शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सोसायट्यांतच जिरवला जातो कचरा

By admin | Updated: May 13, 2017 04:52 IST

मागील २२ दिवसांपासून सुरु असलेली कचराकोंडी अखेर संपली. ज्या भागात कचऱ्याचे योग्य नियोजन केले, त्या ठिकाणी फारशी

लोकमत न्यूज नेटवर्कधनकवडी : मागील २२ दिवसांपासून सुरु असलेली कचराकोंडी अखेर संपली. ज्या भागात कचऱ्याचे योग्य नियोजन केले, त्या ठिकाणी फारशी समस्या जाणवली नाही. काही सोसायट्या, घरे तसेच महापालिकेकडून चालविले जाणारे प्रकल्प यातून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. धनकवडी प्रभाग ३९ चा बहुतेक भाग कंटेनरमुक्त आहे. यामध्ये ३ मोठ्या सोसायट्या आहेत. राघवनगर सोसायटीमध्ये १५० सदनिका आहेत व मागील दहा वर्षांपासून या ठिकाणच्या खत प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन खतनिर्मिती केली जाते. हे खत सोसायटीच्या बागेला वापरत असल्याने या ठिकाणची बागदेखील सदाहरीत व फुललेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच नर्सेस टाउन सोसायटीमध्येदेखील मागील दहा वर्षांपासून ३० बंगल्यांतून निघणारा २५ ते ३० किलो कचरा याच ठिकाणी जिरवला जात असून, निर्माण झालेले खत सभासदांना माफक दरात विकत असल्याचे व कमी मनुष्यबळ व जागेमध्ये कचरा जिरवला जात असल्याचे सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र गाडगीळ यांनी सांगीतले.गुलाबनगर सोसायटीमध्येदेखील असाच खत प्रकल्प असून, यामधून सोसायटीमधील सर्व कचरा जिरवला जातो. नागरिक आपला कचरा आपल्याच घरात जिरवत आहेत, या प्रभागात २५ कचरा वेचक वर्गीकरण केलेला कचरा जमा करतात. यातून एका अठवड्याला ५-७ टन वर्गीकृत केलेला १४ प्रकारचा वेगवेगळा सुका कचरा विकून आपली उपजीविका करत असल्याचे आरोग्य निरीक्षक प्रदीप राऊत यांनी सांगितले.प्रभाग क्रमांक ४० दत्तनगरमध्ये १८० सदनिका असलेली आॅलिव्ह सोसायटीतदेखील दररोज निघणारा ८० ते १०० किलो कचरा या सोसायटीच्या आवारात खत प्रकल्पात जिरवला जातो. हेच खत सोसायटीमध्ये असणाऱ्या बागेत वापरले जाते, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन रवी अकोलकर यांनी दिली.