शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

कचराप्रश्नी कलगीतुरा

By admin | Updated: February 19, 2015 01:05 IST

शहरामध्ये निर्माण झालेला कचराकोंडीचा प्रश्न सोडविण्यास राज्य शासन मुद्दामहून टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कचऱ्याची परिस्थिती हाताबाहेर जात आहे.

पुणे : शहरामध्ये निर्माण झालेला कचराकोंडीचा प्रश्न सोडविण्यास राज्य शासन मुद्दामहून टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कचऱ्याची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. राज्य सरकार पुणेकरांबाबत संवेदनशील नसल्याचे दिसून येत असल्याची टीका महापौर दत्तात्रय धनकवडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. पालिकेतील सत्ताधारी व राज्यातील युती शासन आमने-सामने उभे टाकल्याने शहराचा कचराप्रश्न चांगलाच पेटण्याची शक्यता आहे.फुरसुंगी व उरूळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये ३१ डिसेंबरपासून ग्रामस्थांनी कचरा टाकू दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी घातलेल्या अटींचे पालन राज्य शासनाकडून झालेले नाही. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय धनकवडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी वंदना चव्हाण व सभागृह नेते सुभाष जगताप उपस्थित होते. दत्तात्रय धनकवडे म्हणाले, ‘‘कचरा डेपोमुळे प्रकल्पबाधित झालेल्या ६५ जणांना महापालिकेच्या नोकरीवर घेण्याचे मुख्यमंत्र्यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये ठरले आहे. मात्र, राज्य शासनाकडून त्यांना अद्याप प्रकल्पग्रस्तांचे दाखले दिले गेले नसल्याने त्यांना नोकरीवर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थांकडून अद्याप कचरा टाकू दिलेला नाही. मोशी व पिंपरी सांडस येथे कचरा डेपो उभारण्याबाबत शासनाकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. बाणेर व उरुळी देवाची येथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे ५०० टनाचे, तर शहरात ४० ठिकाणी २५० टनाचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.’’वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘ओला व सुका कचरा वेगळा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला तेव्हा भाजपकडूनच त्याला विरोध करण्यात आला होता. यापूर्वी जेव्हा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा ते तातडीने सोडविण्यात आले होते.’’पुणेकरांच्या प्रश्नाबाबत सरकार संवेदनशील नाही, त्यामुळेच कचऱ्याच्या प्रश्नावर अद्याप मार्ग निघू शकलेला नाही, अशी टीका सुभाष जगताप यांनी केली. (प्रतिनिधी)पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हआघाडीचे सरकार असताना जेव्हा पुण्याच्या कचऱ्यासंदर्भात किंवा इतर प्रश्न निर्माण झाला, तेव्हा तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन तातडीने त्यावर मार्ग काढले. शहराचे प्रश्न सोडविण्यात तेव्हाचे पालकमंत्री समक्ष होते, असे स्पष्ट करून वंदना चव्हाण यांनी सध्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले.पालिकेने अटी पाळल्या; सरकारने नाहीमुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे महापालिकेने देवाची उरूळी व फुरसुंगी येथील पाणीपुरवठ्यासाठी तातडीने १६ कोटी ६२ लाख रुपये दिले आहेत. कचऱ्याचा कृती आराखडादेखील तयार करण्यात आला तसेच कचऱ्याचे जास्तीत जास्त वर्गीकरण केले जात आहे. मात्र, राज्य शासनाकडून मान्य केलेल्या अटींचे पालन न झाल्याने ग्रामस्थ कचरा टाकू देत नसल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले.