शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अलंकापुरीत वाढतायेत कचऱ्याचे ढिगारे

By admin | Updated: April 29, 2017 03:51 IST

तीर्थक्षेत्र आळंदी शहरात वाढत्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न

भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगावतीर्थक्षेत्र आळंदी शहरात वाढत्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून, शहराबाहेरील वर्दळ बळावत चालली आहे. त्यामुळे शहरासाठी विविध उपाययोजना आखूनही वाढत्या समस्यांना आवर घालण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. अलंकापुरीला चारही बाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांच्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यांलगतच कचऱ्यांचे मोठमोठे ढीग तयार होऊ लागले आहे. परिणामी शहरात दुर्गंधीयुक्त वातावरण पसरत असून, स्थानिक नागरिकांना, भाविकांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानी पोहोचत आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून अलंकापुरीला वडगावमार्गे जोडणाऱ्या रस्त्याच्या चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीपासून साईडपट्ट्यालगत खोदण्यात आलेल्या साईडपट्ट्यांमध्ये साठला आहे. रस्त्यावरील सातशे ते आठशे मीटर अंतरावर आठ ते दहा ठिकाणी कचऱ्याचे ढीग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. नगर परिषदेकडून रस्त्यावरील कचरा मजुरांच्या साह्याने उचलला जात आहे. मात्र चरांमधील कचरा ‘जैसे थे’ अवस्थेत पडून राहात असल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, शिळे अन्न, शिळ्या पालेभाज्या, खरकटे अन्न अशा स्वरूपात हा कचरा असतो. त्यामुळे चार-पाच दिवसांत या कचऱ्याला उग्र वास सुटत आहे. परिणामी रस्त्यालगत असलेल्या स्थानिकांना तसेच वाटसरूंना दुर्गंंधीचा सामना करत मार्गक्रमण करावे लागत आहे. मुले शाळेत जाण्यासाठी स्कूलबसचा वापर करत असल्याने स्कूलबसची वाट पाहात बसलेल्या मुलांना दुर्गंधीयुक्त कचराकुंडी शेजारी उभे राहावे लागत आहे. मुलांना आजाराची लागण होत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. वाढत्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगरपालिकेने तत्काळ उपाययोजना आखण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.(वार्ताहर)