शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांतच जिरवला जातो कचरा

By admin | Updated: May 13, 2017 04:52 IST

मागील २२ दिवसांपासून सुरु असलेली कचराकोंडी अखेर संपली. ज्या भागात कचऱ्याचे योग्य नियोजन केले, त्या ठिकाणी फारशी

लोकमत न्यूज नेटवर्कधनकवडी : मागील २२ दिवसांपासून सुरु असलेली कचराकोंडी अखेर संपली. ज्या भागात कचऱ्याचे योग्य नियोजन केले, त्या ठिकाणी फारशी समस्या जाणवली नाही. काही सोसायट्या, घरे तसेच महापालिकेकडून चालविले जाणारे प्रकल्प यातून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. धनकवडी प्रभाग ३९ चा बहुतेक भाग कंटेनरमुक्त आहे. यामध्ये ३ मोठ्या सोसायट्या आहेत. राघवनगर सोसायटीमध्ये १५० सदनिका आहेत व मागील दहा वर्षांपासून या ठिकाणच्या खत प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन खतनिर्मिती केली जाते. हे खत सोसायटीच्या बागेला वापरत असल्याने या ठिकाणची बागदेखील सदाहरीत व फुललेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच नर्सेस टाउन सोसायटीमध्येदेखील मागील दहा वर्षांपासून ३० बंगल्यांतून निघणारा २५ ते ३० किलो कचरा याच ठिकाणी जिरवला जात असून, निर्माण झालेले खत सभासदांना माफक दरात विकत असल्याचे व कमी मनुष्यबळ व जागेमध्ये कचरा जिरवला जात असल्याचे सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र गाडगीळ यांनी सांगीतले.गुलाबनगर सोसायटीमध्येदेखील असाच खत प्रकल्प असून, यामधून सोसायटीमधील सर्व कचरा जिरवला जातो. नागरिक आपला कचरा आपल्याच घरात जिरवत आहेत, या प्रभागात २५ कचरा वेचक वर्गीकरण केलेला कचरा जमा करतात. यातून एका अठवड्याला ५-७ टन वर्गीकृत केलेला १४ प्रकारचा वेगवेगळा सुका कचरा विकून आपली उपजीविका करत असल्याचे आरोग्य निरीक्षक प्रदीप राऊत यांनी सांगितले.प्रभाग क्रमांक ४० दत्तनगरमध्ये १८० सदनिका असलेली आॅलिव्ह सोसायटीतदेखील दररोज निघणारा ८० ते १०० किलो कचरा या सोसायटीच्या आवारात खत प्रकल्पात जिरवला जातो. हेच खत सोसायटीमध्ये असणाऱ्या बागेत वापरले जाते, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन रवी अकोलकर यांनी दिली.