा त्यांच्या गावामध्ये टाकण्यात असलेला विरोध

पुणे : महापौर, प्रभारी आयुक्त तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतरही उरुळी तसेच फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुण्यातील कचरा त्यांच्या गावामध्ये टाकण्यात असलेला विरोध कायम ठेवला. तुमचा कचरा तुमच्या शहरातच जिरवा, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कर्ते आहोत, असे त्यांनी या पदाधिकाऱ्यांना सांगितले.उरुळी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर हा विषय आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. कचरा टाकू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी तिथे आंदोलन सुरू केले आहे. कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या ते परत पाठवीत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांबरोबर शनिवारी बैठक घेण्यात आली. आमदार योगेश टिळेकर, उपमहापौर नवनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप आदी बैठकीला उपस्थित होते. कचरा डेपो हटाव समितीचे पदाधिकारी तात्या भाडळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, विजय भाडळे, संजय हरफळे, अमोल हरफळे, मच्छिंद्र कामठे, तसेच आबनावे व परिसरातील अनेक महिलांनी बैठकीत भाग घेतला व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना तुमच्या पक्षानेच स्वच्छ भारत अभियानाची हाक दिली आहे, ती लक्षात ठेवून आमच्या आंदोलनात सहभागी व्हा, अशी विनंती केली. महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांना तुमच्या गावातील अनेक विकासकामे महापालिका करीत आहे, ६६ कोटी रुपये त्यासाठी खर्च केला आहे, असे सांगितले व कचरा डेपो सुरू करू द्यावा, अशी मागणी केली. ग्रामस्थांनी त्याला ठाम नकार दिला.(प्रतिनिधी)आरोग्य बिघडले : ग्रामस्थांचा आरोपन्यायालायाने आदेश दिला आहे, म्हणून तुम्ही खर्च केला. कचरा डेपोमुळे गावाचे आरोग्य बिघडले आहे. या भागातील विहिरींचे पाणी खराब झाले आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. लहान मुलांना श्वसनाचे विकार झाले आहेत. वृद्ध व्यक्ती दम्याच्या शिकार झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या, ९ महिन्यांत डेपो बंद करतो असे सांगितले, त्यावर विश्वास ठेवून डेपो सुरू करू दिला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर आता २५ महिने झाले तरीही कोणी फिरकलेदेखील नाही. त्यामुळे आता कचरा टाकू देणार नाही, असे ग्रामस्थांनी निक्षून सांगितले.मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या, ९ महिन्यांत डेपो बंद करतो, असे सांगितले, त्यावर विश्वास ठेवून डेपो सुरू करू दिला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर आता २५ महिने झाले तरीही कोणी फिरकलेदेखील नाही. अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.जबाबदारी महापालिकेचीचउरुळी व फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांना त्रास होत असेल तर त्यावर महापालिकेने उपाययोजना केली पाहिजे. ग्रामस्थांच्या भावना तीव्र दिसत आहेत. मात्र कचऱ्याचे करायचे काय, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. महापालिकेनेच यावर चर्चा करून तज्ज्ञांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा.- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते, महापालिकानक्की मार्ग निघेलडेपोमध्ये फक्त ७०० टन कचरा टाकला जातो. त्यातील ५०० टन सुका कचरा शहरातच जिरवला जावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवत आहोत. बैठकीत तोडगा निघाला नाही, मात्र चर्चेची सुरुवात सकारात्मक झाली आहे.सोमवारी पुन्हा बैठक घेत आहोत.- श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते प्रकल्प सुरू करणारडेपोमध्ये कमीत कमी कचरा जावा असाच प्रयत्न आहे. नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये, याचीही काळजी घेतली जाते. फक्त सुका कचरा व जो प्रकल्पांमध्ये घेतला जात नाही असाच कचरा डेपोत टाकला जातो. तोही शहरातच जिरावा यासाठी उपाययोजना करू - सुरेश जगताप, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुखगावाचे आरोग्य बिघडलेशहराचा कचरा आमच्या इथे का, असा आमचा प्रश्न आहे. गावाचे सगळे आरोग्य या डेपोमुळे बिघडले आहे. सुधारणांसाठी पैसे खर्च केले असे सांगणेच चुकीचे आहे. हा खर्च केला नाही तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल. आमचे पाणी, शेती खराब होत आहे. आता हे थांबलेच पाहिजे. - भगवान पाडळे -कचरा डेपो हटाव समिती