शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अलंकापुरीत वाढतायेत कचऱ्याचे ढिगारे

By admin | Updated: April 29, 2017 03:51 IST

तीर्थक्षेत्र आळंदी शहरात वाढत्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न

भानुदास पऱ्हाड / शेलपिंपळगावतीर्थक्षेत्र आळंदी शहरात वाढत्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांना नाकावर रुमाल धरावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून, शहराबाहेरील वर्दळ बळावत चालली आहे. त्यामुळे शहरासाठी विविध उपाययोजना आखूनही वाढत्या समस्यांना आवर घालण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. अलंकापुरीला चारही बाजूंनी जोडणाऱ्या रस्त्यांच्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यांलगतच कचऱ्यांचे मोठमोठे ढीग तयार होऊ लागले आहे. परिणामी शहरात दुर्गंधीयुक्त वातावरण पसरत असून, स्थानिक नागरिकांना, भाविकांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानी पोहोचत आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून अलंकापुरीला वडगावमार्गे जोडणाऱ्या रस्त्याच्या चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीपासून साईडपट्ट्यालगत खोदण्यात आलेल्या साईडपट्ट्यांमध्ये साठला आहे. रस्त्यावरील सातशे ते आठशे मीटर अंतरावर आठ ते दहा ठिकाणी कचऱ्याचे ढीग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. नगर परिषदेकडून रस्त्यावरील कचरा मजुरांच्या साह्याने उचलला जात आहे. मात्र चरांमधील कचरा ‘जैसे थे’ अवस्थेत पडून राहात असल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्या, शिळे अन्न, शिळ्या पालेभाज्या, खरकटे अन्न अशा स्वरूपात हा कचरा असतो. त्यामुळे चार-पाच दिवसांत या कचऱ्याला उग्र वास सुटत आहे. परिणामी रस्त्यालगत असलेल्या स्थानिकांना तसेच वाटसरूंना दुर्गंंधीचा सामना करत मार्गक्रमण करावे लागत आहे. मुले शाळेत जाण्यासाठी स्कूलबसचा वापर करत असल्याने स्कूलबसची वाट पाहात बसलेल्या मुलांना दुर्गंधीयुक्त कचराकुंडी शेजारी उभे राहावे लागत आहे. मुलांना आजाराची लागण होत असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. वाढत्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगरपालिकेने तत्काळ उपाययोजना आखण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.(वार्ताहर)